शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

चार गटांसाठी एकोणीस, तर आठ गणांसाठी चाळीस उमेदवार रिंगणात

By admin | Updated: February 13, 2017 19:11 IST

गटासाठी १५ जणांची, तर गणांसाठी २५ उमेदवारांची माघार

नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारीच्या सोमवारी (दि.१३) या दिवशी नाशिक तालुक्यातील चार गटांसाठी एकोणीस, तर आठ गणांसाठी चाळीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उन्मेश महाजन यांनी दिली.माघारीच्या अंतिम दिवशी गटांसाठी १५, तर गणांसाठी २५ उमेदवारांनी माघारी घेतल्या. माघारी घेतलेल्या उमेदवारांमध्ये गिरणारे गटातून संगीता चारस्कर व इंदूबाई बेंडकोळी, पळसे गटातून उपसभापती अनिल ढिकले, भाऊसाहेब ढिकले, सविता तुंगार, हरिश्चंद्र बोराडे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे यांनी माघारी घेतल्या. तर एकलहरे गटासाठी प्रकाश आडके, अतुल धनवटे, मोहन लिंबोळे, तसेच गोवर्धन गटातून वामन हिरामण खोसकर, राहुल गुंबाडे, राजेंद्र चारस्कर, रवींद्र मोंढे, कृष्णा वाघ यांचा अर्ज माघारी घेणाऱ्या उमेदवारांमध्ये समावेश आहे. पंचायत समितीच्या आठ गणांसाठी देवरगाव गणातून लताबाई उदार, गिरणारे गणातून दीपाली कडाळे, संगीता चारस्कर, सिद्धप्रिंपी गणातून सोनाली कांडेकर, रेखा ढिकले, संगीता ढिकले, सुनंदा पेखळे, पळसे गणातून राणी गायधनी, लीलाबाई गायधनी, सविता तुंगार, प्रियंका धात्रक, एकलहरे गणातून शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के, सुरेश घुगे, भाऊसाहेब जगताप, लक्ष्मण ढोमसे, राजू धात्रक, सुनंदा पेखळे, प्रकाश बर्वे, मोहन लिंबोळे, लहवित गणातून मंगला गोडसे, गोवर्धन गणातून तानाजी गडदे, विल्होळी गणातून संपत चुंबळे, भास्कर थोरात, सदानंद नवले आदिंनी माघारी घेतल्या आहेत. सोमवारी सकाळपासूनच शिवसेनेकडून तालुकाप्रमुखांसह बंडखोरांचे मन वळविण्यासाठी फारसे प्रयत्न केले गेले नसल्याचे चित्र होते.