शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

युपीएचे माजी मंत्री असुरक्षित

By admin | Updated: February 22, 2015 00:13 IST

अलीकडेच ३२७ अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा घेत माजी मंत्र्यांची सुरक्षा काढून घेतली असून काहींना कमी दर्जाचे सुरक्षा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : केंद्रातील सत्तांतरामुळे प्रशासकीय पातळीवर, तसेच धोरणात्मक बदल होणे स्वाभाविक असले तरी अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेबाबत आढावा घेऊन काहींची सुरक्षा काढून घेणे आणि काहींना कमी दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेऊन केंद्र सरकारने संकुचितपणा दाखवावा, हे पटण्यासारखे नाही; परंतु सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, हेच खरे. भाजपप्रणीत केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने अलीकडेच ३२७ अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा घेत माजी मंत्र्यांची सुरक्षा काढून घेतली असून काहींना कमी दर्जाचे सुरक्षा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे.काँग्रेसच्या अनेक माजी मंत्र्यांसोबत काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने नियुक्त केलेल्या अनेक माजी पोलीस अधिकाऱ्यांची सुरक्षाही काढून घेण्यात आली आहे. तथापि, रालोआतील काही नेत्यांची सुरक्षा वाढवून केंद्र सरकारने दुजाभाव केला आहे.माजी माहिती आणि नभोवाणीमंत्री मनीष तिवारी, माजी कोळसामंत्री श्रीप्रकाश जैस्वाल यांची ‘झेड’ सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. माजी पोलादमंत्री बेनी प्रसाद वर्मा आणि लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीरा कुमार यांची सुरक्षा कमी करून त्यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. रिता बहुगुणा, जतीन प्रसाद, पी. एल. पुनिया, आरपीएन सिंग आणि सलीम शेरवानी यांनाही सुरक्षेला मुकावे लागणार आहे.बसपाचे ब्रजेश पाठक, धनंजय सिंग यांनाही झेडऐवजी वाय सुरक्षा देण्यात येणार आहे. केंद्रीय गृहसचिव एल. सी. गोयल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेबाबतचा आढावा घेण्याची प्रक्रिया अजूनही चालूच आहे. अतिमहत्त्वाच्या जवळपास २० व्यक्तींची सुरक्षा एकतर पूर्णत: काढण्यात आली किंवा कमी करण्यात आली आहे. यात अमेठी आणि रायबरेलीतील दोन काँग्रेसच्या निष्ठावंत नेत्यांचाही समावेश आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांना सुरक्षा दिली होती.सत्तेत आल्यानंतर रालोआने भाजप आणि भाजपशीसंबंधित असलेल्या व्यक्तींना सर्रास सुरक्षा देण्याचा सपाटा लावला.मुजफ्फरनगर दंगलीतील आरोपी सुरेश राणा हे भाजपचे असल्याने त्यांना झेड सुरक्षा देण्यात आली आहे. आधी त्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती. दंगलीतील अन्य एक आरोपी संगीत सोम यांना सुरक्षा कवच देण्यात आले आहे.छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांना आता एनएसजी ब्लॅक कॅट कमांडोऐवजी सीआरपीएफ जवानांचे संरक्षण असेल.लालू प्रसाद यादव यांची एनएसजी कमांडोजची सुरक्षा काढून त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफच्या जवानांवर सोपविली जाऊ शकते. तथापि, त्यांना दिल्ली आणि बिहारमध्ये ‘झेड’ सुरक्षा असेल. शारदा घोटाळाप्रकरणी सीबीआयने अटक केलेले आरोपी मतंग सिंग यांना २१ राज्यात देण्यात आलेली झेड प्लस सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)