शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

जि.प.ला १०० हेक्टर पर्यंतच्या सिंचनाची कामे द्या

By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST

सरकारकडे मागणी : जिल्‘ातील कामांना गती मिळणार

सरकारकडे मागणी : जिल्ह्यातील कामांना गती मिळणार
नागपूर : जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी, यासाठी ० ते १०० हेक्टरपर्यंत सिंचन क्षमता असलेल्या तलाव व बंधाऱ्यांची कामे जिल्हा परिषदेला देण्यात यावी, अशी पदाधिकारी व सदस्यांची मागणी आहे. याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला आहे.
गत काळात १०० हेक्टरपर्यंत क्षमता असलेल्या सिंचन प्रकल्पांची कामे जि.प.च्या माध्यमातून केली जात होती. परंतु मागील काही वर्षांपासून ही कामे लोकल सेक्टर(स्थानिक स्तर) विभागाच्या माध्यमातून केली जातात. ग्रामीण भागात पंचायत समित्या व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जि.प.चे सर्वत्र जाळे आहे. सक्षम यंत्रणा असूनही ही कामे करण्याचे अधिकार काढून घेतले.
सिंचन विभागाप्रमाणेच कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना जि.प.च्या कृषी विभागामार्फत न राबविता त्या राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत राबविल्या जातात. योजना राबविताना जि.प.सदस्य व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे गरजूंना अशा योजनांचा लाभ मिळत नसल्याची सदस्यांची तक्र ार आहे. सर्वसाधारण सभा, स्थायी समितीत हा प्रश्न सदस्यांकडून वेळोवेळी उपस्थित केला जातो. परंतु शासन स्तरावर पुरेसा पाठपुरावा न झाल्याने ही कामे जि.प.ला परत मिळालेली नाही.(प्रतिनिधी)
चौकट...
सिंचन क्षमता घटली
जिल्ह्यात १२३ लघु सिंचन तलाव, ६३ पाझर तलाव, ३९ गाव तलाव, २१४ मालगुजारी तलाव, ८८७ साठवण बंधारे, ७२८ कोल्हापुरी बंधारे आहेत. परंतु यात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. लोकल सेक्टरकडून यावर निधी खर्च केला जात नाही. दुसरीकडे जि.प.च्या सिंचन विभागाकडे निधी नसल्याने साठवण क्षमता कमी होऊ न सिंचन घटले आहे.
चौकट...
पालकमंत्र्यांकडे मागणी
१०० हेक्टरपर्यंत सिंचन क्षमता असलेल्या तलाव व बंधाऱ्यांची कामे करण्याचे अधिकार जि.प.च्या सिंचन विभागाला परत मिळावे, अशी मागणी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली असल्याची माहिती अध्यक्ष निशा सावरकर यांनी दिली.