शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
3
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
4
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
5
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
6
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
7
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
8
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
9
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
10
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
11
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
12
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
13
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
14
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
15
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
16
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
17
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
18
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
19
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
20
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी

सर्व रेल्वे स्टेशनांवर मोफत ‘वाय-फाय’ सेवा मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 03:47 IST

देशाच्या ग्रामीण, दुर्गम व शहरी भागातील सर्व म्हणजे सुमारे ८,५०० रेल्वे स्थानकांमध्ये ‘वाय-फाय’ सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून या योजनेसाठी ७०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

नवी दिल्ली : देशाच्या ग्रामीण, दुर्गम व शहरी भागातील सर्व म्हणजे सुमारे ८,५०० रेल्वे स्थानकांमध्ये ‘वाय-फाय’ सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून या योजनेसाठी ७०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.‘डिजिटल इंडिया’ या सरकारच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत रेल्वे खात्याने अलीकडेच २१६ महत्त्वाच्या स्थानकांवर ‘वाय-फाय’ सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे या रेल्वे स्थानकांतील मोफत इंटरनेट सेवेचा सुमारे सत्तर लाख प्रवाशांना लाभ मिळत आहे. रेल्वे खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, दैनंदिन जीवनात इंटरनेट ही महत्त्वाची गरज झाली असून देशातील सर्व रेल्वे स्थानकांवर वाय-फायद्वारे मोफत इंटरनेट सेवा पुरविण्यात येणार आहे.देशातील १,२०० रेल्वे स्थानकांमध्ये ‘वाय-फाय’ची सुविधा ही मुख्यत्वे रेल्वे प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली जाईल. त्यशिवाय ग्रामीण व दुर्गम भागातील ७,३०० रेल्वे स्थानकांत फक्त प्रवासीच नव्हे तर स्थानिक रहिवासीही ‘वाय-फाय’ सुविधेद्वारे मोफत इंटरनेट सेवेचा लाभ घेऊ शकतील.ग्रामीण भागामध्ये डिजिटल बँकिंग, आधार कार्ड तयार करणे, सरकारी प्रमाणपत्रे, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र आॅनलाइनद्वारे मिळविणे, करभरणा, बिले भरणे या सर्व गोष्टींसाठी इंटरनेटचा जास्तीत जास्त वापर जनतेकडून व्हावा असे केंद्र सरकारचे प्रयत्न आहेत.2019च्या मार्चपर्यंत देशातील सर्व म्हणजे सुमारे ८५०० स्थानकांत ही सेवा उपलब्ध करून देण्याचे रेल्वे खात्याने ठरविले आहे.216महत्त्वाच्या स्टेशन्सवर सध्या मोफत वायफायची सुविधा दिली जाते. त्याची सेवा जवळपास ७० लाख प्रवासी घेत आहेत.लोकसभेसाठी फायदा-देशातील सर्व म्हणजे ८५०० रेल्वे स्थानकांवरवाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट मार्च २०१९पर्यंत पूर्ण करण्यात येईल. याच वर्षी आगामी लोकसभा निवडणुका होणार असून त्यामध्ये वाय-फाय सुविधा उद्दिष्टपूर्तीचा मुद्दा भाजपाकडून प्रचारात वापरला जाण्याची शक्यता आहे.डिजिटल इंडिया हा उपक्रम मोदी सरकारने कसा यशस्वीरीत्या राबविला हे दाखविण्यासाठी रेल्वे स्टेशनांतील वाय-फाय सुविधा उपलब्धतेच्या मुद्दा भाजपाकडून जोरकसपणे सांगितला जाऊ शकतो.ग्रामीण भागातही सेवा-ग्रामीण व दुर्गम भागातील रेल्वे स्थानकांमध्ये ‘वाय-फाय’ सुविधा उपलब्ध करून दिल्यास स्थानिक जनतेला त्याचा वापर करता येईल.त्याचप्रमाणे या भागातील रहिवाशांना रेल्वे स्थानकातील ‘वाय-फाय’ सेवेचा वापर करून इ-कॉमर्स पोर्टलवरून अनेक वस्तूंची खरेदी करणेही सुलभ होईल.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेWiFiवायफाय