शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

विपश्यनेतून मिळवा प्रापंचिक अडचणींतून कायमची मुक्ती

By admin | Updated: May 10, 2017 14:00 IST

भगवान गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्त आपणही चालू या आत्मशुद्धीची वाट.

- मयूर पठाडे
 
जगाला मानवतेचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांची आज जयंती. वैशाख पौर्णिमेच्या म्हणजेच बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म झाला. विश्वात हा दिवस मोठय़ा भक्तिभावाने साजरा केला जातो. 
आत्मशुद्धी आणि आत्मनिरिक्षणाची विपश्यना ही अत्यंत प्राचीन अशी साधना आणि ध्यानपद्धती. भारतातील अतिप्राचिन ध्यानपद्धती म्हणून तिला मान्यता आहे. काळाच्या ओघात ही साधना लुप्त झाली होती. सुमारे 2500 वर्षांपूर्वी भगवान बुद्धांनी तिला पुन्हा शोधून काढलं आणि सर्वसामान्यांत तिचा प्रचार, प्रसार केला. आज भारत, नेपाळ, र्शीलंका, म्यानमार, सिंगापूर, जपान, कंबोडिया, चीन, थायलंड, इंडोनेशिया, व्हिएतनाम, मलेशिया. यासह इतरही अनेक देशांत विपश्यनेचा फार मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो. 
संयम, सदाचार, शांती, मनावर नियंत्रण आणि आत्म्याला निर्मळ बनवण्यासाठी पूर्वी ऋषिमुनींकडून मोठय़ा प्रमाणात या साधनेचा वापर केला जात होता. महात्मा गौतम बुद्धांनी या साधनेला आणखी सोपं, सरळ रुप दिलं आणि जगभरात तिचा प्रचार, प्रसार केला. ‘जीवन जगण्याची कला’ म्हणून आज ती सर्वत्र प्रसिद्ध आहे. मन:शांती आणि अनेक विकारांवर ही साधना उपयुक्त मानली जाते. 
काय आहे विपश्यना?
 
 
स्वनिरिक्षणातून स्वपरिवर्तन घडवणारी ही साधना एक जीवनशैली आहे. आपले विचार, संवेदना, भावना आणि निर्णय ज्या निकषांवर चालतात, त्याचे सिद्धांत विपश्यनेच्या आचरणातून स्पष्ट होत जातात. यामुळे मनाला संतुलन प्राप्त होतं. आंतरिक शांती आणि सामंजस्याचा अनुभव येतो. तथागत गौतम बुद्धांच्या काळापासून विविध आचार्यांच्या अखंड साखळीतून विपश्यनेची ही परंपरा चालत आली आहे. अलीकडच्या काळात सत्यनारायण गोएन्का यांनी ही परंपरा मोठय़ा प्रमाणात चालवली. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे विपश्यनेचे मोठे केंद्रही आहे. जगभरातून भाविक येथे विपश्यना साधना शिकण्यासाठी येत असतात. 
 
विपश्यनेपासून होणारे लाभ
 
 
1- रोग, शोक आणि सांसारिक दु:खापासून मुक्ती मिळवण्यासाठी ही साधना खूपच उपयुक्त मानली जाते. 
 
2- मन:शांतीसाठी ही एक प्रभावी साधना आहे. अनेकदा डॉक्टांकडूनही या साधनेची शिफारस केली जाते.
 
3- मन, शरीर आणि कृती यांचं संतुलन राखण्यासाठी ही पद्धती अत्यंत प्रभावी आहे. 
 
4- अनेक विकारांवरही ही साधना खूप उपयुक्त आहे. विशेषत: असे विकार, खरे तर ते विकार नाहीत, पण आपल्या मनाच्या खेळांमुळे ते तयार झालेले आहेत, अशा विकारांवर विपश्यना अत्यंत उपयुक्त आहे. 
 
5- अशा विकारांचं या साधनेमुळे समूळ उच्चाटन होऊ शकतं. 
 
6- मानसिक औदासिन्य, आळस, निद्रानाश, उदासपणा, इष्र्या, द्वेष, काहीही करावंसं न वाटणं, भाव-भावनांचा उद्रेक यासारख्या परिस्थितीवर तर विपश्यना हा रामबाण उपाय आहे. 
 
7- या साधनेमुळे मनाची प्रसन्नता, एकाग्रता, उत्साह, आनंद, कोणत्याही समस्येला धीरानं सामोरं जाण्याची आपली शक्तीही वाढते.