शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

गोपाळ गोडसेंची सुटका होते, मग राजीव गांधीच्या मारेक-यांची का नाही?

By admin | Updated: August 7, 2015 18:48 IST

जर महात्मा गांधींच्या हत्याकाडांतील दोषीची १६ वर्षांनंतर सुटका होऊ शकते तर तोच न्याय राजीव गांधींच्या मारेक-यांना का लागू होत नाही असा सवाल तामिळनाडू सरकारने सर्वोच्च न्यायालयाला केला.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - जर 'राष्ट्रपिता' महात्मा गांधींच्या हत्येचा कट रचणा-या गोपाळ गोडसेंना जन्मठेपेच्या शिक्षेत माफी मिळून त्यांची १६ वर्षांनी तुरूंगातून सुटका होऊ शकते, तर मग तशीच माफी माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या हत्येच्या कट रचणा-यांना का मिळू शकत नाही असा धक्कादायक सवाल तामिळनाडू सरकारने सर्वोच्च न्यायालयाला केला आहे. तामिळनाडू सरकारच्या वतीने बाजू मांडणारे वकील राकेश द्विवेदी यांनी महात्मा गांधी व राजीव गांधी या दोघांच्या हत्याकांडातील मारेक-यांना दिल्या गेलेल्या शिक्षेची तुलना करत उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे पाच न्यायाधीशांचे खंडपीठही अचंबित झाले.
'महात्मा गांधींच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेले गोपाळ नारायण गोडसे यांना १९४९ साली जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. मात्र देशातील जनतेच्या मनात आदरणीय स्थान असणारे व  'राष्ट्रपिता' असणारे महात्मा गांधी यांच्या मारेक-यालाही १६ वर्षांनंतर माफी मिळाली आणि त्याची तुरूंगातून सुटका झाली, असे द्विवेदी यांनी आपली बाजू मांडताना सांगितले.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व राजीव गांधी यांची झालेली हत्या ही देशाच्या इतिहासातील अत्यंत वाईट घटना आहे. मात्र राजीव यांच्या हत्याकांडातील दोषींनी २३ वर्षांहून अधिक काळ तुरूंगात शिक्षा भोगली आहे. मग जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेले ते माफीस पात्र नाहीत का? असा सवाल द्विवेदी यांनी केला. काळ बदलला आहे. हत्येचा कट रचणा-या सर्वच आरोपींची १६ वर्षांनी सुटका व्हावी असे माझे म्हणणे नाही, मात्र दोषीला मूलभूत अधिकार असतानाही त्याच्यासमोरील माफीचे दार बंद करणे योग्य ठरेल का, असा भावनिक प्रश्न द्विवेदी यांनी विचारले. 
२१ मे १९९१ साली माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची तामिळनाडूमध्ये मानवी बाँबच्या सहाय्याने हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी न्यायालयाने २६ जणांना दोषी ठरवत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने  मुरूगन, पेरारीवलन, संथन आणि नलिनी या चौघांचीच फाशीची शिक्षा कायम ठेवली. त्यानंतर तामिळनाडूच्या राज्यपालांनी नलिनीच्या शिक्षेचे जन्मठेपेत रुपांतर केले होते. आणि गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने इतर तीन दोषींची फाशी रद्द करत त्यांना जन्मठेप सुनावली होती. मात्र त्यांच्या मारेक-यांची जन्मठेप रद्द करून त्यांची सुटका व्हावी अशी मागणी तामिळनाडू सरकारतर्फे करण्यात येत आहे.