शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

चांगले दिवस आता गेले - शरद पवार

By admin | Updated: September 26, 2014 01:54 IST

केंद्रातील मोदी सरकारने साखर व दूधपावडर निर्यातीवरील अनुदान बंद केल्याने देशातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे

नवी मुंबई : केंद्रातील मोदी सरकारने साखर व दूधपावडर निर्यातीवरील अनुदान बंद केल्याने देशातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. केंद्रातील आताच्या सरकारमुळे चांगले दिवस आता गेल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली असून, आगामी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे. नवी मुंबईमधील बाजार समितीमध्ये माथाडी नेते अण्णासाहेब पाटील जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनतर्फे झालेल्या माथाडी मेळाव्यात पवार बोलत होते. ते म्हणाले की, काही दिवस देश व राज्यातील वातावरण वेगळे झाले होते. यामुळे केंद्रातील सत्तेत बदल झाला. चांगले दिवस येणार, असे स्वप्न दाखविल्यामुळे लोकांनी हा बदल घडविला. परंतु चांगल्या दिवसांचे स्वप्न भंगले आहे. कृषिमंत्री असताना साखर व दूधपावडर निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले. निर्यात करताना नुकसान झाल्यास अनुदान देण्यास सुरुवात केली. परंतु आताच्या सरकारने हे अनुदान बंद केले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार असून, आपले शेतकरी जगातील मोठ्या देशांशी स्पर्धा कशी करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. माथाडी संघटनेला न्याय देण्यासाठी अण्णासाहेब पाटील यांनी आयुष्यभर संघर्ष केला. कामगारांना न्याय मिळवून देणारी अशी संघटना देशात नाही. आता झाडावर बांडगुळे वाढल्याप्रमाणे काही संघटना झाल्या असून ते कामगारांना न्याय देऊ शकत नाहीत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसच्या पाठीशी ठामपणे उभे राहा, आपली माणसे विधानसभेवर पाठवा, असे आवाहनही पवार यांनी या वेळी केले.ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनीही माथाडी व प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी शरद पवार यांनी खूप सहकार्य केल्याचे सांगितले. माथाडी नेते व जलसंपदामंत्री (कृष्णा खोरे) शशिकांत शिंदे व आमदार नरेंद्र पाटील यांनी कामगारांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी)