शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाच्या लक्ष्मणरेषेतच गणेशोत्सव

By admin | Updated: September 1, 2015 16:25 IST

अहमदनगर: रस्त्यातील दोन तृतीयांश जागा सोडण्याच्या निर्णयात सूट देण्याची मागणी धुडकावून लावत न्यायालयाचे आदेश पाळावेच लागतील़ जो निर्णय दिला त्यानुसारच गणेशोत्सव साजरा करा, स्वयं शिस्त महत्वाची असून युवकांकडून प्रशासनाला मोठ्या अपेक्षा आहेत़ कोणत्या परिस्थितीत कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा कठोर निर्णय घेतले जातील, असा इशारा पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी सोमवारी झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत दिला आहे़

अहमदनगर: रस्त्यातील दोन तृतीयांश जागा सोडण्याच्या निर्णयात सूट देण्याची मागणी धुडकावून लावत न्यायालयाचे आदेश पाळावेच लागतील़ जो निर्णय दिला त्यानुसारच गणेशोत्सव साजरा करा, स्वयं शिस्त महत्वाची असून युवकांकडून प्रशासनाला मोठ्या अपेक्षा आहेत़ कोणत्या परिस्थितीत कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा कठोर निर्णय घेतले जातील, असा इशारा पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी सोमवारी झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत दिला आहे़ जिल्हा नियोजन भवनात जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक पार पडली़ जिल्हाधिकारी अनिल कवडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यावेळी उपस्थित होते़ यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे़ गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी प्रशासनाची तयारी सुरू आहे़ गणेश मंडळांकडून सहकार्याची अपेक्षा आहे़ परवानगीसाठी एक खिडकी योजना सुरू केली जाईल़ कुणालाही घरी जावून परवानगी दिली जाणार नाही़ मंडप आणि डिजेबाबत न्यायालयाने जे आदेश दिले आहेत, ते पाळणे बंधनकारक आहे़ नियमानुसारच उत्सव साजरा करा, प्रशासन तुमच्यासोबत आहे. मात्र दारू, जुगार, गैरवर्तन आणि डिजेचा गोंगाट, असे प्रकार आढळून आल्यास गय नाही, असा इशाराही त्रिपाठी यांनी यावेळी दिला़ मंडळांत असलेल्या स्पर्धेतून वाद निर्माण होतात़ वैयक्तिक वादाला धार्मिक स्वरुप दिले जाते़ तसे घडणार नाही, याची काळजी घ्यावी़ मिरवणुकीच्यावेळी डिजे लावू नयेत, कारण ७५ डेसिबलची मर्यादा ओलांडल्यास पर्यावरण विभागाच्या कायद्यानुसार १ ते ५ लाखापर्यंत दंड अकारण्याची तरतूद आहे, असे त्रिपाठी यांनी सांगितले़ सध्या जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट आहे़ सर्वांनाच दुष्काळाची चिंता आहे, अशा परिस्थितीत गणेशोत्सव साजरा होत असून, हा मोठा विरोधाभास आहे़ मंडळांकडे संघटित शक्ती आहे, या शक्तीचा वापर सकारात्मकतेसाठी करणे शक्य आहे, ते करण्याची मानसिकता हवी़ उत्सव हा मानवी कल्याणासाठी असून, एक नवा पायंडा आपण पाडावा, अशी अपेक्षा कवडे यांनी यावेळी व्यक्त केली़ बाळासाहेब पवार, ॲड़ शिवाजी कराळे, निलिमा गायकवाड, उबेद शेख, अनिल गट्टाणी आदिंनी सूचना केल्या़