शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
2
“सार्वजनिक गणेशोत्सव आता ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’”; आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा
3
मोठ्या बॅटरीचे काय सांगता? वनप्लस नॉर्ड सीई ५ मध्ये मोठी अपग्रेड मिळालीय, पण कॅमेरा...
4
१.१० रुपयांवरून वर्षभरात ८,३८५% वाढून ९३,९४ वर पोहोचला हा शेअर; आजही लागलं अपर सर्किट
5
चांगूर बाबाचे दुबईपर्यंत नेटवर्क; महाराष्ट्र-युपीतील 1500 हिंदू तरुणींचे धर्मांतरण, चौकशीत खुलासा
6
IND vs ENG: लॉर्ड्स कसोटीपूर्वी इंग्लंडचा मोठा डाव, खेळपट्टीच बदलून टाकली, कुणाला मिळणार मदत?
7
आयपीएलमध्ये तिकीट घोटाळा, सीआयडीची मोठी कारवाई, हैदराबाद क्रिकेट संघटेनेच्या अध्यक्षांना अटक   
8
'पालिका प्लॅन' ON ! सांगली, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
9
दे दणादण! काँग्रेस कार्यकर्ते आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; माजी आमदार जखमी
10
Glen Industries IPO च्या GMP मध्ये तुफान तेजी; आतापर्यंत ४३ पट झाला सबक्राइब, पाहा डिटेल्स
11
Guru Purnima 2025: गुरु पौर्णिमेला सायंकाळी 'हा' उपाय करा; अडलेली कामे मार्गी लागतील!
12
पुन्हा प्रेमात पडला आदित्य रॉय कपूर? अनन्या पांडेनंतर आता 'या' मॉडेलसोबत डेटिंगच्या चर्चा
13
संजय शिरसाट यांना आयकर नोटीस; विट्स हॉटेल लिलावाच्या चौकशी आदेशानंतर दुसरा धक्का
14
उत्तरेत सुरू झाला, महाराष्ट्रात श्रावण कधीपासून? पाहा, यंदा किती श्रावणी सोमवार अन् महत्त्व
15
जुना मित्र पुन्हा कामाला आला! रशिया १० लाख भारतीयांना रोजगार देणार, कधीपर्यंत अर्ज करता येणार?
16
"मुंबई, महाराष्ट्रात मराठी माणसाला घर नाकारलं तर..."; मंत्री शंभूराज देसाईंची महत्त्वाची घोषणा
17
Airtel Recharge Plan: २०० रुपयांपेक्षा स्वस्तातील एअरटेलचे हे प्लान्स आहेत बेस्ट, WiFi असलेल्या लोकांना होणार मोठा फायदा
18
परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... 
19
Sindoor Bridge: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंदूर उड्डाणपुलाचे उद्घाटन
20
एका शब्दावरून निवडणूक आयोग अडकला, सर्वोच्च न्यायालयात मतदार पुनरावलोकनावरील सुनावणीवेळी झाली कोंडी

जवानांना सकस अन्न दिले जाते

By admin | Updated: February 10, 2017 01:09 IST

सशस्त्र पोलीस दलांतील जवानांना अन्न देताना उष्मांकांचे प्रमाण व इतर मानकांचे पालन करण्यात येते, असा सरकारचा दावा आहे. एका जवानाने सोशल मीडियाद्वारे निकृष्ट

नितीन अग्रवाल, नवी दिल्लीसशस्त्र पोलीस दलांतील जवानांना अन्न देताना उष्मांकांचे प्रमाण व इतर मानकांचे पालन करण्यात येते, असा सरकारचा दावा आहे. एका जवानाने सोशल मीडियाद्वारे निकृष्ट अन्नाची तक्रार केल्यानंतर या प्रकरणी चौकशी सुरू करून संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या आहेत. त्यानंतर सरकारने हा खुलासा केला, हे विशेष. सीमा सुरक्षा दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाला निकृष्ट अन्न दिले जात असल्याबद्दल सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकण्यात आला आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाकडून (सीआरपीएफ) अशा प्रकारच्या दोन तक्रारी मिळाल्या आहेत. तथापि, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून (सीआयएसएफ) अशी कोणतीही तक्रार प्राप्त झाली नाही, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत सांगितले. ते म्हणाले की, जवानांना सकस अन्न मिळावे, यासाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात आली आहेत. त्यानुसार, अधिकाऱ्यांना चौक्यांच्या भेटीदरम्यान जवानांचे राहणीमान, कपडे, जेवण यासह त्यांच्या उपकरणांच्या स्थितीची तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.