शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

पाकव्याप्त काश्मीर मिळविणे हाच मुद्दा

By admin | Updated: September 8, 2015 03:19 IST

पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या ज्या भागावर(पाकव्याप्त काश्मीर) बेकायदेशीर कब्जा केला आहे तो परत मिळविणे हाच एकमेव मुद्दा असल्याचा इशारा पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री

नवी दिल्ली : पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या ज्या भागावर(पाकव्याप्त काश्मीर) बेकायदेशीर कब्जा केला आहे तो परत मिळविणे हाच एकमेव मुद्दा असल्याचा इशारा पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्रसिंग यांनी सोमवारी दिला. काश्मीर हा कधीही न संपणारा अजेंडा असल्याचे विधान पाकिस्तानचे लष्करप्रमुख जन. राहील शरीफ यांनी केले होते.जम्मू-काश्मीर हा भारताचा एकात्म भाग होता आणि राहील, असे जितेंद्रसिंग यांनी स्पष्ट केले. भारतासाठी जम्मू-काश्मीर किंवा पाकिस्तानशी संबंधित कोणता मुद्दा असेल तर तो पाकव्याप्त काश्मीरचा पुन्हा भारतात समावेश करणे हाच असेल, असे ते म्हणाले. पाकव्याप्त काश्मीर हा जम्मू-काश्मीरचा भाग असूनही पाकिस्तानने त्यावर गेल्या ६५-६६ वर्षांपासून बेकायदेशीररीत्या कब्जा केला आहे, असे त्यांनी येथे पत्रकारांना प्रतिक्रिया देताना म्हटले. भारताने दु:साहस केल्यास भारताचे झेपणार नाही असे नुकसान होईल, असा इशारा राहील शरीफ यांनी रविवारी दिला होता.(लोकमत न्यूज नेटवर्क)युद्ध लादल्यास भारताची अपरिमित हानी - शरीफइस्लामाबाद : ‘काश्मीर’चा ‘न संपलेला विषय’ असा उल्लेख करत पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल राहिल शरीफ यांनी छोटे किंवा मोठे युद्ध लादल्यास भारताला अपिरिमित हानी सोसावी लागेल, अशी धमकी दिली.पाकिस्तानी लष्कराकडून सीमेवर सतत आगळीक सुरू असताना त्याचे प्रमुख युद्ध झाल्यास भारताची खैर नसल्याच्या वल्गना करत असल्यामुळे स्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे. १९६५ मधील भारतासोबतच्या युद्धाला ५० वर्षे झाल्यानिमित्त रावळपिंडी येथे आयोजित विशेष कार्यक्रमात रविवारी बोलताना शरीफ यांनी ही धमकी दिली. त्यांनी भारताचे नाव घेतले नाही.