शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
3
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
4
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
5
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
6
भयंकर! सुनेने रील बनवताच सासरच्या मंडळींना राग अनावर; संतापलेल्या सासऱ्याने फोडलं डोकं
7
मराठी गायकाने नाकारली तुर्कीतील कॉन्सर्टची ऑफर; म्हणाला, "५० लाख देत होते पण..."
8
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?
9
ज्योतीची साथीदार, एकत्रच करत होत्या पाकिस्तान वाऱ्या; कोण आहे प्रियंका सेनापती?
10
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
11
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
12
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
13
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
14
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
15
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
17
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
18
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
19
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा
20
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल

न्यायालयाच्या लक्ष्मणरेषेतच गणेशोत्सव

By admin | Updated: September 1, 2015 16:25 IST

अहमदनगर: रस्त्यातील दोन तृतीयांश जागा सोडण्याच्या निर्णयात सूट देण्याची मागणी धुडकावून लावत न्यायालयाचे आदेश पाळावेच लागतील़ जो निर्णय दिला त्यानुसारच गणेशोत्सव साजरा करा, स्वयं शिस्त महत्वाची असून युवकांकडून प्रशासनाला मोठ्या अपेक्षा आहेत़ कोणत्या परिस्थितीत कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा कठोर निर्णय घेतले जातील, असा इशारा पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी सोमवारी झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत दिला आहे़

अहमदनगर: रस्त्यातील दोन तृतीयांश जागा सोडण्याच्या निर्णयात सूट देण्याची मागणी धुडकावून लावत न्यायालयाचे आदेश पाळावेच लागतील़ जो निर्णय दिला त्यानुसारच गणेशोत्सव साजरा करा, स्वयं शिस्त महत्वाची असून युवकांकडून प्रशासनाला मोठ्या अपेक्षा आहेत़ कोणत्या परिस्थितीत कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा कठोर निर्णय घेतले जातील, असा इशारा पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी सोमवारी झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत दिला आहे़ जिल्हा नियोजन भवनात जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक पार पडली़ जिल्हाधिकारी अनिल कवडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यावेळी उपस्थित होते़ यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे़ गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी प्रशासनाची तयारी सुरू आहे़ गणेश मंडळांकडून सहकार्याची अपेक्षा आहे़ परवानगीसाठी एक खिडकी योजना सुरू केली जाईल़ कुणालाही घरी जावून परवानगी दिली जाणार नाही़ मंडप आणि डिजेबाबत न्यायालयाने जे आदेश दिले आहेत, ते पाळणे बंधनकारक आहे़ नियमानुसारच उत्सव साजरा करा, प्रशासन तुमच्यासोबत आहे. मात्र दारू, जुगार, गैरवर्तन आणि डिजेचा गोंगाट, असे प्रकार आढळून आल्यास गय नाही, असा इशाराही त्रिपाठी यांनी यावेळी दिला़ मंडळांत असलेल्या स्पर्धेतून वाद निर्माण होतात़ वैयक्तिक वादाला धार्मिक स्वरुप दिले जाते़ तसे घडणार नाही, याची काळजी घ्यावी़ मिरवणुकीच्यावेळी डिजे लावू नयेत, कारण ७५ डेसिबलची मर्यादा ओलांडल्यास पर्यावरण विभागाच्या कायद्यानुसार १ ते ५ लाखापर्यंत दंड अकारण्याची तरतूद आहे, असे त्रिपाठी यांनी सांगितले़ सध्या जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट आहे़ सर्वांनाच दुष्काळाची चिंता आहे, अशा परिस्थितीत गणेशोत्सव साजरा होत असून, हा मोठा विरोधाभास आहे़ मंडळांकडे संघटित शक्ती आहे, या शक्तीचा वापर सकारात्मकतेसाठी करणे शक्य आहे, ते करण्याची मानसिकता हवी़ उत्सव हा मानवी कल्याणासाठी असून, एक नवा पायंडा आपण पाडावा, अशी अपेक्षा कवडे यांनी यावेळी व्यक्त केली़ बाळासाहेब पवार, ॲड़ शिवाजी कराळे, निलिमा गायकवाड, उबेद शेख, अनिल गट्टाणी आदिंनी सूचना केल्या़