शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर - राजनाथ सिंह

By admin | Updated: October 4, 2016 03:47 IST

भारतीय सुरक्षा दले दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत असल्याचे गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सोमवारी येथे सांगितले.

लेह : भारतीय सुरक्षा दले दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत असल्याचे गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सोमवारी येथे सांगितले. दक्षिण काश्मिरातील बारामुल्लामध्ये ४४ राष्ट्रीय रायफल्स आणि बीएसएफच्या छावण्यांवरील रविवारी रात्री झालेल्या हल्ल्यानंतर काही तासांनी राजनाथसिंह यांनी ही प्रतिक्रिया दिली. बारामुल्लातील या हल्ल्यात एक जवान शहीद, तर दुसरा एक जखमी झाला आहे. राज्यात सुरक्षा दलांवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत विचारले असता, ‘आमची सुरक्षा दले चोख प्रत्युत्तर देत आहेत,’ असे उत्तर गृहमंत्र्यांनी दिले. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केल्यानंतर, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर केलेला हा पहिला मोठा हल्ला आहे. या हल्ल्याच्या १५ दिवस आधी दहशतवाद्यांनी येथून १०२ कि. मी. अंतरावरील उरी येथे लष्करी ब्रिगेडच्या मुख्यालयावर हल्ला केला होता, यात १९ जवान शहीद झाले होते. 1गृहमंत्री काश्मीर मुद्दा सोडविण्यासाठी विविध वर्गातील लोकांशी चर्चा करून, त्यांचे विचार ऐकून घेण्याच्या उद्देशाने, लेह आणि कारगिलच्या दोनदिवसीय दौऱ्यावर आहेत. लद्दाखच्या दौऱ्याच्या उद्देशाची पत्रकारांनी विचारणा केल्यानंतर सिंह म्हणाले की, ‘लोकांशी चर्चा करून या भागातील समस्या जाणून घेण्यासाठी मी येथे आलो आहे. 2या भागातील लोकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. काश्मिरात हिंसाचार सुरू झाल्यापासून गृहमंत्र्यांचा हा चौथा दौरा आहे. या पूर्वी ते ४ व ५ सप्टेंबर रोजी सर्वपक्षीय शिष्टमंडळासह राज्याच्या दौऱ्यावर आले होते. तत्पूर्वी, २३, २४ जुलै आणि २४ व २५ आॅगस्टला त्यांनी राज्याचा दौरा केला होता.’