शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

गाझा : राज्यसभेत गोंधळ, सभागृह दोनदा तहकूब

By admin | Updated: July 18, 2014 23:17 IST

काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या नेतृत्वातील विरोधकांनी शून्य तासादरम्यान गाझामधील निष्पाप महिला आणि मुलांच्या नरसंहारावर तात्काळ चर्चा करण्याची मागणी

नवी दिल्ली : काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या नेतृत्वातील विरोधकांनी शून्य तासादरम्यान गाझामधील निष्पाप महिला आणि मुलांच्या नरसंहारावर तात्काळ चर्चा करण्याची मागणी करीत एकच गोंधळ घालून राज्यसभेचे कामकाज ठप्प केले. या विषयावर सोमवारी चर्चा करण्याची तयारी सरकारने दाखविली; परंतु विरोधकांनी तात्काळ चर्चेची मागणी केल्याने दुपारपर्यंत दोनदा कामकाज तहकूब करावे लागले. युक्रेनमध्ये मलेशियन विमान दुर्घटनेत ठार झालेल्या २९८ प्रवाशांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर लगेच सीपीआय-एमचे सीताराम येचुरी म्हणाले, अशाच प्रकारे गाझामधील निष्पाप नागरिकांच्या नरसंहाराचा संदर्भ अध्यक्षांकडून यायला हवा. यूएनने म्हटल्याप्रमाणे ठार झालेले ७५ टक्के नागरिक होते. ठार झालेल्यांमध्ये ४६ टक्के महिला व मुले असून, १२ टक्के पाच वर्षांखालील मुले आहेत. मानवी दृष्टिकोनातून हा संदर्भ अध्यक्षांकडून यायला हवा, अशी विनंती त्यांनी केली. संदर्भाचा मुद्दा येचुरी आणि अध्यक्षांमधील आहे. सरकार गाझाच्या मुद्यावर सोमवारी चर्चेला तयार आहे, असे संसदीय कामकाज राज्यमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले. मात्र, विरोधी बाकांवरील सदस्यांचे समाधान झाले नाही. चर्चा आज केली जाऊ शकते आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री सोमवारी उत्तर देऊ शकतात, असे विरोधी पक्षांचे म्हणणे होते. विरोधी पक्षांनी चर्चेची मागणी लावून धरल्याने उपाध्यक्ष कुरियन यांनी १५ मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. दुपारी कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर सभागृहात तशीच परिस्थिती कायम होती. गदारोळात सरकारने कॅग अहवाल आणि दिल्लीचा २०१४-१५ चा अर्थसंकल्प सादर मांडला. त्यानंतर शून्य तासात देखील गोंधळ कायम असल्याने कुरियन यांनी दुपारी २ वाजेपर्यंत कामकाज तहकूब केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)