शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

राष्ट्रवादी मधील फुटीवर युतीच्या किल्ल्याचे भवितव्य

By admin | Updated: September 26, 2014 00:08 IST

युतीचे भवितव्य अवलंबून आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटीचा फायदा घेऊन आपला बालेकिल्ला शाबूत राखण्याचा भाजपा नेत्यांचा प्रयत्न सुरु आहे

वाडा : शिवसेना-भाजपा युतीचे वर्चस्व असलेल्या भिवंडी ग्रामीण मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फाटाफुट करून भाजपात प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांचा एक गट तर भाजपा मधील निष्ठावंताचा एक गट असे दोन गट तयार झाल्याने ते एकत्र येऊन कितपत लढत देऊ शकतात. यावर युतीचे भवितव्य अवलंबून आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटीचा फायदा घेऊन आपला बालेकिल्ला शाबूत राखण्याचा भाजपा नेत्यांचा प्रयत्न सुरु आहे.एकेकाळी काँग्रेसच्या पारंपारिक बालेकिल्ला असलेल्या पूर्वीचा वाडा विधानसभा क्षेत्र तर आत्ताचा भिवंडी ग्रामीण मतदार संघ गेल्या २५ वर्षांत युतीने काबीज करून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. नागरीकरण झालेल्या भागात युतीने चांगला जम बसविला असला तरी ग्रामीण भागात युतीला पाहिजे तशी पकड बसविता आलेली नाही. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत युतीला बहूमत मिळविता आले नाही तर काँग्रेसला आपली ताकद दाखविता आली नाही. मात्र राष्ट्रवादीने जिल्हापरिषदेवर आपला झेंडा कायम ठेवला आता मात्र पक्ष फुटीमुळे इतर भागांप्रमाणेच भिवंडी ग्रामीण मतदार संघात राजकीय समीकरणेही आता बदलली आहेत.पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची पकड होती. परंतु जिल्हा विभाजनाने पालघर जिल्ह्यात आता राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलतील असे चित्र दिसत आहे. मात्र आयाराम-गयारामांचा युतीला कितपत फायदा होतो ते निष्ठेने काम करतील का? कारण हे कार्यकर्ते ज्या पक्षात होते त्या पक्षाच्या विरोधात त्यांनी काम केले असल्याचे जाणकारांचे म्हणणे ाहे. भाजपाच्या २५ वर्षांच्या राजवटीला जनता कंटाळली असून त्याचा फायदा राष्ट्रवादीला निश्चित होईल असा विश्वास राष्ट्रवादीचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष अतिश पाटील यांनी व्यक्त केला आहे.राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या नेत्यांमुळे या मतदार संघात चुरस वाढली आहे. त्यामुळे विष्णू सवरांना भाजपा तारणार की पाडणार हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. (वार्ताहर)