शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

मोदींच्या "या" धाडसी पावलाचं बिल गेट्स यांनी केलं कौतुक

By admin | Updated: April 26, 2017 14:02 IST

खुल्या जागेत शौचास जाणा-या लोकांना प्रतिबंद घालण्यासाठी राबवलेल्या मोहिमेचं अमेरिकेचे प्रसिद्ध उद्योगपती आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी कौतुक केलं

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 26 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छतेवर भर देत खुल्या जागेत शौचास जाणा-या लोकांना प्रतिबंध घालण्यासाठी राबवलेल्या मोहिमेचं अमेरिकेचे प्रसिद्ध उद्योगपती आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी कौतुक केलं आहे. त्यांनी ब्लॉगमध्ये लिहिलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशा समस्येवर आवाज उठवला आहे ज्याबद्दल आपल्याचा विचार करणेसुद्धा आवडत नाही. तीन वर्षांपूर्वी भारताच्या पंतप्रधानांनी जनतेच्या आरोग्यासंदर्भात एक महत्त्वाची घोषणा केली होती. ती आजतागायत कोणाच्याही तोंडून ऐकली नाही. आज त्याचा मोठा फायदा भारताला होतोय.

बिल गेट्स म्हणाले, आपण 21व्या शतकात राहतो. आजही आपल्या आया-बहिणी उघड्यावर शौचास जातात हे पाहून त्रास होत नाही का ? , गावातील अनेक महिला शौचास जाण्यासाठी रात्रीची वाट पाहतात. त्याचा त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होत असेल, त्यांना किती आजारांनी ग्रासलं असेल. आपण स्वतःच्या आया-बहिणींना डोळ्यांसमोर ठेवून शौचालय बांधू शकत नाही काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.माझ्या मते इतर कोणत्याही राष्ट्रीय नेत्यानं या संवेदनशील विषयावर इतक्या खुलेपणानं आणि सार्वजनिकरीत्या वाच्यता केली नाही. मोदींनी फक्त भाषणच दिलं नाही, तर विकासासाठी कामही केलं आहे. भाषणाच्या दोन महिन्यांनंतर त्यांनी स्वच्छ भारत अभियानाचा शुभारंभ केला. त्याअंतर्गत 2019पर्यंत 7.5 कोटी शौचालय बांधण्याचा मोदींचा मानस आहे. तसेच त्यांनी खुल्यामध्ये कचरा फेकण्यासाठीही मनाई केली आहे. या समस्या सोडवून आपण हजारो जीव वाचवू शकतो. त्यामुळे मुली शाळेकडे आकर्षित होतील आणि अर्थव्यवस्था मजबूत होईल. सफाईची स्थिती मजबूत बनवण्यासाठी आमची फाऊंडेशन जोमाने काम करते आहे. भारत सरकारसोबत मिळून आम्ही यावर काम करतो आहोत, असंही बिल गेट्स म्हणाले आहेत.