शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तीर्थस्थळांचे कचरा व्यवस्थापन कसोशीने करण्याचा निर्धार

By admin | Updated: October 29, 2015 22:07 IST

भारतात हिंदूंची देवालये अन्यधर्मीय प्रार्थनास्थळांच्या तुलनेत सर्वाधिक अस्वच्छ कशी, हा कळीचा सवाल सोशल साईट््सवर उपस्थित होताच

सुरेश भटेवरा, नवी दिल्लीभारतात हिंदूंची देवालये अन्यधर्मीय प्रार्थनास्थळांच्या तुलनेत सर्वाधिक अस्वच्छ कशी, हा कळीचा सवाल सोशल साईट््सवर उपस्थित होताच, प्रमुख तीर्थस्थळे स्वच्छ व सुंदर बनवण्याची मोहीम केंद्रीय पर्यटन, तसेच केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने हाती घेतली आहे. तीर्थस्थळांवर मोठ्या प्रमाणावर गोळा होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रचलित नियमावलीत सुधारणा करण्याबरोबरच राज्य सरकारांनाही या मोहिमेत सहभागी करून घेण्याचे केंद्राने ठरवले आहे.हिंदू देवालयात खरी समस्या देवाला अर्पण केल्या जाणाऱ्या फुला- पानांसह पूजा साहित्यातून गोळा होणाऱ्या निर्माल्याच्या विल्हेवाटीची आहे. भाविकांच्या धार्मिक भावना न दुखावता या निर्माल्याची विल्हेवाट योग्यप्रकारे कशी लावता येईल, यावर व्यापक विचारविनिमय सध्या सुरू आहे. प्लास्टिकवर सर्रास बंदी घालण्याऐवजी राज्य सरकारच्या सहकार्याने तीर्थस्थळांवर प्लास्टिक उत्पादनांचे वैज्ञानिक पद्धतीने रिसायकलिंग करण्याची जबाबदारी वितरकांवर सोपवण्याचे कडक निर्बंधही लवकरच घालण्यात येणार आहेत. तीर्थस्थळांवर गोळा होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन कशाप्रकारे करावे, यासंबंधी राज्य सरकारांकडूनही सूचना मागवण्यात आल्या आहेत. राज्यांनी अनेक चांगले प्रस्तावही पाठवले आहेत. या कचरा व्यवस्थापनात मुख्य भूमिका नगरपालिका, महानगरपालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांना वठवावी लागणार आहे. देवालयातल्या जलाभिषेकाचे पाणी, तेल, तूप, दूध, पंचामृत, नैवेद्यात वाहिलेली फळे, इत्यादी गोष्टी अनेक ठिकाणी गटाराद्वारे गंगेच्या प्रवाहात सोडल्या जातात. नव्या नियमांनुसार तीर्थस्थळाच्या गावात सांडपाण्याचे नाले, गटारी यांचे योग्य प्रकारे निस्सारण (रिसायकलिंग) केल्यानंतरच हे पाणी नद्यांमधे सोडता येईल. त्याच्या कठोर प्रबंधनाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची असेल.