शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

गोरक्षकांचा धुडगूस, रस्तारोको

By admin | Updated: June 13, 2017 01:53 IST

राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात गायींची तस्करी होत असल्याच्या संशयावरून ५० गोरक्षकांनी महामार्ग क्रमांक १५ वर रविवारी रात्री धुडगूस घातला. त्यांनी गायींची

- लोकमत न्यूज नेटवर्क

जयपूर : राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात गायींची तस्करी होत असल्याच्या संशयावरून ५० गोरक्षकांनी महामार्ग क्रमांक १५ वर रविवारी रात्री धुडगूस घातला. त्यांनी गायींची वाहतूक करणाऱ्या मालमोटारींवर (ट्रक) तुफान दगडफेक करण्यासह वाहतूक रोखून धरली. वस्तूत: तामिळनाडूच्या पशुसंवर्धन विभागाने जैसलमेर येथून ५० गायी आणि कालवडींची खरेदी केली होती आणि विभागाचे अधिकारी त्यांना पाच मालमोटारींतून तामिळनाडूला नेत होते. त्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या आणि कागदपत्रे त्यांनी मिळविली होती. याप्रकरणी चार लोकांना अटक करण्यात आली असून, घटना गांभीर्याने न घेतल्यामुळे पोलीस निरीक्षकांसह सात पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. आरोपींनी तामिळनाडूच्या अधिकाऱ्यांना मारहाण करण्याचा, त्याचप्रमाणे मालमोटारी पेटविण्याचाही प्रयत्न केला. तथापि, पोलिसांनी घटनास्थळी येऊन त्यांना रोखले. त्यानंतर तमिळ अधिकारी, ट्रकचालक आणि क्लीनर्स यांना गोरक्षकांच्या ताब्यातून सोडवून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. अनेक लोक घटनास्थळी गोळा झाले आणि त्यांनी महामार्ग क्रमांक १५ वर ठिय्या मारून वाहतूक अडविली, असे बारमेरचे पोलीस अधीक्षक गगनदीप सिंगला यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.तमिळ पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी जैसलमेरमधील विविध ठिकाणांहून उत्तम वंशाच्या गायींची खरेदी केली होती. त्यांनी गायींच्या वाहतुकीसाठी उपविभागीय अधिकारी तसेच स्थानिक पोलीस ठाण्याकडून नाहरकत प्रमाणपत्रांसह इतर परवानग्या प्राप्त केल्या होत्या. ५0 जणाविरुद्ध गुन्हा दाखलआरोपींनी मालमोटारींवर तुफान दगडफेक करून एका मालमोटारीचे नुकसान केले. मालमोटारीतील गायींना तात्पुरते स्थानिक गोशाळेत ठेवण्यात आले आहे, असे ते म्हणाले. ५० लोकांविरुद्ध सरकारी कामात अडथळा, सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला, तसेच राष्ट्रीय महामार्ग कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चैनराम, कमलेश, विक्रम आणि जसवंत यांना सोमवारी अटक करण्यात आली. तामिळनाडूच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे मदतीची मागणी केली. तथापि, पोलीस कर्मचारी उशिरा घटनास्थळी आले. ही बाब समजल्यानंतर कर्तव्यात कसूर केल्यावरून सदर पोलीस ठाण्याच्या ठाणे प्रमुखांसह सात पोलिसांच्या पोलीस मुख्यालयात बदल्या करण्यात आल्या.