शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

भाषा हा वैश्विकतेचा पासवर्ड (जोड १)

By admin | Updated: March 21, 2015 00:15 IST

नव्या लेखकांना सल्ला देताना त्यांनी सांगितले की, आपल्या लेखनाला मिळणार्‍या प्रतिसादावर लक्ष ठेवून त्याचा सकारात्मक विचार करायला हवा. आपला देश हा बहुसांस्कृतिक असून, त्या दृष्टीने आपल्या भाषाही बहुविध व्हाव्यात. त्या तुंबून राहायला नकोत. विद्यापीठांमध्ये त्याबाबत आदान-प्रदान व्हायला हवे. माधवी धारणकर यांनी प्रास्ताविक केले. मनोडॉ. माधुरी सोनवणे, डॉ. मधुकर शेवाळे, विजया पाटील यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. नागार्जुन वाडेकर यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. प्रफुल्ल चिकेरूर यांनी सूत्रसंचालन केले.

नव्या लेखकांना सल्ला देताना त्यांनी सांगितले की, आपल्या लेखनाला मिळणार्‍या प्रतिसादावर लक्ष ठेवून त्याचा सकारात्मक विचार करायला हवा. आपला देश हा बहुसांस्कृतिक असून, त्या दृष्टीने आपल्या भाषाही बहुविध व्हाव्यात. त्या तुंबून राहायला नकोत. विद्यापीठांमध्ये त्याबाबत आदान-प्रदान व्हायला हवे. माधवी धारणकर यांनी प्रास्ताविक केले. मनोडॉ. माधुरी सोनवणे, डॉ. मधुकर शेवाळे, विजया पाटील यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. नागार्जुन वाडेकर यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. प्रफुल्ल चिकेरूर यांनी सूत्रसंचालन केले. इन्फो :तेथून न जेवताच निघालो...कुलगुरू डॉ. साळुंखे यांनीही अध्यक्षीय मनोगतात पाश्चात्त्यांवर टीका केली. आपण ऑस्ट्रेलियात असताना एका कुटुंबाने जेवायला बोलावले. त्यांनी भारताची वाईट प्रतिमा निर्माण होईल, अशी छायाचित्रे आपल्याला दाखवली. त्यामुळे आपण तेथून न जेवताच बाहेर पडलो, असे ते म्हणाले. एका भाषेतील साहित्य हे दुसर्‍या भाषेत पोहोचायला हवे. ईशान्येकडील राज्यांमध्ये स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर जवळपास समान असून, तेथे विवाहासारखे समारंभ अत्यंत कमी खर्चात साजरे केले जातात. त्यांचे पुरोगामित्व महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. भाषांमध्ये नाते निर्माण व्हावे : अरुण साधूसाधू यांनी भाषेबद्दल सखोल चिंतन केले. जागतिकीकरणामुळे देशातील प्रादेशिक भाषा व बहुसांस्कृतिकतेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आपल्याला अमेरिका, स्वीडनमधील लेखकांची नावे माहीत असतात; पण तमिळनाडूतील मुरुगन या लेखकाचा छळ सुरू झाल्यावरच तो आपल्याला माहीत होतो. मराठी, हिंदी वा बंगालीमधील मोजकेच देशी साहित्यिक आपण ओळखत असतो. सध्या प्रादेशिक भाषांतील आदानप्रदान पूर्णत: थांबले असून, ते फक्त नॅशनल बुक ट्रस्ट, साहित्य अकादमी या संस्थांपुरतेच मर्यादित राहिले आहे. लोकशाहीचा प्रयोग यशस्वी होण्यासाठी सर्व भाषांमध्ये जवळचे नाते निर्माण होणे गरजेचे आहे. अशा संस्था निर्माण व्हाव्यात. स्थानिक भाषेतून वैश्विक अनुभव लिहिणारे लोक सर्व भाषांत आहेत. आपण फक्त डोळे उघडे ठेवून पाहायला हवे. तथापि, इंग्रजीचा तिटकाराही करता कामा नये, असेही ते म्हणाले. फोटो आहे : २० पीएचएमआर १०६कॅप्शन : नागालॅँड येथील ज्येष्ठ साहित्यिक तेमसुला आओ यांना कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार प्रदान करताना अरुण साधू. समवेत पंडित गवळी, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. जगदीश अरोरा, माधवी धारणकर.