शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

पासपोर्ट कमी काळात देण्यात गोवा अव्वल !

By admin | Updated: July 28, 2016 00:50 IST

पासपोर्ट देण्यात गोवा आणि पंजाबमधील जालंधरने तत्परता दाखवत ठरवून दिलेल्या २१ दिवसांच्या वेळेपूर्वी काम पूर्ण केले, तर महाराष्ट्रातील ठाणे येथील पोलिसांनी व्हेरिफिकेशनचे काम

- हरीश गुप्ता,  नवी दिल्ली

पासपोर्ट देण्यात गोवा आणि पंजाबमधील जालंधरने तत्परता दाखवत ठरवून दिलेल्या २१ दिवसांच्या वेळेपूर्वी काम पूर्ण केले, तर महाराष्ट्रातील ठाणे येथील पोलिसांनी व्हेरिफिकेशनचे काम करण्यासाठी ६१ दिवसांचा वेळ घेतला. परिणामी, केवळ ९ टक्केच अर्जदारांचे काम पूर्ण होऊ शकले.‘लोकमत’च्या हाती लागलेल्या तपशिलानुसार, महाराष्ट्रातील केवळ ठाणेच नव्हे, तर इतरही महत्त्वाच्या शहरांनी पोलीस व्हेरिफिकेशनसाठी खूपच वेळ घेतलेला आहे. २०१५-१६ दरम्यान, पुणे पोलिसांनी यासाठी ६५ दिवसांचा वेळ घेतला व केवळ १८ टक्के अर्जांची पूर्तता केली. नागपुरातही फारशी वेगळी स्थिती नव्हती. तेथे पोलिसांनी ४४ दिवस घेतले व केवळ २२ टक्केच अर्जांची पूर्तता केली. मुंबईत त्या तुलनेत थोडी बरी स्थिती आहे. तेथे पोलिसांनी २६ दिवसांत आपले काम पूर्ण केले व ६९ टक्के पासपोर्टची मागणी पूर्ण होऊ शकली. २०१३-१४ मध्ये यासाठी मुंबई पोलिसांनी तब्बल ७४ दिवसांचा वेळ घेतला व केवळ ३ टक्केच अर्जदारांचे काम पूर्ण झाले. २०१४-१५ मध्ये कामगिरी थोडीशी सुधारत २८ टक्के अर्जदारांचे काम ६० दिवसांत पूर्ण झाले. २०१५-१६ मध्ये मात्र कामगिरी सुधारत, मुंबईने ६९ टक्के अर्जांची पूर्तता केली. सुषमा स्वराज यांच्या नेतृत्वाखालील परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सांगण्यानंतर राज्य सरकारनेही याबाबत कमालीची गती घेतली. गोव्याने तर २०१५-१६ मध्ये अर्ज २१ दिवसांऐवजी केवळ १२ दिवसांतच पूर्णत्वाला नेले. जालंधरनेही याबाबत गतीने काम करताना १५ दिवसांत अर्जांची पूर्तता केली. गुवाहाटी (६ टक्के), श्रीनगर (१ टक्के) आणि जम्मू (२ टक्के) यांनी पासपोर्ट देण्याबाबतच्या यादीत तळ गाठला. मेट्रोंमध्ये कोलकत्याने २०१५-१६ मध्ये २० टक्क्यांची सर्वांत वाईट कामगिरी केली. पाटण्यानेही कोलकात्याची बरोबरी केली. हैदराबादने ९७ टक्के, दिल्लीने ९३ टक्के, चेन्नईने ६७ टक्के, लखनऊने ६० टक्के, तर बंगळुरूने ५० टक्के कामगिरी केली.कामगिरी सुधारलीदेशाने पासपोर्ट अर्जांची पूर्तता करण्याची कामगिरी २०१५-१६ मध्ये ६४ टक्क्यांपर्यंत सुधारून सरासरी ३२ दिवसांत हे काम पूर्णत्वास नेले. ८६.४० लाख या संख्येच्या अर्जदारांना पासपोर्ट देण्यात आले. २०१३-१४ मध्ये तब्बल ६५.३७ लाख जणांना पासपोर्ट देण्यात आले. त्यावर्षी सरासरी ४७ दिवसांचा कालावधी लागला आणि प्रमाण होते ३९ टक्के.