शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या कुत्र्यांपासून बचाव करताना मुलगी पडली दरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 11:40 IST

नैनीतालमध्ये रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांपासून स्वतःचा बचाव करताना एक दहा वर्षाची मुलगी दरीत पडल्याची घटना घडली आहे.

ऑनलाइन लोकमत

नैनीताल, दि. 25- नैनीतालमध्ये रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांपासून स्वतःचा बचाव करताना एक दहा वर्षाची मुलगी दरीत पडल्याची घटना घडली आहे. ही मुलगी राजस्थानची रहिवासी असून तीच्या कुटुंबीयांसोबत नैनीतालमध्ये फिरायला गेली होती. दरीत पडल्याने त्या मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला डॉक्टरांनी ब्रेन डेड घोषित केलं आहे. अमतुल असं त्या मुलीचं नाव असून ती तिच्या कुटुंबीयांसह नैनीतालमध्ये फिरायला गेली होती. तेथे दोन दिवसांची सुट्टी घालविल्यानंतर घरी जाण्यासाठी हॉटेलमधून बाहेर पडत असताना ही घटना घडली आहे.
 
तल्लीताल बस स्थानकावर जात असताना रस्त्यावर काही भटक्या कुत्र्यांची झुंबड आली होती. ते कुत्रे भुंकायला लागले आणि अमतुलच्या दिशेने धावत येत होते. त्यावेळी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी अमतुल पळाली आणि 30 फुट खोल दरीत पडली, अशी माहिती तिचे वडील अब्बास फकरूद्दीन यांनी दिली आहे. दरीत पडल्याने अमतुलच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली होती. तिला उपचारासाठी हल्व्दानीच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण तिथे डॉक्टरांनी तिला ब्रेन डेड घोषित केलं. अमतुल ब्रेन डेड झाली असून तिच्या डोक्याने काम करणं बंद केल्याचं, तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर अजय पाल यांनी सांगितलं आहे. या घटनेमुळे नैनीतालच्या डोंगराळ भागात भटक्या कुत्र्यांचा असलेला अती वावर पुन्हा उजेडात येतो आहे.
आणखी वाचा
 

या मुलाला आठवतात मागील जन्माच्या घटना

कपड्यांवरून व्यक्तीचा ‘क्लास’ ठरतोय!

जिओचे कॉलेजमध्ये मोफत वाय-फाय ?

2016 पासून तेथे भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. नैनीतालमध्ये कुत्रा चावल्याच्या 774 तक्रारी दाखल झाल्या आहेत. तर 2015 मध्ये एकुण 1093 तक्रारी होत्या. नैनीताल महापालिकेच्या माहितीनुसार नैनीताल भागात जवळपास 2 हजार भटक्या कुत्र्यांचा वावर आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी 2016 मध्ये पशु जन्म दर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला होता. जानेवारी 2015मध्ये नैनीतालमध्ये भटक्या कुत्र्यांमुळे वाढलेले धोके उत्तराखंड हायकोर्टाने निदर्शनास आणून दिले होते. 2012, 2013 आणि 2014 या तीन वर्षाच्या काळात कुत्र्याने लोकांना चावल्याच्या 4000 घटना घडल्याचं कोर्टाने म्हंटलं होतं. या घटना टाळण्यासाठी तात्काळ पावलं उचण्याचे आदेशही कोर्टाने राज्य सरकारला दिले होते.