शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

गोपालकृष्ण गांधी उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार

By admin | Updated: July 12, 2017 05:35 IST

उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या आखाड्यात १८ विरोधी पक्षांच्या वतीने पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी उतरणार आहेत.

शीलेश शर्मा । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या आखाड्यात १८ विरोधी पक्षांच्या वतीने पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी उतरणार आहेत. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी येथे ही माहिती दिली. गोपालकृष्ण गांधी यांच्या उमेदवारीला सर्व १८ विरोधी पक्षांनी संमती दिली. त्यात जनता दलाचा (यु) समावेश आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत या पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिला आहे. आम्ही गांधी यांच्याशी बोललो आहोत. त्यांनी विरोधी पक्षांचा संयुक्त उमेदवार व्हायला तयारी दाखवली आहे, असे सोनिया गांधी बैठकीनंतर म्हणाल्या. काँग्रेसचे सरचिटणीस गुलाम नबी आझाद, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओ’ब्रायन यांच्यासह विरोधी पक्षनेते गोपालकृष्ण गांधी यांना त्यांची निवडणुकीसाठी संमती घेण्यासाठी दूरध्वनीवर बोलले. त्यांनी विचार करण्यासाठी १० ते १५ मिनिटे घेतली. नंतर त्यांच्याशी पुन्हा दूरध्वनीवर संपर्क साधण्यात आल्यावर ते ही निवडणूक लढण्यास तयार झाले. गोपालकृष्ण गांधी यांनी सगळ्या विरोधी नेत्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, असे सोनिया गांधी म्हणाल्या. ।महात्मा गांधी व राजगोपालाचारी यांचे नातूगोपालकृष्ण गांधी हे महात्मा गांधी यांचे व देशाचे शेवटचे गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी यांचे नातू आहेत. उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी त्यांच्याशिवाय योग्य व्यक्ती असू शकत नाही. ते एकमताने निवडून येतील अशी आशा आहे, असे येचुरी म्हणाले. गांधी यांचे नाव सगळ्यात आधी ओ’ब्रायन यांनी सुचवले व नंतर बसपचे सतीश मिश्र, येचुरी आणि इतर सगळ्यांनी. सगळ्या पक्षांनी त्यांच्या नावाला पाठिंबा द्यावा, असे गोपालकृष्ण गांधी यांचे म्हणणे होते. आमची विनंती त्यांनी स्वीकारली, असे ओ’ब्रायन म्हणाले.।गांधी यांचे नाव निश्चित करण्यासाठी विरोधी नेत्यांनी फक्त १५ मिनिटे घेतली. केवळ त्यांच्याच नावावर चर्चा झाली आणि एकमताने त्यांना पाठिंबा दिला गेला, असे सूत्रांनी सांगितले. विरोधी पक्षांमध्ये आधीच व्यापक सहमती होती व चांगला समन्वयदेखील होता. उमेदवारी अर्जावर जनता दलाचे (यु) नेते शरद यादव यांच्यासह इतर नेत्यांनी स्वाक्षरी केली असून अर्ज नंतर सादर केला जाणार आहे.