मोर्चा एन्ट्रो...
By admin | Updated: December 19, 2014 22:57 IST
फसव्या आश्वासनापुढे शेतकऱ्यांनी वाजवल्या ताट-वाट्या
मोर्चा एन्ट्रो...
नवी मुंबई : कोकण भवनमधील निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या दालनामध्ये शुक्रवारी काँगे्रस व राष्ट्रवादी काँगे्रसच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. मतदार यादीमधील गोंधळावरून ही भांडणे झाली. बेलापूर मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकार्यांनी शुक्रवारी कोकणभवनमधील दालनामध्ये सर्वपक्षीय पदाधिकार्यांची बैठक आयोजित केली होती. महापालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात येणार्या प्रारूप मतदार यादीमध्ये त्रुटी राहू नयेत, जास्तीत जास्त पारदर्शकपणे यादी तयार व्हावी यासाठी ही मीटिंग आयोजित केली होती. या बैठकीमध्ये वाशीमधील काँगे्रसचे कार्यकर्ते विजय वाळुंज यांनी त्यांच्या प्रभागामधील बोगस नावे वगळण्यात यावीत अशी मागणी केली. त्याचवेळी याच प्रभागातील राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक राजू शिंदे यांनीही मतदार याद्या अद्ययावत झाल्या पाहिजेत याविषयी भूमिका मांडली. दोन्ही पक्षांच्या पदाधिकार्यांमध्ये चर्चेदरम्यान मतभेद विकोपास गेले. कार्यकर्त्यांनी हातवारे करून एकमेकांविरोधात बोलण्यास सुरवात केली. काहींनी शिवीगाळही केली व खुर्च्या उचलून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी व मतदार नोंदणी अधिकारी कल्पना जगताप यांच्या उपस्थितीमध्ये हे भांडण सुरू होते. अखेर इतर राजकीय पदाधिकार्यांनी दोन्ही बाजूच्या पदाधिकार्यांना अडवून शांत केले, अन्यथा कोकणभवनमध्ये तुंबळ मारामारी झाली असती. मतदार याद्यांच्या दुरुस्तीसाठी आयोजित पहिल्याच बैठकीत एवढा गोंधळ झाल्यामुळे यापुढे जाहीरपणे सर्वांना बोलावून मीटिंग होण्याविषयी शंका उपस्थित केली जात आहे. (प्रतिनिधी)चौकटआम्हाला बोलू दिले जात नव्हतेयुवक काँगे्रसचे बेलापूर मतदार संघाचे अध्यक्ष विजय वाळुंज यांनी सांगितले की, आमच्या प्रभागात मोठ्याप्रमाणात बोगस मतदार आहेत. त्यांची यादी आम्ही दिली असून ती वगळण्यात यावीत, अशी मागणी केली आहे. निवडणुका पारदर्शी होण्यासाठी बोगस मतदार वगळणे आवश्यक आहे. मीटिंग दरम्यान नगरसेवक आम्हाला आमचे मत मांडून देत नव्हते.आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्यामुळे भांडण झाले. विनाकारण भांडण केलेनगरसेवक राजू शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, काँगे्रसच्या पदाधिकार्यांनी विनाकारण भांडण केले व आम्हाला अपशब्द वापरले. मतदार याद्यांमधील त्रुटी सुधारून त्या अद्ययावत कराव्या ही आमचीही मागणी आहे. पत्ते व इतर चुका सुधारल्या पाहिजेत. परंतु बोगस मतदार व स्थलांतरित मतदार यामध्ये फरक असतो हेही समजून घेतले पाहिजे.