शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

जेएनयूमध्ये लष्करी रणगाडा द्या; कुलगुरू एम जगदेश कुमार यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 12:25 IST

जेएनयूचे कुलगुरू एम जगदेश कुमार यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि जनरल व्ही.के. सिंह यांच्याकडे संस्थेच्या आवारात ठेवण्यासाठी लष्करी रणगाडा द्यावा, अशी मागणी केली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 24- देशविरोधी घोषणाबाजीमुळे चर्चेत आलेलं दिल्लीचं जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे. जेएनयूचे कुलगुरू एम जगदेश कुमार यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि जनरल व्ही.के. सिंह यांच्याकडे संस्थेच्या आवारात ठेवण्यासाठी लष्करी रणगाडा द्यावा, अशी मागणी केली आहे. जेएनयूमध्ये हा रणगाडा ठेवला तर तेथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतीय सैन्याने दिलेल्या बलिदानाचं नेहमी स्मरण होत राहील, असं एम जगदेश कुमार यांचं मत आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पहिल्यांदाच कारगिल विजय दिवस साजरा केला गेला. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू एम जगदेश कुमार यांनी हे वक्तव्य केलं आहे. कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने शहिदांच्या स्मरणार्थ जेएनयूचं गेट ते कन्वेंशन सेंटरपर्यंत 2200 फूटाच्या झेंड्यासह तिरंगा मार्च काढण्यात आला. 
आणखी वाचा
 

एकवेळ डोंगर हलवणं सोपं, पण आम्हाला नाही...चीनची भारताला धमकी

१९७१ च्या युद्धाचे पाकने भान ठेवावे!

लष्करी उपकरणे, सुटे भाग भारतात विकसित करणार

भारतीय सैन्याने देशाच्या सुरक्षिततेसाठी दिलेल्या बलिदानामुळे कारगिल विजय दिवस हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. यानिमित्ताने मी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि व्ही.के. सिंह यांना विनंती करतो की, त्यांनी जेएनयूमध्ये लष्करी रणगाडा आणण्यासाठी आम्हाला मदत करावी. हा रणगाडा संस्थेच्या आवारात ठेवला जाईल. जेणेकरून या ठिकाणाहून जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सैन्याच्या बलिदानाचं आणि त्यांच्या उज्ज्वल परंपरेचं भान राहील, असं यावेळी एम जगदेश कुमार म्हणाले आहेत. 

फेब्रुवारी २०१६ मध्ये जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांकडून निदर्शनं करण्यात आली होती. त्यावेळी काही विद्यार्थ्यांनी देशविरोधी घोषणा दिल्या होत्या. यावरून अनेकजणांना अटकही झाली होती. हे प्रकरण देशभरात चांगलंच गाजलं होतं. त्यावेळी पहिल्यांदा जेएनयूमध्ये ‘राष्ट्रवादाचे प्रतिक’ म्हणून रणगाडा ठेवण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आता विद्यापीठाचे कुलगुरू एम जगदेश कुमार यांनीच ही मागणी उचलून धरली आहे. जेएनयूतील या सोहळ्यात धर्मेंद्र प्रधान, व्ही.के. सिंह, क्रिकेटपटू गौतम गंभीर, निवृत्त मेजर जनरल जी.डी. बक्षी, लेखक राजीव मल्होत्रा उपस्थित होते.