शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अणुऊर्जेसाठी चांगले संकेत

By admin | Updated: February 29, 2016 17:41 IST

केंद्रीय अर्थसंकल्पात अणुऊर्जेसाठी केलेली तीन हजार कोटी रुपयांची तरतूद लक्षणीय आहे. ही तरतूद विशेषत्वाने अणुऊर्जेसाठीची आहे

डॉ. अनिल काकोडकर -
केंद्रीय अर्थसंकल्पात अणुऊर्जेसाठी केलेली तीन हजार कोटी रुपयांची तरतूद लक्षणीय आहे. ही तरतूद विशेषत्वाने अणुऊर्जेसाठीची आहे. म्हणजेच अणुऊर्जा आयोगाची जी अन्य कामे आहेत, त्यावरील तरतूद वेगळी आहे. भविष्यातील आपली विजेची गरज आणि त्यासाठीचे नियोजन या दृष्टीने हे पुढचे पाऊल आहे. अणुऊर्जा निर्मितीच्या व्यापक विस्तारासाठी दीर्घकालीन नियोजन अत्यंत आवश्यक आहे. त्या दृष्टीने बजेटमधून चांगले संकेत मिळाले आहेत. या तरतुदीकडे फक्त आर्थिक किंवा तरतुदीच्या आकडेवारीच्या अंगाने पाहून चालणार नाही. कारण या दृश्य पडद्याच्या मागे अणुऊर्जेला बळ देणा-या घडामोडींना यातून वेग येणार आहे. अणु उत्तरदायित्वाचा मुद्दा जागतिक पातळीवर ऐरणीवर आल्यानंतर आपल्या अणुऊर्जा कार्यक्रमाच्या विस्ताराविषयी उद्योग जगताच्या मनात काहीसा संदेह निर्माण झाला होता. त्यातून आलेली मरगळ झटकून टाकण्याचा प्रयत्न बजेटमधील विशेष उल्लेखातून केला गेला आहे. अणुऊर्जेबाबत सरकार गंभीर आणि ठामही असल्याचा संदेश यातून मिळाला आहे. गाजावाजा किंवा विशेष उल्लेख न करताही अशी तरतूद करता येणे शक्य होते. पण तसे न करण्यामागे अणुऊर्जेकडे पाहण्यातील उद्योगजगताची मरगळ झटकणे आणि विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याचाच हेतू दिसतो. 
सध्या म्हणजे २०१६ साली आपण पाच हजार मेगावॅटहून काहीशी अधिक  वीज अणुऊर्जेच्या माध्यमातून निर्माण करतो. २०३२ सालापर्यंत अणुऊर्जा निर्मितीत भारताला ६३ हजार मेगावॅटचे लक्ष्य गाठायचे आहे. सध्या काम सुरू असलेले प्रकल्प पूर्ण झाले, की आजची क्षमता १३ हजार मेगावॅटच्या घरात पोहोचेल. तरीही उद्दिष्ट आणि वीज निर्मिती क्षमता यातील अंतर नजीकच्या भविष्यात जवळपास ५० हजार मेगावॅटचे असेल. ते नीट कापायचे तर दरवर्षी अणुऊर्जा निर्मितीत ३५०० मेगावॅटची भर पडावी लागेल. यंदाच्या बजेटमधील तरतूद त्यासाठी कशी पुरणार, असा प्रश्न पडू शकतो. पण हे काम केवळ या दृश्य तरतुदीवर होणे अपेक्षित नाही. ३० टक्के इक्विटी आणि ७० टक्के लोन व अर्थसंकल्पीय तरतुदीचे पाठबळ या त्रिसूत्रीतून हे ही मजल गाठायची आहे. त्यासाठी दरवर्षी १५ हजार कोटी उभे करावे लागतील. यातील मोठी रक्कम उभी करण्याइतपत सबळ स्रोत नॅशनल पॉवर कॉर्पोरेशनकडे आहेत. शिवाय एनटीपीसी किंवा इंडियन ऑइलसारख्या अन्य सार्वजनिक उपक्रमांकडूनही भरीव मदत मिळू शकते. किंबहुना त्याच दृष्टीने अलीकडेच अटॉमिक अॅक्टमध्ये सुधारणा केलेली आहे. एकाच हेतूने दोन सार्वजनिक उपक्रम एकत्र आले तर ती आता सरकारी कंपनीच मानली जाणार आहे. सरकार या विषयाकडे गंभीरपणे पाहात असल्याचा स्पष्ट संदेश या बजेटने दिल्याने अणुऊर्जा निर्मितीसाठी लागणा-या छोट्या-मोठ्या उत्पादनांच्या पुरवठ्यासाठी उद्योग जगत उत्साहाने पुढे येण्याजोगी स्थिती आजच्या घडीला निर्माण झाली आहे, जी निश्चितच आश्वासक आहे. 
(लेखक प्रख्यात अणुशास्त्रज आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष आहेत. )