शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भारतरत्न द्यायला उशीरच - सी के बोस

By admin | Updated: August 10, 2014 18:41 IST

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भारत्न रत्न पुरस्कारासाठी शिफारस केल्याचे वृत्त समोर येत असतानाच नेताजींच्या नातेवाईकांनी याविषयी नाराजी दर्शवली आहे.

ऑनलाइन टीम

कोलकाता, दि. १० -  नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भारत्न रत्न पुरस्कारासाठी शिफारस केल्याचे वृत्त समोर येत असतानाच नेताजींच्या नातेवाईकांनी याविषयी नाराजी दर्शवली आहे. नेताजींना भारतरत्न देण्यास उशीर झाला असून आता केंद्र सरकारने त्यांना भारतरत्न देण्याऐवजी त्यांच्या बेपत्ता प्रकरणातील गोपनीय दस्तावेज उघड करावे अशी मागणी नेताजींच्या नातेवाईकांनी केली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासह पाच जणांची भारत रत्न पुरस्कारासाठी शिफारस केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर नेताजींचे पणतू चंद्रकुमार बोस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींना जर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा सन्मान करायचा असेल तर त्यांनी नेताजींच्या बेपत्ता होण्याचे गुढ उकलावे. नेताजींच्या बेपत्ता होण्यासंदर्भातील सुमारे १०० गोपनीय फाईल्स केंद्र सरकारकडे पडून आहेत. ही सर्व कागदपत्र जनतेसाठी उघड करा आणि त्यामुळे सत्य सर्वांसमोर येईल. नेताजींच्या बेपत्ता होण्यामागचे गुढ उकलण्यासाठी विशेष तपास पथक नेमावे अशी मागणीही त्यांनी केली. नेताजींना भारत रत्न पुरस्कार देण्यास उशीर झाला अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली. 
सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी हे भारतरत्न पुरस्कारापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती आहेत. विश्व रत्न पुरस्कार असता तर तो नेताजींना मिळाला असता असे सुगाता बोस यांनी सांगितले.