शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

मुलींना मोबाईल वापरण्यास बंदी

By admin | Updated: February 21, 2016 00:59 IST

मोबाईलमुळे मुली बिघडत असल्याचे सांगत अलिगढमधील एका गावच्या खाप पंचायतीने १८ वर्षांखालील मुलींना मोबाईल वापरण्यास बंदी घातली आहे. एवढेच नाही तर बंदीचे उल्लंघन

अलिगढ : मोबाईलमुळे मुली बिघडत असल्याचे सांगत अलिगढमधील एका गावच्या खाप पंचायतीने १८ वर्षांखालील मुलींना मोबाईल वापरण्यास बंदी घातली आहे. एवढेच नाही तर बंदीचे उल्लंघन करणाऱ्या मुलीच्या कुटुंबियांना गावचे रस्ते स्वच्छ करण्याची शिक्षा भोगावी लागेल, असेही जाहीर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत प्रत्येक नागरिकाला स्मार्टफोनद्वारे जोडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू झाला असतानाच इगलस तालुक्यातील बसौली गावच्या पंचायतीने बंदीचा निर्णय घेतला, हे उल्लेखनीय. बसौली गावच्या खाप पंचायतीने आपल्या आदेशात म्हटले आहे की, गावातील अविवाहित मुली मोबाईल किंवा सोशल मीडियाचा वापर करणार नाहीत. मोबाईल वापरताना पकडले गेल्यास संबंधित मुलीच्या कुटुंबियांना गावातील पाचशे मीटरचा रस्ता सलग पाच दिवस स्वच्छ करावा लागेल किंवा मग एक हजार रुपये दंड होईल. (वृत्तसंस्था)मोबाईलच्या वापरामुळे मुलींचे मुलांशी संबंध निर्माण होऊन त्यांचे आयुष्य बरबाद होते. एवढेच नाही तर त्यांच्याविरुद्ध गुन्हाही घडतो. आमच्या काळात अशा समस्या नव्हत्या; मात्र या तंत्रज्ञानामुळे मुलींच्या आयुष्याची हानी होत असून आम्हाला त्याला आळा घालायचा आहे, असे पंचायतीचे समन्वयक रामवीरसिंह यांनी सांगितले. मुली मोबाईल वापरतात किंवा नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी पथके स्थापन करण्यात आली आहेत.