शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

गोरखालॅंड आंदोलनः टॉय ट्रेन स्टेशन पेटवले

By admin | Updated: July 8, 2017 16:31 IST

गोरखा समर्थकाचा मृतदेह सापडल्यानंतर संतप्त जमावाने सोनाडा येथील दार्जिलिंग हिमालयन रेल्वेचे स्टेशन पेटवून दिले.

ऑनलाइन लोकमत
दार्जिलिंग, दि. 8- दार्जिलिंगमध्ये सुरु असलेले गोरखालॅंडच्या मागणीचे आंदोलन दिवसेंदिवस चिघळत चालले आहे. एका गोरखा समर्थकाचा मृतदेह सापडल्यानंतर संतप्त जमावाने सोनाडा येथील दार्जिलिंग हिमालयन रेल्वेचे स्टेशन पेटवून दिले. या गोरखा समर्थकाचा मृत्यू पोलिसांनी केलेल्या गोळीबारामुळे झाला असा आरोप गोरखा आंदोलकांनी केला आहे. या घटनेनंतर दार्जिलिंगमध्ये लष्कराच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
 
गोरखालॅंडसाठी निदर्शने करत असताना पोलिसांनी गोळीबार केला आणि या गोळीबारात आपला सहकारी याशी भुतिया याचा मृत्यू झाल्याचे म्हणणे आंदोलकांचे आहे. मात्र पोलिसांनी आज कोणत्याही प्रकारचा गोळीबार झालाच नसल्याचे स्पष्ट केले आहे. गोरखा जनमुक्ती मोर्चाने याशीच्या मृतदेहासह मोर्चा काढणार असल्याचा निर्धारही व्यक्त केला आहे. तृणमूल कॉंग्रेसचे दार्जिलिंग जिल्हाप्रमुख आणि पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री गौतम देव यांनीही असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे सांगितले आहे. एका व्यक्तीवर पोलीस कसे गोळीबार करतील असे सांगत त्यांनी गोरखा जनमुक्ती मोर्चाचा आरोप फेटाळला आहे. गोरखा जनमुक्ती मोर्चाचे अध्यक्ष बिमल गुरुंग या घटनेवर एक बैठक घेण्याची शक्यता आहे.
 
स्वतंत्र गोरखालॅंडच्या मागणीसाठी ८ जूनपासून आंदोलन करीत असलेल्या जीजेएम कार्यकर्त्यांनी सिंगमारी येथील पक्ष मुख्यालयापासून निषेध मोर्चा काढला होता. आपण आंदोलकांशी चर्चेला तयार आहोत. मात्र, राज्यघटनेचं उल्लंघन केलं जाऊ शकत नाही, असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या. सरकारला बदनाम करण्यासाठी काही उपद्रवी शक्ती मुद्दाम आंदोलनास चिथावत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. दरम्यान, सद्यस्थितीविषयी राज्य सरकारकडून अहवाल आल्याखेरीज केंद्र सरकार सुरक्षा दलांची जादा कुमक पाठविणार नाही, अशी भूमिका केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतली होती.
दार्जिलिंगमध्ये ट्युबलाइट मोर्चा
चीनची नजर सिक्कीमवर की गोरखालॅंडवर ?
 
स्वतंत्र गोरखालॅंडच्या आंदोलनाचा आजचा 24 वा दिवस असून, दिवसेंदिवस त्याचे स्वरुप अधिक गंभीर होत चालले आहे. या व्यवसायामुळे सलग तीन आठवडे दार्जिलिंगमधील पर्यटन व्यवसाय ठप्प झाला असून हॉटेलही ओस पडली आहेत. सिलिगुडी येथील अत्यंत चिंचोळ्या पट्टीने ईशान्य भारत हा उर्वरीत भारताशी जोडलेले आहे. हे आंदोलन याच परिसरामध्ये सुरु आहे. या आंदोलनाचा फटका सिक्किमलाही बसला आहे. राष्ट्रीय महामार्ग 10 हा रस्ता सिक्कीमसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु आंदोलनामुळे सिक्कीमच्या जनजीवनावर परिणाम होत आहे. याबाबत सिक्कीमचे मुख्यमंत्री पवन चॅमलिंग यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.