शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

स्वतंत्र भारताच्या इतिहासात मध्यरात्रीच्या अधिवेशनाचा चौथा प्रसंग

By admin | Updated: June 30, 2017 21:15 IST

स्वतंत्र भारताच्या इतिहासात हा चौथा प्रसंग आहे की संसदेच्या सेंट्रल हॉलमधे मध्यरात्री विशेष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले

सुरेश भटेवरा/ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 30 - स्वतंत्र भारताच्या इतिहासात हा चौथा प्रसंग आहे की संसदेच्या सेंट्रल हॉलमधे मध्यरात्री विशेष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) या ऐतिहासिक कर सुधारणेसाठी शुक्रवारी मध्यरात्री संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन आयोजित करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. मात्र काँग्रेस, तृणमूल, समाजवादी, डावे पक्ष, द्रमुक इत्यादी प्रमुख विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार घातल्याने या उद्घाटन सोहळ्याला गालबोट लागले आहे.स्वातंत्र्याचा सोहळा साजरा करण्यासाठी यापूर्वी तीन वेळा मध्यरात्री संसदेचे संयुक्त अधिवेशन झाले होते. पहिले अधिवेशन १४ आॅगस्ट १९४७ च्या मध्यरात्री झाले. सेंट्रल हॉलला त्याकाळी कॉन्स्टिटयुशन हॉल संबोधले जात असे. पंडित नेहरूंनी ‘ट्रिस्ट वुईथ डेस्टिनी’ (नियतीशी भेटण्याचा करार) चे पहिले ऐतिहासिक भाषण या उत्सवी अधिवेशनात केले. दुसरे अधिवेशन १४ आॅगस्ट १९७२ च्या मध्यरात्री भारताच्या स्वातंत्र्याला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने झाले. त्यावेळी राष्ट्रपती व्ही.व्ही.गिरी तर पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या. तिसरे अधिवेशन स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने १४ आॅगस्ट १९९७ च्या मध्यरात्री झाले. त्यावेळी राष्ट्रपती के.आर.नारायणन तर पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल होते. मध्यरात्रीची ही तिन्ही अधिवेशने स्वातंत्र्य सोहळयाची स्मृती चिरंतन करण्यासाठी होती. त्याच धर्तीवर स्वातंत्र्यानंतरच्या महत्वपूर्ण कर सुधारणेची आठवण भारताच्या इतिहासात कायम रहावी, यासाठी शुक्रवारी सेंट्रल हॉलमधे मध्यरात्रीच्या अधिवेशनाचे आयोजन मोदी सरकारने केले आहे. करसुधारणेचा सोहळा मध्यरात्री साजरा करण्यासाठी योजलेले हे पहिलेच अधिवेशन आहे.

(GST Impact - मध्यरात्री 12 वाजता 17 टॅक्स आणि 23 सेस होणार रद्द)
(जीएसटीमुळे त्यांचा होणार 20 हजार कोटींचा व्यापार)वस्तू आणि सेवा कर ही स्वातंत्र्यानंतर ७0 वर्षातली मोठी व महत्वपूर्ण कर सुधारणा आहे. चार केंद्र सरकारांच्या काळात या सुधारणांचे मंथन जीएसटी कौन्सिलने केले. भारतीय संघराज्य व्यवस्थेचे प्रतीक बनलेल्या या कर सुधारणेच्या लाँचिंगसाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सर्व सदस्य, देशातील राज्य सरकारांचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री तसेच जीएसटीसाठी नियुक्त विशेष अधिकारयुक्त समितीच्या साऱ्या सदस्यांना मध्यरात्री होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. महत्वाच्या निर्णयांचे मेगा इव्हेंटमधे रूपांतर करण्याचा मोदी सरकारला छंद आहे. त्यानुसार योजलेला हा प्रयोग असल्याने विरोधकांनी या सोहळयाला पुरेशा पूर्वतयारीशिवाय योजलेला तमाशा असे संबोधले आहे. 

जीएसटीचा आजवरचा प्रवास बराच रंजक आहे.अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारने १९९९ साली देशात जीएसटी लागू करण्याचा विचार सुरू केला. अर्थ मंत्रालयाच्या तत्कालिन सल्लागार समितीने त्याची चर्चा केली मात्र हा कायदा प्रत्यक्षात लागू करण्यात बऱ्याच अडचणी असल्याने १७ वर्षे त्याचा प्रयत्न लांबतच गेला. १९९१ साली भारतात प्रथमच आर्थिक सुधारणांचे पर्व सुरू झाले. या पर्वाची २५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर अनेक अडथळे पार करीत देशातल्या १७ अप्रत्यक्ष करांचा एकाच कर प्रणालीत समावेश करणारी ही महत्वपूर्ण आर्थिक सुधारणा अखेर शुक्रवारी मध्यरात्री प्रत्यक्ष साकार होते आहे. जम्मू काश्मीर वगळता देशातल्या तमाम राज्यांमधे १ जुलैपासून ही कर व्यवस्था अमलात येणार आहे.