शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

ज्या महिलेवर केले अंत्यसंस्कार ती 2 महिन्यांनंतर परतली आणि...

By admin | Updated: July 9, 2017 21:15 IST

ज्या महिलेचे सासरच्यांनी दोन महिन्यांपूर्वी अंत्यसंस्कार केले ती महिला अचानक माहेरी पोहोचल्याची घटना हरियाणामध्ये घडली आहे.

ऑनलाइन लोकमत

पलवल, दि. 9 - ज्या महिलेचे सासरच्यांनी दोन महिन्यांपूर्वी अंत्यसंस्कार केले ती महिला अचानक माहेरी पोहोचल्याची घटना हरियाणामध्ये घडली आहे. परतल्यावर त्या महिलेने आपल्यासोबत झालेला घटनाक्रम कथन केला आणि सगळेच हैराण झाले. 

सासरच्यांनी या महिलेला जबर मारहाण करून अर्धमेल्या अवस्थेमध्ये एका जंगलात फेकून दिलं होतं. शुद्धीत आल्यावर या महिलेने भीक मागून आपला दिवस घालवायला सुरूवात केली. या प्रकरणी पोलिसांनी सासू, सासरा, दिर, ननंद आणि अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 
 
दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित महिला दिल्लीच्या राजीव नगर फेज-3 येथील रहिवासी आहे. 2002 मध्ये पलवल जिल्हयातील खेडला गावातील बृजलाल याच्याशी कविताचं लग्न झालं होतं. कविताला दोन मुलं आणि एक मुलगी आहे. सासरचे लोकं , नवरा रोज मारहाण करत होते. 22 एप्रिल रोजीही नवरा, सासू-सासरे, ननंद, दीर आणि अन्य दोघांनी कविताला जबर मारहाण केली. जबर मारहाण करून अर्धमेल्या अवस्थेमध्ये मेलेली समजून एका रिक्षातून तिला नूंहच्या जंगलामध्ये फेकून देण्यात आलं.  यानंतर कविता बेपत्ता असल्याची तक्रारही चांदहाट पोलीस स्थानकात केली.
(दिल्लीतून ट्रम्पचं अपहरण, माहिती देणा-याला मिळणार 11 हजारांचं बक्षीस)
(डोनाल्ड ट्रम्प यांनी WWE रिंगणात CNN ला "बदडलं"!)
(हॅरी पॉटरच्या जन्मकथेशी या बुकस्टोरचा संबंध, प्रवेशासाठीच लागतात 300 रूपये)
 
4 मे रोजी पोलिसांना मेवात या ठिकाणी एक मृतदेह आढळला असता ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी तिचा पती बृजलालला बोलावलं. बृजलालने मृतदेह कविताचाच असल्याचं पोलिसांना सांगितलं त्यानंतर पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह सासरच्या मंडळीकडे सोपवला.  त्यानंतर सासरच्यांनी मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले. कविता आता या जगात नाही या विचाराने सासरची मंडळी निश्चिंत झाली.  
 
 जंगलात फेकल्याच्या दोन-तीन दिवसांनंतर शुद्ध आल्यावर मी सर्व भिका-यांमध्ये असल्याचं मला दिसलं. मानसिक परिस्थिती चांगली नसल्याने भिका-यांनी मला भिक मागण्यास भाग पाडलं. काही दिवसाने आपल्यासोबत काय झालं आहे याची मला आठवण झाली आणि खूप प्रयत्नांनतर मी आपल्या घरी पोहोचले. याप्रकरणी कविताने न्यायालयात म्हणणं मांडलं आहे तसंच गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू असल्याचं चांदहट पोलीस स्थानकाकडून सांगण्यात आलं आहे.