शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

वरातीमुळे गेला मुलीचा जीव, मध्य प्रदेशातील घटना; रुग्णवाहिकेला दिला नाही रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 03:34 IST

लग्नाच्या वरातीमुळे एका दीड वर्षाच्या चिमुरडीला आपला जीव गमवावा लागला असल्याची दुर्दैवी घटना नुकतीच मध्य प्रदेशातील दमोहमध्ये घडली.

दामोह : लग्नाच्या वरातीमुळे एका दीड वर्षाच्या चिमुरडीला आपला जीव गमवावा लागला असल्याची दुर्दैवी घटना नुकतीच मध्य प्रदेशातील दमोहमध्ये घडली. नंदरई पथरिया गावातील चिमुरडीला विंचू चावला होता. उपचारासाठी तिला जिल्हा रुग्णालयात नेले जात होते, पण लग्नाच्या वरातीमुळे रुग्णवाहिका अर्धा तास रस्त्यावर अडकून पडली आणि मुलीचा मृत्यू झाला.भूमी विश्वकर्मा या चिमुरडीला विषारी विंचू चावला. आधी तिला आरोग्य केंद्रात नेण्यात आले, पण तिला जिल्हा रुग्णालयात नेण्यास डॉक्टरांनी सांगितले. दीड वर्षाच्या भूमीसाठी रुग्णवाहिका बोलाविण्यात आली. तिने ३२ किलोमीटरचे अंतर काही मिनिटांत पार केले, पण जिल्हा रुग्णालयात पोहोचण्याच्या अर्धा किलोमीटर आधी वरातीच्या गर्दीत रुग्णवाहिका अडकली.रुग्णवाहिका चालक व मुलीचे वडील यांनी वरातीतील लोकांना रस्ता देण्यासाठी विनंती केली. त्यासाठी ते सुमारे २५ मिनिटे प्रयत्न करीत होते. अखेर दुभाजकावरून चालकाने रुग्णवाहिका पुढे काढली आणि भूमीला रुग्णालयात पोहोचविले, पण रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी भूमीला मृत घोषित केले. (वृत्तसंस्था)लोक वरातीमध्ये नाचण्यात इतके दंग होते की, त्यांना रुग्णवाहिकेत मृत्यूशी झुंज देणारी ती चिमुरडी दिसलीच नाही. भूमीच्या मृत्यूला हे लोकच कारणीभूत ठरले. पोलीस अधीक्षक विवेक अग्रवाल म्हणाले की, ही अतिशय दु:खद घटना आहे. या प्रकरणातील दोषींवर निश्चित कारवाई केली जाईल.