शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

गोरक्षकांचा धुडगूस, रस्तारोको

By admin | Updated: June 13, 2017 01:53 IST

राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात गायींची तस्करी होत असल्याच्या संशयावरून ५० गोरक्षकांनी महामार्ग क्रमांक १५ वर रविवारी रात्री धुडगूस घातला. त्यांनी गायींची

- लोकमत न्यूज नेटवर्क

जयपूर : राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात गायींची तस्करी होत असल्याच्या संशयावरून ५० गोरक्षकांनी महामार्ग क्रमांक १५ वर रविवारी रात्री धुडगूस घातला. त्यांनी गायींची वाहतूक करणाऱ्या मालमोटारींवर (ट्रक) तुफान दगडफेक करण्यासह वाहतूक रोखून धरली. वस्तूत: तामिळनाडूच्या पशुसंवर्धन विभागाने जैसलमेर येथून ५० गायी आणि कालवडींची खरेदी केली होती आणि विभागाचे अधिकारी त्यांना पाच मालमोटारींतून तामिळनाडूला नेत होते. त्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या आणि कागदपत्रे त्यांनी मिळविली होती. याप्रकरणी चार लोकांना अटक करण्यात आली असून, घटना गांभीर्याने न घेतल्यामुळे पोलीस निरीक्षकांसह सात पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. आरोपींनी तामिळनाडूच्या अधिकाऱ्यांना मारहाण करण्याचा, त्याचप्रमाणे मालमोटारी पेटविण्याचाही प्रयत्न केला. तथापि, पोलिसांनी घटनास्थळी येऊन त्यांना रोखले. त्यानंतर तमिळ अधिकारी, ट्रकचालक आणि क्लीनर्स यांना गोरक्षकांच्या ताब्यातून सोडवून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. अनेक लोक घटनास्थळी गोळा झाले आणि त्यांनी महामार्ग क्रमांक १५ वर ठिय्या मारून वाहतूक अडविली, असे बारमेरचे पोलीस अधीक्षक गगनदीप सिंगला यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.तमिळ पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी जैसलमेरमधील विविध ठिकाणांहून उत्तम वंशाच्या गायींची खरेदी केली होती. त्यांनी गायींच्या वाहतुकीसाठी उपविभागीय अधिकारी तसेच स्थानिक पोलीस ठाण्याकडून नाहरकत प्रमाणपत्रांसह इतर परवानग्या प्राप्त केल्या होत्या. ५0 जणाविरुद्ध गुन्हा दाखलआरोपींनी मालमोटारींवर तुफान दगडफेक करून एका मालमोटारीचे नुकसान केले. मालमोटारीतील गायींना तात्पुरते स्थानिक गोशाळेत ठेवण्यात आले आहे, असे ते म्हणाले. ५० लोकांविरुद्ध सरकारी कामात अडथळा, सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला, तसेच राष्ट्रीय महामार्ग कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चैनराम, कमलेश, विक्रम आणि जसवंत यांना सोमवारी अटक करण्यात आली. तामिळनाडूच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे मदतीची मागणी केली. तथापि, पोलीस कर्मचारी उशिरा घटनास्थळी आले. ही बाब समजल्यानंतर कर्तव्यात कसूर केल्यावरून सदर पोलीस ठाण्याच्या ठाणे प्रमुखांसह सात पोलिसांच्या पोलीस मुख्यालयात बदल्या करण्यात आल्या.