शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

तीर्थस्थळांचे कचरा व्यवस्थापन कसोशीने करण्याचा निर्धार

By admin | Updated: October 29, 2015 22:07 IST

भारतात हिंदूंची देवालये अन्यधर्मीय प्रार्थनास्थळांच्या तुलनेत सर्वाधिक अस्वच्छ कशी, हा कळीचा सवाल सोशल साईट््सवर उपस्थित होताच

सुरेश भटेवरा, नवी दिल्लीभारतात हिंदूंची देवालये अन्यधर्मीय प्रार्थनास्थळांच्या तुलनेत सर्वाधिक अस्वच्छ कशी, हा कळीचा सवाल सोशल साईट््सवर उपस्थित होताच, प्रमुख तीर्थस्थळे स्वच्छ व सुंदर बनवण्याची मोहीम केंद्रीय पर्यटन, तसेच केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने हाती घेतली आहे. तीर्थस्थळांवर मोठ्या प्रमाणावर गोळा होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रचलित नियमावलीत सुधारणा करण्याबरोबरच राज्य सरकारांनाही या मोहिमेत सहभागी करून घेण्याचे केंद्राने ठरवले आहे.हिंदू देवालयात खरी समस्या देवाला अर्पण केल्या जाणाऱ्या फुला- पानांसह पूजा साहित्यातून गोळा होणाऱ्या निर्माल्याच्या विल्हेवाटीची आहे. भाविकांच्या धार्मिक भावना न दुखावता या निर्माल्याची विल्हेवाट योग्यप्रकारे कशी लावता येईल, यावर व्यापक विचारविनिमय सध्या सुरू आहे. प्लास्टिकवर सर्रास बंदी घालण्याऐवजी राज्य सरकारच्या सहकार्याने तीर्थस्थळांवर प्लास्टिक उत्पादनांचे वैज्ञानिक पद्धतीने रिसायकलिंग करण्याची जबाबदारी वितरकांवर सोपवण्याचे कडक निर्बंधही लवकरच घालण्यात येणार आहेत. तीर्थस्थळांवर गोळा होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन कशाप्रकारे करावे, यासंबंधी राज्य सरकारांकडूनही सूचना मागवण्यात आल्या आहेत. राज्यांनी अनेक चांगले प्रस्तावही पाठवले आहेत. या कचरा व्यवस्थापनात मुख्य भूमिका नगरपालिका, महानगरपालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांना वठवावी लागणार आहे. देवालयातल्या जलाभिषेकाचे पाणी, तेल, तूप, दूध, पंचामृत, नैवेद्यात वाहिलेली फळे, इत्यादी गोष्टी अनेक ठिकाणी गटाराद्वारे गंगेच्या प्रवाहात सोडल्या जातात. नव्या नियमांनुसार तीर्थस्थळाच्या गावात सांडपाण्याचे नाले, गटारी यांचे योग्य प्रकारे निस्सारण (रिसायकलिंग) केल्यानंतरच हे पाणी नद्यांमधे सोडता येईल. त्याच्या कठोर प्रबंधनाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची असेल.