शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
3
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
4
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
5
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
6
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
7
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
8
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
9
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
10
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
11
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
12
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
13
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
14
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
15
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
16
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
17
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
18
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
19
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
20
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल

गोपाळ गोडसेंची सुटका होते, मग राजीव गांधीच्या मारेक-यांची का नाही?

By admin | Updated: August 7, 2015 18:48 IST

जर महात्मा गांधींच्या हत्याकाडांतील दोषीची १६ वर्षांनंतर सुटका होऊ शकते तर तोच न्याय राजीव गांधींच्या मारेक-यांना का लागू होत नाही असा सवाल तामिळनाडू सरकारने सर्वोच्च न्यायालयाला केला.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - जर 'राष्ट्रपिता' महात्मा गांधींच्या हत्येचा कट रचणा-या गोपाळ गोडसेंना जन्मठेपेच्या शिक्षेत माफी मिळून त्यांची १६ वर्षांनी तुरूंगातून सुटका होऊ शकते, तर मग तशीच माफी माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या हत्येच्या कट रचणा-यांना का मिळू शकत नाही असा धक्कादायक सवाल तामिळनाडू सरकारने सर्वोच्च न्यायालयाला केला आहे. तामिळनाडू सरकारच्या वतीने बाजू मांडणारे वकील राकेश द्विवेदी यांनी महात्मा गांधी व राजीव गांधी या दोघांच्या हत्याकांडातील मारेक-यांना दिल्या गेलेल्या शिक्षेची तुलना करत उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे पाच न्यायाधीशांचे खंडपीठही अचंबित झाले.
'महात्मा गांधींच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेले गोपाळ नारायण गोडसे यांना १९४९ साली जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. मात्र देशातील जनतेच्या मनात आदरणीय स्थान असणारे व  'राष्ट्रपिता' असणारे महात्मा गांधी यांच्या मारेक-यालाही १६ वर्षांनंतर माफी मिळाली आणि त्याची तुरूंगातून सुटका झाली, असे द्विवेदी यांनी आपली बाजू मांडताना सांगितले.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व राजीव गांधी यांची झालेली हत्या ही देशाच्या इतिहासातील अत्यंत वाईट घटना आहे. मात्र राजीव यांच्या हत्याकांडातील दोषींनी २३ वर्षांहून अधिक काळ तुरूंगात शिक्षा भोगली आहे. मग जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेले ते माफीस पात्र नाहीत का? असा सवाल द्विवेदी यांनी केला. काळ बदलला आहे. हत्येचा कट रचणा-या सर्वच आरोपींची १६ वर्षांनी सुटका व्हावी असे माझे म्हणणे नाही, मात्र दोषीला मूलभूत अधिकार असतानाही त्याच्यासमोरील माफीचे दार बंद करणे योग्य ठरेल का, असा भावनिक प्रश्न द्विवेदी यांनी विचारले. 
२१ मे १९९१ साली माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची तामिळनाडूमध्ये मानवी बाँबच्या सहाय्याने हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी न्यायालयाने २६ जणांना दोषी ठरवत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने  मुरूगन, पेरारीवलन, संथन आणि नलिनी या चौघांचीच फाशीची शिक्षा कायम ठेवली. त्यानंतर तामिळनाडूच्या राज्यपालांनी नलिनीच्या शिक्षेचे जन्मठेपेत रुपांतर केले होते. आणि गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने इतर तीन दोषींची फाशी रद्द करत त्यांना जन्मठेप सुनावली होती. मात्र त्यांच्या मारेक-यांची जन्मठेप रद्द करून त्यांची सुटका व्हावी अशी मागणी तामिळनाडू सरकारतर्फे करण्यात येत आहे.