शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
4
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
5
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
6
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
7
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
8
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
9
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
10
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
11
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
12
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
13
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
14
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
15
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
16
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
17
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
18
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
19
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
20
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण

जवानांना सकस अन्न दिले जाते

By admin | Updated: February 10, 2017 01:09 IST

सशस्त्र पोलीस दलांतील जवानांना अन्न देताना उष्मांकांचे प्रमाण व इतर मानकांचे पालन करण्यात येते, असा सरकारचा दावा आहे. एका जवानाने सोशल मीडियाद्वारे निकृष्ट

नितीन अग्रवाल, नवी दिल्लीसशस्त्र पोलीस दलांतील जवानांना अन्न देताना उष्मांकांचे प्रमाण व इतर मानकांचे पालन करण्यात येते, असा सरकारचा दावा आहे. एका जवानाने सोशल मीडियाद्वारे निकृष्ट अन्नाची तक्रार केल्यानंतर या प्रकरणी चौकशी सुरू करून संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या आहेत. त्यानंतर सरकारने हा खुलासा केला, हे विशेष. सीमा सुरक्षा दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाला निकृष्ट अन्न दिले जात असल्याबद्दल सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकण्यात आला आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाकडून (सीआरपीएफ) अशा प्रकारच्या दोन तक्रारी मिळाल्या आहेत. तथापि, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून (सीआयएसएफ) अशी कोणतीही तक्रार प्राप्त झाली नाही, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत सांगितले. ते म्हणाले की, जवानांना सकस अन्न मिळावे, यासाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात आली आहेत. त्यानुसार, अधिकाऱ्यांना चौक्यांच्या भेटीदरम्यान जवानांचे राहणीमान, कपडे, जेवण यासह त्यांच्या उपकरणांच्या स्थितीची तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.