शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

चांगले दिवस आता गेले - शरद पवार

By admin | Updated: September 26, 2014 01:54 IST

केंद्रातील मोदी सरकारने साखर व दूधपावडर निर्यातीवरील अनुदान बंद केल्याने देशातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे

नवी मुंबई : केंद्रातील मोदी सरकारने साखर व दूधपावडर निर्यातीवरील अनुदान बंद केल्याने देशातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. केंद्रातील आताच्या सरकारमुळे चांगले दिवस आता गेल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली असून, आगामी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे. नवी मुंबईमधील बाजार समितीमध्ये माथाडी नेते अण्णासाहेब पाटील जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनतर्फे झालेल्या माथाडी मेळाव्यात पवार बोलत होते. ते म्हणाले की, काही दिवस देश व राज्यातील वातावरण वेगळे झाले होते. यामुळे केंद्रातील सत्तेत बदल झाला. चांगले दिवस येणार, असे स्वप्न दाखविल्यामुळे लोकांनी हा बदल घडविला. परंतु चांगल्या दिवसांचे स्वप्न भंगले आहे. कृषिमंत्री असताना साखर व दूधपावडर निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले. निर्यात करताना नुकसान झाल्यास अनुदान देण्यास सुरुवात केली. परंतु आताच्या सरकारने हे अनुदान बंद केले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार असून, आपले शेतकरी जगातील मोठ्या देशांशी स्पर्धा कशी करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. माथाडी संघटनेला न्याय देण्यासाठी अण्णासाहेब पाटील यांनी आयुष्यभर संघर्ष केला. कामगारांना न्याय मिळवून देणारी अशी संघटना देशात नाही. आता झाडावर बांडगुळे वाढल्याप्रमाणे काही संघटना झाल्या असून ते कामगारांना न्याय देऊ शकत नाहीत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसच्या पाठीशी ठामपणे उभे राहा, आपली माणसे विधानसभेवर पाठवा, असे आवाहनही पवार यांनी या वेळी केले.ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनीही माथाडी व प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी शरद पवार यांनी खूप सहकार्य केल्याचे सांगितले. माथाडी नेते व जलसंपदामंत्री (कृष्णा खोरे) शशिकांत शिंदे व आमदार नरेंद्र पाटील यांनी कामगारांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी)