शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

सरकारी बंगले सोडण्यास चार माजी मुख्यमंत्री तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 04:52 IST

उत्तर प्रदेशच्या सहा माजी मुख्यमंत्र्यांनी बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवलेले शासकीय बंगले रिकामे करावेत

लखनौ : उत्तर प्रदेशच्या सहा माजी मुख्यमंत्र्यांनी बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवलेले शासकीय बंगले रिकामे करावेत म्हणून सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली मुदत ३ जून रोजी संपत आहे. ते लक्षात घेऊन मुलायमसिंह यादव, राजनाथसिंह, कल्याणसिंह, अखिलेश यादव या चार माजी मुख्यमंत्र्यांनी हे बंगले रिकामे करण्याची तयारी दाखविली आहे. मात्र मायावती, नारायणदत्त तिवारी यांनी याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार उत्तर प्रदेश सरकारच्या मालमत्ता विभागाने या सहा जणांना नोटिसा बजावल्या होत्या. नारायण दत्त तिवारी यांचे हे अतिशय आजारी आहेत. त्यामुळे सरकारी बंगला सोडण्यासाठी मुदतवाढ मिळावी अशी विनंती त्यांची पत्नी उज्ज्वला यांनी राज्य सरकारकडे केली आहे.कांशीराम स्मारकासाठी बसपाचे प्रयत्नमायावतींना माजी मुख्यमंत्री या नात्याने १३ ए मॉल अ‍ॅव्हेन्यू बंगला राहाण्यास दिला होता. लालबहादूर शास्त्री मार्गावरील बंगला त्यांनी बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना १३ ए मॉल अ‍ॅव्हेन्यू बंगला रिकामा करावाच लागेल असेही उत्तर प्रदेश सरकारने म्हटले आहे.या बंगल्याचे कांशीराम स्मारकस्थळात २०११ साली रूपांतर करण्यात आले होते असा दावा बसपाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन केला होता.बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी लखनौ येथील १३ ए मॉल अ‍ॅव्हेन्यू हा बंगला बसपाचे संस्थापक कांशीराम यांचे स्मारक आहे आणि लालबहादूर शास्त्री मार्गावरील ६ क्रमांकाचा जो बंगला मला राहण्यासाठी दिला होता, जो आपण रिकामा केला आहे असा दावा केला होता.उत्तर प्रदेश सरकारला हा दावा मान्य नाही. त्यामुळे त्यांच्याबाबत न्यायालय काय भूमिका घेते, हे पाहणे गरजेचे आहे.