शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

राष्ट्रवादी मधील फुटीवर युतीच्या किल्ल्याचे भवितव्य

By admin | Updated: September 26, 2014 00:08 IST

युतीचे भवितव्य अवलंबून आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटीचा फायदा घेऊन आपला बालेकिल्ला शाबूत राखण्याचा भाजपा नेत्यांचा प्रयत्न सुरु आहे

वाडा : शिवसेना-भाजपा युतीचे वर्चस्व असलेल्या भिवंडी ग्रामीण मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फाटाफुट करून भाजपात प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांचा एक गट तर भाजपा मधील निष्ठावंताचा एक गट असे दोन गट तयार झाल्याने ते एकत्र येऊन कितपत लढत देऊ शकतात. यावर युतीचे भवितव्य अवलंबून आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटीचा फायदा घेऊन आपला बालेकिल्ला शाबूत राखण्याचा भाजपा नेत्यांचा प्रयत्न सुरु आहे.एकेकाळी काँग्रेसच्या पारंपारिक बालेकिल्ला असलेल्या पूर्वीचा वाडा विधानसभा क्षेत्र तर आत्ताचा भिवंडी ग्रामीण मतदार संघ गेल्या २५ वर्षांत युतीने काबीज करून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. नागरीकरण झालेल्या भागात युतीने चांगला जम बसविला असला तरी ग्रामीण भागात युतीला पाहिजे तशी पकड बसविता आलेली नाही. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत युतीला बहूमत मिळविता आले नाही तर काँग्रेसला आपली ताकद दाखविता आली नाही. मात्र राष्ट्रवादीने जिल्हापरिषदेवर आपला झेंडा कायम ठेवला आता मात्र पक्ष फुटीमुळे इतर भागांप्रमाणेच भिवंडी ग्रामीण मतदार संघात राजकीय समीकरणेही आता बदलली आहेत.पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची पकड होती. परंतु जिल्हा विभाजनाने पालघर जिल्ह्यात आता राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलतील असे चित्र दिसत आहे. मात्र आयाराम-गयारामांचा युतीला कितपत फायदा होतो ते निष्ठेने काम करतील का? कारण हे कार्यकर्ते ज्या पक्षात होते त्या पक्षाच्या विरोधात त्यांनी काम केले असल्याचे जाणकारांचे म्हणणे ाहे. भाजपाच्या २५ वर्षांच्या राजवटीला जनता कंटाळली असून त्याचा फायदा राष्ट्रवादीला निश्चित होईल असा विश्वास राष्ट्रवादीचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष अतिश पाटील यांनी व्यक्त केला आहे.राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या नेत्यांमुळे या मतदार संघात चुरस वाढली आहे. त्यामुळे विष्णू सवरांना भाजपा तारणार की पाडणार हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. (वार्ताहर)