शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

गोरक्षकांचा धुडगूस, रस्तारोको

By admin | Updated: June 13, 2017 01:53 IST

राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात गायींची तस्करी होत असल्याच्या संशयावरून ५० गोरक्षकांनी महामार्ग क्रमांक १५ वर रविवारी रात्री धुडगूस घातला. त्यांनी गायींची

- लोकमत न्यूज नेटवर्क

जयपूर : राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात गायींची तस्करी होत असल्याच्या संशयावरून ५० गोरक्षकांनी महामार्ग क्रमांक १५ वर रविवारी रात्री धुडगूस घातला. त्यांनी गायींची वाहतूक करणाऱ्या मालमोटारींवर (ट्रक) तुफान दगडफेक करण्यासह वाहतूक रोखून धरली. वस्तूत: तामिळनाडूच्या पशुसंवर्धन विभागाने जैसलमेर येथून ५० गायी आणि कालवडींची खरेदी केली होती आणि विभागाचे अधिकारी त्यांना पाच मालमोटारींतून तामिळनाडूला नेत होते. त्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या आणि कागदपत्रे त्यांनी मिळविली होती. याप्रकरणी चार लोकांना अटक करण्यात आली असून, घटना गांभीर्याने न घेतल्यामुळे पोलीस निरीक्षकांसह सात पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. आरोपींनी तामिळनाडूच्या अधिकाऱ्यांना मारहाण करण्याचा, त्याचप्रमाणे मालमोटारी पेटविण्याचाही प्रयत्न केला. तथापि, पोलिसांनी घटनास्थळी येऊन त्यांना रोखले. त्यानंतर तमिळ अधिकारी, ट्रकचालक आणि क्लीनर्स यांना गोरक्षकांच्या ताब्यातून सोडवून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. अनेक लोक घटनास्थळी गोळा झाले आणि त्यांनी महामार्ग क्रमांक १५ वर ठिय्या मारून वाहतूक अडविली, असे बारमेरचे पोलीस अधीक्षक गगनदीप सिंगला यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.तमिळ पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी जैसलमेरमधील विविध ठिकाणांहून उत्तम वंशाच्या गायींची खरेदी केली होती. त्यांनी गायींच्या वाहतुकीसाठी उपविभागीय अधिकारी तसेच स्थानिक पोलीस ठाण्याकडून नाहरकत प्रमाणपत्रांसह इतर परवानग्या प्राप्त केल्या होत्या. ५0 जणाविरुद्ध गुन्हा दाखलआरोपींनी मालमोटारींवर तुफान दगडफेक करून एका मालमोटारीचे नुकसान केले. मालमोटारीतील गायींना तात्पुरते स्थानिक गोशाळेत ठेवण्यात आले आहे, असे ते म्हणाले. ५० लोकांविरुद्ध सरकारी कामात अडथळा, सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला, तसेच राष्ट्रीय महामार्ग कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चैनराम, कमलेश, विक्रम आणि जसवंत यांना सोमवारी अटक करण्यात आली. तामिळनाडूच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे मदतीची मागणी केली. तथापि, पोलीस कर्मचारी उशिरा घटनास्थळी आले. ही बाब समजल्यानंतर कर्तव्यात कसूर केल्यावरून सदर पोलीस ठाण्याच्या ठाणे प्रमुखांसह सात पोलिसांच्या पोलीस मुख्यालयात बदल्या करण्यात आल्या.