शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राष्ट्रवादी मधील फुटीवर युतीच्या किल्ल्याचे भवितव्य

By admin | Updated: September 26, 2014 00:08 IST

युतीचे भवितव्य अवलंबून आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटीचा फायदा घेऊन आपला बालेकिल्ला शाबूत राखण्याचा भाजपा नेत्यांचा प्रयत्न सुरु आहे

वाडा : शिवसेना-भाजपा युतीचे वर्चस्व असलेल्या भिवंडी ग्रामीण मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फाटाफुट करून भाजपात प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांचा एक गट तर भाजपा मधील निष्ठावंताचा एक गट असे दोन गट तयार झाल्याने ते एकत्र येऊन कितपत लढत देऊ शकतात. यावर युतीचे भवितव्य अवलंबून आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटीचा फायदा घेऊन आपला बालेकिल्ला शाबूत राखण्याचा भाजपा नेत्यांचा प्रयत्न सुरु आहे.एकेकाळी काँग्रेसच्या पारंपारिक बालेकिल्ला असलेल्या पूर्वीचा वाडा विधानसभा क्षेत्र तर आत्ताचा भिवंडी ग्रामीण मतदार संघ गेल्या २५ वर्षांत युतीने काबीज करून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. नागरीकरण झालेल्या भागात युतीने चांगला जम बसविला असला तरी ग्रामीण भागात युतीला पाहिजे तशी पकड बसविता आलेली नाही. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत युतीला बहूमत मिळविता आले नाही तर काँग्रेसला आपली ताकद दाखविता आली नाही. मात्र राष्ट्रवादीने जिल्हापरिषदेवर आपला झेंडा कायम ठेवला आता मात्र पक्ष फुटीमुळे इतर भागांप्रमाणेच भिवंडी ग्रामीण मतदार संघात राजकीय समीकरणेही आता बदलली आहेत.पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची पकड होती. परंतु जिल्हा विभाजनाने पालघर जिल्ह्यात आता राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलतील असे चित्र दिसत आहे. मात्र आयाराम-गयारामांचा युतीला कितपत फायदा होतो ते निष्ठेने काम करतील का? कारण हे कार्यकर्ते ज्या पक्षात होते त्या पक्षाच्या विरोधात त्यांनी काम केले असल्याचे जाणकारांचे म्हणणे ाहे. भाजपाच्या २५ वर्षांच्या राजवटीला जनता कंटाळली असून त्याचा फायदा राष्ट्रवादीला निश्चित होईल असा विश्वास राष्ट्रवादीचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष अतिश पाटील यांनी व्यक्त केला आहे.राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या नेत्यांमुळे या मतदार संघात चुरस वाढली आहे. त्यामुळे विष्णू सवरांना भाजपा तारणार की पाडणार हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. (वार्ताहर)