शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

युपीएचे माजी मंत्री असुरक्षित

By admin | Updated: February 22, 2015 00:13 IST

अलीकडेच ३२७ अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा घेत माजी मंत्र्यांची सुरक्षा काढून घेतली असून काहींना कमी दर्जाचे सुरक्षा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : केंद्रातील सत्तांतरामुळे प्रशासकीय पातळीवर, तसेच धोरणात्मक बदल होणे स्वाभाविक असले तरी अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेबाबत आढावा घेऊन काहींची सुरक्षा काढून घेणे आणि काहींना कमी दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेऊन केंद्र सरकारने संकुचितपणा दाखवावा, हे पटण्यासारखे नाही; परंतु सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, हेच खरे. भाजपप्रणीत केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने अलीकडेच ३२७ अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा घेत माजी मंत्र्यांची सुरक्षा काढून घेतली असून काहींना कमी दर्जाचे सुरक्षा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे.काँग्रेसच्या अनेक माजी मंत्र्यांसोबत काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने नियुक्त केलेल्या अनेक माजी पोलीस अधिकाऱ्यांची सुरक्षाही काढून घेण्यात आली आहे. तथापि, रालोआतील काही नेत्यांची सुरक्षा वाढवून केंद्र सरकारने दुजाभाव केला आहे.माजी माहिती आणि नभोवाणीमंत्री मनीष तिवारी, माजी कोळसामंत्री श्रीप्रकाश जैस्वाल यांची ‘झेड’ सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. माजी पोलादमंत्री बेनी प्रसाद वर्मा आणि लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीरा कुमार यांची सुरक्षा कमी करून त्यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. रिता बहुगुणा, जतीन प्रसाद, पी. एल. पुनिया, आरपीएन सिंग आणि सलीम शेरवानी यांनाही सुरक्षेला मुकावे लागणार आहे.बसपाचे ब्रजेश पाठक, धनंजय सिंग यांनाही झेडऐवजी वाय सुरक्षा देण्यात येणार आहे. केंद्रीय गृहसचिव एल. सी. गोयल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेबाबतचा आढावा घेण्याची प्रक्रिया अजूनही चालूच आहे. अतिमहत्त्वाच्या जवळपास २० व्यक्तींची सुरक्षा एकतर पूर्णत: काढण्यात आली किंवा कमी करण्यात आली आहे. यात अमेठी आणि रायबरेलीतील दोन काँग्रेसच्या निष्ठावंत नेत्यांचाही समावेश आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांना सुरक्षा दिली होती.सत्तेत आल्यानंतर रालोआने भाजप आणि भाजपशीसंबंधित असलेल्या व्यक्तींना सर्रास सुरक्षा देण्याचा सपाटा लावला.मुजफ्फरनगर दंगलीतील आरोपी सुरेश राणा हे भाजपचे असल्याने त्यांना झेड सुरक्षा देण्यात आली आहे. आधी त्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती. दंगलीतील अन्य एक आरोपी संगीत सोम यांना सुरक्षा कवच देण्यात आले आहे.छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांना आता एनएसजी ब्लॅक कॅट कमांडोऐवजी सीआरपीएफ जवानांचे संरक्षण असेल.लालू प्रसाद यादव यांची एनएसजी कमांडोजची सुरक्षा काढून त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफच्या जवानांवर सोपविली जाऊ शकते. तथापि, त्यांना दिल्ली आणि बिहारमध्ये ‘झेड’ सुरक्षा असेल. शारदा घोटाळाप्रकरणी सीबीआयने अटक केलेले आरोपी मतंग सिंग यांना २१ राज्यात देण्यात आलेली झेड प्लस सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)