शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

पासपोर्ट कमी काळात देण्यात गोवा अव्वल !

By admin | Updated: July 28, 2016 00:50 IST

पासपोर्ट देण्यात गोवा आणि पंजाबमधील जालंधरने तत्परता दाखवत ठरवून दिलेल्या २१ दिवसांच्या वेळेपूर्वी काम पूर्ण केले, तर महाराष्ट्रातील ठाणे येथील पोलिसांनी व्हेरिफिकेशनचे काम

- हरीश गुप्ता,  नवी दिल्ली

पासपोर्ट देण्यात गोवा आणि पंजाबमधील जालंधरने तत्परता दाखवत ठरवून दिलेल्या २१ दिवसांच्या वेळेपूर्वी काम पूर्ण केले, तर महाराष्ट्रातील ठाणे येथील पोलिसांनी व्हेरिफिकेशनचे काम करण्यासाठी ६१ दिवसांचा वेळ घेतला. परिणामी, केवळ ९ टक्केच अर्जदारांचे काम पूर्ण होऊ शकले.‘लोकमत’च्या हाती लागलेल्या तपशिलानुसार, महाराष्ट्रातील केवळ ठाणेच नव्हे, तर इतरही महत्त्वाच्या शहरांनी पोलीस व्हेरिफिकेशनसाठी खूपच वेळ घेतलेला आहे. २०१५-१६ दरम्यान, पुणे पोलिसांनी यासाठी ६५ दिवसांचा वेळ घेतला व केवळ १८ टक्के अर्जांची पूर्तता केली. नागपुरातही फारशी वेगळी स्थिती नव्हती. तेथे पोलिसांनी ४४ दिवस घेतले व केवळ २२ टक्केच अर्जांची पूर्तता केली. मुंबईत त्या तुलनेत थोडी बरी स्थिती आहे. तेथे पोलिसांनी २६ दिवसांत आपले काम पूर्ण केले व ६९ टक्के पासपोर्टची मागणी पूर्ण होऊ शकली. २०१३-१४ मध्ये यासाठी मुंबई पोलिसांनी तब्बल ७४ दिवसांचा वेळ घेतला व केवळ ३ टक्केच अर्जदारांचे काम पूर्ण झाले. २०१४-१५ मध्ये कामगिरी थोडीशी सुधारत २८ टक्के अर्जदारांचे काम ६० दिवसांत पूर्ण झाले. २०१५-१६ मध्ये मात्र कामगिरी सुधारत, मुंबईने ६९ टक्के अर्जांची पूर्तता केली. सुषमा स्वराज यांच्या नेतृत्वाखालील परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सांगण्यानंतर राज्य सरकारनेही याबाबत कमालीची गती घेतली. गोव्याने तर २०१५-१६ मध्ये अर्ज २१ दिवसांऐवजी केवळ १२ दिवसांतच पूर्णत्वाला नेले. जालंधरनेही याबाबत गतीने काम करताना १५ दिवसांत अर्जांची पूर्तता केली. गुवाहाटी (६ टक्के), श्रीनगर (१ टक्के) आणि जम्मू (२ टक्के) यांनी पासपोर्ट देण्याबाबतच्या यादीत तळ गाठला. मेट्रोंमध्ये कोलकत्याने २०१५-१६ मध्ये २० टक्क्यांची सर्वांत वाईट कामगिरी केली. पाटण्यानेही कोलकात्याची बरोबरी केली. हैदराबादने ९७ टक्के, दिल्लीने ९३ टक्के, चेन्नईने ६७ टक्के, लखनऊने ६० टक्के, तर बंगळुरूने ५० टक्के कामगिरी केली.कामगिरी सुधारलीदेशाने पासपोर्ट अर्जांची पूर्तता करण्याची कामगिरी २०१५-१६ मध्ये ६४ टक्क्यांपर्यंत सुधारून सरासरी ३२ दिवसांत हे काम पूर्णत्वास नेले. ८६.४० लाख या संख्येच्या अर्जदारांना पासपोर्ट देण्यात आले. २०१३-१४ मध्ये तब्बल ६५.३७ लाख जणांना पासपोर्ट देण्यात आले. त्यावर्षी सरासरी ४७ दिवसांचा कालावधी लागला आणि प्रमाण होते ३९ टक्के.