एफ.आर.पी. न देणार्या 32 कारखान्यांना साखर आयुक्तांची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2016 00:16 IST
पुणे विभागातील 20 कारखान्यांचा समावेश; दंडात्मक कारवाईचा इशारा
एफ.आर.पी. न देणार्या 32 कारखान्यांना साखर आयुक्तांची नोटीस
पुणे विभागातील 20 कारखान्यांचा समावेश; दंडात्मक कारवाईचा इशारासोलापूर: सरत्या गाळप हंगामात गाळप केलेल्या उसाचे एफ.आर.पी. नुसार शेतकर्यांना पैसे दिले नसल्याने राज्यातील 32 साखर कारखान्यांची सुनावणी 29 एप्रिल रोजी ठेवण्यात आली आहे. यामध्ये पुणे विभागातील तब्बल 20 कारखान्यांचा समावेश आहे.यावर्षीचा गाळप हंगाम जवळपास सर्वच साखर कारखान्यांनी आटोपला आहे. यावर्षी राज्यातील 177 साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला व त्यापैकी सोमवारपर्यंत 171 साखर कारखान्यांचा प?ा पडला आहे. पुणे विभागातील सातारा व पुण्याचे पाच तर अहमदनगर विभागातील एक साखर कारखाना अद्यापही सुरू आहे. बंद झालेल्या व सुरु असलेल्यापैकी एफ.आर.पी.ची. रक्कम 14 दिवसात न देणार्या साखर कारखान्यांना दंडात्मक कारवाई करण्याची नोटीस साखर आयुक्तांनी बजावली आहे. शुक्रवार दिनांक 29 एप्रिल रोजी साखर आयुक्तांकडे ही सुनावणी होणार असून, त्यानंतर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. एफ.आर.पी. नुसार शेतकर्यांची रक्कम न देणार्या कारखान्यांमध्ये पुणे महसूल विभागातील पाच जिल्?ातील 20 कारखान्यांचा समावेश आहे. हे आहेत साखर कारखाने- उदयसिंह गायकवाड, भोगावती, वारणा, पंचगंगा (कोल्हापूर), रा.बा. पाटील(सवरेदय), रा. बा. पाटील (वाटेगाव), क्रांती कुडल, रा.बा. पाटील साखराळे, महांकाली, यशवंत खानापूर, माणगंगा(सांगली), जरंडेश्वर, र्शीराम फलटण, न्यू फलटण(सातारा), संत तुकाराम, वेंकटेश्वर कृपा, राजगड(पुणे), सीताराम महाराज खर्डी, सिद्धेश्वर कुमठे, शंकर अकलूज (सोलापूर), अंबालिका, अगस्ती (अहमदनगर), आर्मस्टाँग (नाशिक), सातपुडा तापी (नंदूरबार),मुक्तेश्वर, सिद्धेश्वर (औरंगाबाद), सर्मथ, सर्मथ सागर, समृद्धी (जालना), महाराष्ट्र शेतकरी (परभणी), विठ्ठलसाई मुरुम (उस्मानाबाद), वसंत पुसद (यवतमाळ).