शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात मोफत लस देणं गरजेचं, फडणवीसांची मन की बात

By महेश गलांडे | Updated: October 24, 2020 09:36 IST

बिहारमधील मोफत लसीच्या घोषणेवरुन विरोधकांनी भाजपाला चांगलंच धारेवर धरलं आहे. या मुद्द्यावरुन सर्वच राजकीय पक्ष भाजपावर टीका करत आहेत. राज्यातील, इतर राज्यांचे काय, इतर राज्यांना मोफत लस देणं, केंद्र सरकारची जबाबदारी नाही , असा सवालही अनेकांनी उपस्थित केलाय

ठळक मुद्देबिहारमध्ये मोफत लसीची घोषणा केल्यासंदर्भात बिहारचे निवडणूक प्रभारी आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, महाराष्ट्रालाही मोफत लस देणं गरजेचं असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय

मुंबई - बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांचा माहोल तापला असून भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात कोरोना महामारीच्या संकटाचं राजकारण केल्याचं दिसून येतय. कारण, बिहारमध्ये भाजपाची सत्ता आल्यास कोरोनाची लस मोफत देण्याचं आश्वासन भाजपाने आपल्या जाहीरनाम्यातून दिलंय. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनीही पत्रकार परिषदेत या वृत्ताला दुजोरा देत मतदारांना भाजपाला मत देण्याच आवाहन केलंय. भाजपाच्या या निर्णयावरुन भाजपावर टीका होत आहे. तर, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रालाही मोफत लस मिळालया हवी, अशी मन की बात सांगितली आहे. 

बिहारमधील मोफत लसीच्या घोषणेवरुन विरोधकांनी भाजपाला चांगलंच धारेवर धरलं आहे. या मुद्द्यावरुन सर्वच राजकीय पक्ष भाजपावर टीका करत आहेत. राज्यातील, इतर राज्यांचे काय, इतर राज्यांना मोफत लस देणं, केंद्र सरकारची जबाबदारी नाही , असा सवालही अनेकांनी उपस्थित केलाय. तर, शिवसेनेनंही सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर टीकेचे बाण सोडलेत. ''बिहारमध्ये जे काय निकाल लागायचे ते लागतील, पण भाजपाने मोफत लसीच्या सुया टोचण्याचे ‘फुकट’ उद्योग सुरू केले आहेत.बिहारला ‘लस’ मिळावी याबाबत दुमत नाही, पण इतर राज्ये काही पाकिस्तानात नाहीत. कोरोना लसीचा मुद्दा भाजपाच्या बिहारी घोषणापत्रात यावा हे योग्य नाही. लसीचे वितरण सरकारची राष्ट्रीय भूमिका असायला हवी. ही एक प्रकारे भेदाभेदीच आहे. राष्ट्रीय एकात्मतेस नव्या लसीची गरज आहे,'' अशा शब्दात शिवसेनेनं सामना अग्रलेखातून भाजपावर निशाणा साधला आहे.

बिहारमध्ये मोफत लसीची घोषणा केल्यासंदर्भात बिहारचे निवडणूक प्रभारी आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, महाराष्ट्रालाही मोफत लस देणं गरजेचं असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय. काही लोकं महाराष्ट्र सोडून जगभर बोलतात, तामिळनाडूतील  राज्य सरकारने मोफत कोरोना लसीची घोषणा केलीय, आता हेच दुटप्पी लोक टीका करत आहेत, असे म्हणत विरोधी पक्षांकडून सोयीनुसार भूमिका घेतली जात असल्याचे फडणवीस यांनी सूचवलंय. कोरोना संदर्भात केंद्र सरकार नक्कीच योजना आणेल, पण राज्यानेही त्यात भर घालावी लागेल, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.  

तुम मुझे व्होट दो, हम तुम्हे लस देंगे

लोकांना कोरोनाची भीती राहिलेली नाही. त्यांना बिहारात सत्ताबदल करायचा आहे. मतदारांना भीती दाखवून लस टोचण्याचा हा प्रकार निवडणूक आयोगाच्या नजरेतून सुटला कसा? स्वातंत्र्यपूर्व काळात ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आजादी दुंगी’ असा मंत्र होता. तो भारतमातेचा आक्रोश होता. त्याच धर्तीवर ‘तुम मुझे व्होट दो, हम तुम्हे लस देंगे!’ असा नारा दिलेला दिसतोय.

इतर राज्यांनी पुतीनकडून लस मागवायची काय

बिहारच्या निवडणुकीतून ‘विकास’ हरवला आहे. रोटी, कपडा, मकान, रोजगार हे मुद्दे चालत नाहीत. कारण त्याबाबत सगळा दुष्काळच आहे. सर्वत्र बेरोजगारी व गरिबीचा कहर आहे. त्यावर उतारा म्हणून मोफत लस टोचण्याचा प्रयोग सुरू झाला आहे. प. बंगाल, महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ, ओडिशा, पंजाब, राजस्थान अशा राज्यांत भाजप विचारांची सरकारे नाहीत. दिल्ली प्रदेशात केजरीवाल भाजपा विरोधाचा झेंडा घेऊन उभे आहेत. या राज्यांतील सरकारांनी पुतीनकडून लस मागवायची काय?

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकcorona virusकोरोना वायरस बातम्याDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस