शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

अणुऊर्जेसाठी चांगले संकेत

By admin | Updated: February 29, 2016 17:41 IST

केंद्रीय अर्थसंकल्पात अणुऊर्जेसाठी केलेली तीन हजार कोटी रुपयांची तरतूद लक्षणीय आहे. ही तरतूद विशेषत्वाने अणुऊर्जेसाठीची आहे

डॉ. अनिल काकोडकर -
केंद्रीय अर्थसंकल्पात अणुऊर्जेसाठी केलेली तीन हजार कोटी रुपयांची तरतूद लक्षणीय आहे. ही तरतूद विशेषत्वाने अणुऊर्जेसाठीची आहे. म्हणजेच अणुऊर्जा आयोगाची जी अन्य कामे आहेत, त्यावरील तरतूद वेगळी आहे. भविष्यातील आपली विजेची गरज आणि त्यासाठीचे नियोजन या दृष्टीने हे पुढचे पाऊल आहे. अणुऊर्जा निर्मितीच्या व्यापक विस्तारासाठी दीर्घकालीन नियोजन अत्यंत आवश्यक आहे. त्या दृष्टीने बजेटमधून चांगले संकेत मिळाले आहेत. या तरतुदीकडे फक्त आर्थिक किंवा तरतुदीच्या आकडेवारीच्या अंगाने पाहून चालणार नाही. कारण या दृश्य पडद्याच्या मागे अणुऊर्जेला बळ देणा-या घडामोडींना यातून वेग येणार आहे. अणु उत्तरदायित्वाचा मुद्दा जागतिक पातळीवर ऐरणीवर आल्यानंतर आपल्या अणुऊर्जा कार्यक्रमाच्या विस्ताराविषयी उद्योग जगताच्या मनात काहीसा संदेह निर्माण झाला होता. त्यातून आलेली मरगळ झटकून टाकण्याचा प्रयत्न बजेटमधील विशेष उल्लेखातून केला गेला आहे. अणुऊर्जेबाबत सरकार गंभीर आणि ठामही असल्याचा संदेश यातून मिळाला आहे. गाजावाजा किंवा विशेष उल्लेख न करताही अशी तरतूद करता येणे शक्य होते. पण तसे न करण्यामागे अणुऊर्जेकडे पाहण्यातील उद्योगजगताची मरगळ झटकणे आणि विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याचाच हेतू दिसतो. 
सध्या म्हणजे २०१६ साली आपण पाच हजार मेगावॅटहून काहीशी अधिक  वीज अणुऊर्जेच्या माध्यमातून निर्माण करतो. २०३२ सालापर्यंत अणुऊर्जा निर्मितीत भारताला ६३ हजार मेगावॅटचे लक्ष्य गाठायचे आहे. सध्या काम सुरू असलेले प्रकल्प पूर्ण झाले, की आजची क्षमता १३ हजार मेगावॅटच्या घरात पोहोचेल. तरीही उद्दिष्ट आणि वीज निर्मिती क्षमता यातील अंतर नजीकच्या भविष्यात जवळपास ५० हजार मेगावॅटचे असेल. ते नीट कापायचे तर दरवर्षी अणुऊर्जा निर्मितीत ३५०० मेगावॅटची भर पडावी लागेल. यंदाच्या बजेटमधील तरतूद त्यासाठी कशी पुरणार, असा प्रश्न पडू शकतो. पण हे काम केवळ या दृश्य तरतुदीवर होणे अपेक्षित नाही. ३० टक्के इक्विटी आणि ७० टक्के लोन व अर्थसंकल्पीय तरतुदीचे पाठबळ या त्रिसूत्रीतून हे ही मजल गाठायची आहे. त्यासाठी दरवर्षी १५ हजार कोटी उभे करावे लागतील. यातील मोठी रक्कम उभी करण्याइतपत सबळ स्रोत नॅशनल पॉवर कॉर्पोरेशनकडे आहेत. शिवाय एनटीपीसी किंवा इंडियन ऑइलसारख्या अन्य सार्वजनिक उपक्रमांकडूनही भरीव मदत मिळू शकते. किंबहुना त्याच दृष्टीने अलीकडेच अटॉमिक अॅक्टमध्ये सुधारणा केलेली आहे. एकाच हेतूने दोन सार्वजनिक उपक्रम एकत्र आले तर ती आता सरकारी कंपनीच मानली जाणार आहे. सरकार या विषयाकडे गंभीरपणे पाहात असल्याचा स्पष्ट संदेश या बजेटने दिल्याने अणुऊर्जा निर्मितीसाठी लागणा-या छोट्या-मोठ्या उत्पादनांच्या पुरवठ्यासाठी उद्योग जगत उत्साहाने पुढे येण्याजोगी स्थिती आजच्या घडीला निर्माण झाली आहे, जी निश्चितच आश्वासक आहे. 
(लेखक प्रख्यात अणुशास्त्रज आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष आहेत. )