शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

सीमेलगतची गावे मोकळी करा!

By admin | Updated: October 4, 2016 03:55 IST

सीमेलगतच्या पाच गावांतील महिला, मुलांना स्थलांतरित करा, असे आवाहन बीएसएफने केले आहे.

जैसलमेर : सीमेलगतच्या पाच गावांतील महिला, मुलांना स्थलांतरित करा, असे आवाहन बीएसएफने केले आहे. दोन देशांतील तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन ते पाच कि.मी.मधील गावांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. भारताने पाकव्याप्त काश्मिरात घुसून कारवाई केल्यानंतर दोन देशांतील तणाव वाढला आहे. येथील स्थानिक रहिवासी लहू सिंग सोधा यांनी सांगितले की, बीएसएफचे अधिकारी आणि पटवारी यांनी गेल्या दोन दिवसांत लुनार, कारडा, पोछिना, गुजनगढ, मिथदाऊ या गावांना भेटी दिल्या. गावातील महिला आणि मुलांना सुरक्षित स्थळी हलविण्याबाबत त्यांनी गावकऱ्यांना आवाहन केले आहे. तथापि, कोणत्याही क्षणी गाव रिकामे करण्याचा आदेश दिला जाऊ शकतो, असेही या गावकऱ्यांना सांगण्यात आले आहे. काही गावकऱ्यांनी या पूर्वीच या भागातून स्थलांतर केले आहे. जिल्हाधिकारी सुधीर शर्मा यांनी सांगितले की, परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. पटवारी, तहसीलदार यांना गावातील नागरिकांच्या याद्या तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या गावकऱ्यांचे शेत सीमेच्या जवळ आहे, त्यांनी शेतात सीमेपासून किमान ५०० मीटर दूर राहावे,’ अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. बीएसएफचा गोळीबारगुरदासपूर : आंतरराष्ट्रीय सीमेनजीक रविवारी रात्री संशयास्पद हालचाली दिसल्यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी गोळीबार केला. गुरदासपूर जिल्ह्यातील चक्री सीमा चौकीवर तैनात बीएसएफ जवानांना आंतरराष्ट्रीय सीमेलगत संशयास्पद हालचाली दिसल्यानंतर त्यांनी हवेत गोळीबाराच्या चार फैरी झाडल्या. नंतर या हालचाली मोकाट गुरांच्या असल्याचे आढळून आले, असे बीएसएफने सांगितले. भारतीय जवानांनी हवेत गोळीबार केला. पाककडून प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला गेला नाही. राजकारण करू नयेपाकव्याप्त काश्मिरातील भारताच्या कारवाईनंतर विरोधकांनी भडक विधाने केली आहेत. मात्र, या विषयाचे राजकारण करू नये, असे आवाहन पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी केले. सीमावर्ती भागात दौरा केल्यानंतर ते म्हणाले, ‘देशावर युद्धाचे ढग असताना काही नेते याला राजकीय स्वरूप देत आहेत, हे दुर्दैवी आहे.’ काँग्रेसचे पंजाबचे प्रमुख अमरिंदर सिंग यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती.लोक अजूनही गावांमध्येच सीमेलगतची गावे मोकळी करण्याचे आवाहन बीएसएफने केले असले, तरी अनेक गावांमध्ये अजूनही काही नागरिक आहेत. कोणत्याही क्षणी त्यांना गावाबाहेर जावे लागू शकते. सीमेलगतच्या रहिवाशांसाठी जम्मूत १०० शिबिरे स्थापन करण्यात आली आहेत, पण शेतीवाडी आणि जनावरे यांचे कारण देतअनेक नागरिक पुन्हा घराकडे परतू लागले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जम्मू भागात तीन जिल्ह्यांत सुरक्षित शिबिरात राहणाऱ्या नागरिकांच्या संख्येत घट झाली आहे. कठुआचे उपायुक्त रमेश कुमार यांनी सांगितले की, शिबिरातील २५० लोक येथून पळून गेले आहेत. या भागातील ३४ शिबिरांत १५ हजार लोक राहतात, तर अन्य २० शिबिरांपैकी तीनच शिबिरांत लोक राहतात. बहुतांश लोक आपल्या घरी परतले आहेत. सीमावर्ती सांबा भागातील २५ हजार लोकांना आपत्कालीन परिस्थितीचा फटका बसू शकतो.