शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

गंगा नदीच्या किनारी आंघोळ किंवा फोटो काढायला गेल्यास होणार अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2016 16:42 IST

गंगा बॅरेजवरुन प्रवास करत जर तुम्ही नदीच्या किनारी पोहोचलात तर शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली अटक होऊ शकते

ऑनलाइन लोकमत - 
कानपूर, दि. 02 - गंगा नदीच्या किनारी पिकनिकला जाण्याची तयारी करत असाल तर सावधान व्हा, कारण तुम्हाला अटक होण्याची शक्यता आहे. गंगा बॅरेजवरुन प्रवास करत जर तुम्ही नदीच्या किनारी पोहोचलात तर शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली तुम्हाला अटक होऊ शकते. गेल्याच आठवड्यात सेल्फी घेण्याच्या नादात 7 तरुणांचा गंगा नदीत बुडून दुर्देवी मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. 
 
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबर 2015 पासून आतापर्यंत 24 लोकांचा गंगा नदीच्या किनारी बुडून मृत्यू झाला आहे. यामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. सिंचन विभागाच्या मदतीने गंगा बॅरेजवर 8 ते 10 फूट उंच बॅरीकेडींग केली जाणार आहे, जेणेकरुन लोक फोटो काढण्याच्या नादात खाली उतरु नयेत. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नदीकिनारी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. जर कोणी व्यक्ती गंगा बॅरेजवरुन खाली उतरुन फोटो काढण्यासाठी किंवा आंघोळीसाठी गेली तर त्याला अटक करण्यात येईल.