शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचा राज ठाकरेंना मोठा धक्का; मनसे स्थापनेपासून सोबत असलेला नेता पक्षाची साथ सोडणार?
2
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
3
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
4
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
5
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
6
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल
7
आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली
8
Nikki Murder Case : "दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील
9
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
10
Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
11
गणेश चतुर्थी २०२५: राहु काळ कधी? ‘या’ शुभ मुहूर्तावर स्थापन करा गणपती; पाहा, चंद्रास्त वेळ
12
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
13
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
14
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
15
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
16
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
17
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
18
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
19
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
20
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!

न्यायालयाच्या लक्ष्मणरेषेतच गणेशोत्सव

By admin | Updated: September 1, 2015 16:25 IST

अहमदनगर: रस्त्यातील दोन तृतीयांश जागा सोडण्याच्या निर्णयात सूट देण्याची मागणी धुडकावून लावत न्यायालयाचे आदेश पाळावेच लागतील़ जो निर्णय दिला त्यानुसारच गणेशोत्सव साजरा करा, स्वयं शिस्त महत्वाची असून युवकांकडून प्रशासनाला मोठ्या अपेक्षा आहेत़ कोणत्या परिस्थितीत कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा कठोर निर्णय घेतले जातील, असा इशारा पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी सोमवारी झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत दिला आहे़

अहमदनगर: रस्त्यातील दोन तृतीयांश जागा सोडण्याच्या निर्णयात सूट देण्याची मागणी धुडकावून लावत न्यायालयाचे आदेश पाळावेच लागतील़ जो निर्णय दिला त्यानुसारच गणेशोत्सव साजरा करा, स्वयं शिस्त महत्वाची असून युवकांकडून प्रशासनाला मोठ्या अपेक्षा आहेत़ कोणत्या परिस्थितीत कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा कठोर निर्णय घेतले जातील, असा इशारा पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी सोमवारी झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत दिला आहे़ जिल्हा नियोजन भवनात जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक पार पडली़ जिल्हाधिकारी अनिल कवडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यावेळी उपस्थित होते़ यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे़ गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी प्रशासनाची तयारी सुरू आहे़ गणेश मंडळांकडून सहकार्याची अपेक्षा आहे़ परवानगीसाठी एक खिडकी योजना सुरू केली जाईल़ कुणालाही घरी जावून परवानगी दिली जाणार नाही़ मंडप आणि डिजेबाबत न्यायालयाने जे आदेश दिले आहेत, ते पाळणे बंधनकारक आहे़ नियमानुसारच उत्सव साजरा करा, प्रशासन तुमच्यासोबत आहे. मात्र दारू, जुगार, गैरवर्तन आणि डिजेचा गोंगाट, असे प्रकार आढळून आल्यास गय नाही, असा इशाराही त्रिपाठी यांनी यावेळी दिला़ मंडळांत असलेल्या स्पर्धेतून वाद निर्माण होतात़ वैयक्तिक वादाला धार्मिक स्वरुप दिले जाते़ तसे घडणार नाही, याची काळजी घ्यावी़ मिरवणुकीच्यावेळी डिजे लावू नयेत, कारण ७५ डेसिबलची मर्यादा ओलांडल्यास पर्यावरण विभागाच्या कायद्यानुसार १ ते ५ लाखापर्यंत दंड अकारण्याची तरतूद आहे, असे त्रिपाठी यांनी सांगितले़ सध्या जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट आहे़ सर्वांनाच दुष्काळाची चिंता आहे, अशा परिस्थितीत गणेशोत्सव साजरा होत असून, हा मोठा विरोधाभास आहे़ मंडळांकडे संघटित शक्ती आहे, या शक्तीचा वापर सकारात्मकतेसाठी करणे शक्य आहे, ते करण्याची मानसिकता हवी़ उत्सव हा मानवी कल्याणासाठी असून, एक नवा पायंडा आपण पाडावा, अशी अपेक्षा कवडे यांनी यावेळी व्यक्त केली़ बाळासाहेब पवार, ॲड़ शिवाजी कराळे, निलिमा गायकवाड, उबेद शेख, अनिल गट्टाणी आदिंनी सूचना केल्या़