शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

माजी सरन्यायाधीशांचा ‘तो’ वादग्रस्त निकाल मागे

By admin | Updated: April 12, 2016 02:32 IST

देशातील खासगी व अल्पसंख्य संस्थांसह सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमधील पदवी व आणि पदव्युत्तर प्रवेशांसाठी संपूर्ण देशाच्या पातळीवर एकच सामाईक पात्रता व प्रवेश

नवी दिल्ली : देशातील खासगी व अल्पसंख्य संस्थांसह सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमधील पदवी व आणि पदव्युत्तर प्रवेशांसाठी संपूर्ण देशाच्या पातळीवर एकच सामाईक पात्रता व प्रवेश परीक्षा (नॅशनल एलिजिबिलिटी अ‍ॅण्ड एन्ट्रन्स टेस्ट-एनईईटी) घेण्याचा मेडिकल कौन्सिलचा निर्णय घटनाबाह्य ठरवून रद्द करण्याचा तीन वर्षांपूर्वी स्वत:च दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मागे घेतला. परिणामी आगामी शैक्षणिक वर्षांत ही परीक्षा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजसह देशभरातील अनेक खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी केलेल्या याचिका मंजूर करून तत्कालिन सरन्यायाधीश न्या. अल्तमास कबीर यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने २:१ अशा बहुमताने हा निकाल १८ जुलै २०१३ रोजी दिला होता. सरन्यायाधीश न्या. कबीर यांच्या निवृत्तीच्या दिवशीच हा निकाल दिला गेला होता. त्यात स्वत: न्या. कबीर यांनी व न्या. विक्रमजीत सेन यांनी परीक्षेच्या विरोधात तर न्या. अनिल आर. दवे यांनी परीक्षेच्या बाजूने निकाल दिला होता.या निकालाचा फेरविचार करण्यासाठी भारत सरकार व मेडिकल कौन्सिलने लगेचच ‘रिव्ह्यू पिटिशन’ केल्या होत्या. मध्यंतरी या फेरविचार याचिका तीनऐवजी पाच न्यायाधीशांच्या पूर्णपीठाकडे वर्ग केल्या गेल्या होत्या. नियमानुसार मूळ निकाल देणारे सर्व न्यायाधीश उपलब्ध नसतील तर उपलब्ध असलेल्या न्यायाधीशांपुढे किवा त्यापैकी एका तरी न्यायाधीशाने फेरविचार याचिकांवर सुनावणी करावी लागते. मूळ निकाल देणाऱ्यांपैकी आता फक्त न्या. दवे उपलब्ध असल्याने त्यांच्यासह न्या. ए. के. सिक्री, न्या. आर. के. अगरवाल, न्या. आदर्श कुमार गोयल व न्या. आर. भानुमती यांच्या पूर्णपीठाने फेरविचार याचिकांवर सुनावणी करून मूळ निकाल मागे घेतला आणि वेल्लोर कॉलेजसह इतर याचिकांवर पूर्णपणे नव्याने सुनावणी घेण्याचा आदेश दिला. निकाल मागे घेण्यासाठी पूर्णपीठाने जी कारणे दिली ती केवळ महत्वाची नव्हे तर ऐतिहासिकही म्हणावी लागतील. नव्याने होणाऱ्या सुनावणीत कोणत्याही पक्षाची बाजू पूर्वग्रहदूषित होऊ नये म्हणून सविस्तर समीक्षा न करता न्यायालयाने दोन कारण नमूद केली. एक, आधीचे बहुमताचे निकालपत्र संबंधित मुद्द्यांवरील पूर्वीच्या बंधनकार अशा निकालांचा विचार न करता दिले गेले होते. दोन, नेहमीच्या प्रथेला बाजूला ठेवून त्या निकालपत्रावर न्यायाधीशांमध्ये आधी आपसात विचार-विनिमय केला गेला नव्हता व निकालपत्राचा कच्चा मसुदा न्यायाधीशांमध्ये वाचण्यासाठी वितरितही केला गेला नव्हता.विशेष म्हणजे न्या. दवे यांनी आधीच्या निकालपत्राच्या वेळीही अल्पमताचा निकाल लिहिताना न्यायाधीशांमध्ये आपसात चर्चा न झाल्याचे व तरीही सरन्यायाधीशांच्या निवृत्तीमुळे वेळ नसल्याने आपण नाईलाजाने या निकालपत्रात सहभागी होत असल्याचे नमूद केले होते. नियतीचा खेळ असा की, ज्या न्या. दवे यांना आधी अल्पमतात असल्याने गप्प बसावे लागले होते त्यांनीच आता तीन वर्षांनी इतर न्यायाधीशांच्या सहमतीने पूर्वी आपल्याला न पटलेला निकाल मागे घेतला.निकाल आधीच फुटला होताजो निकाल आता मागे घेण्यात आला तो केवळ सरन्यायाधीशांच्या निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी दिला गेला म्हणून नव्हे तर अन्य कारमानेही वादग्रस्त ठरला होता. सर्वोच्च न्यायालयातील एका वकिलाने त्या दिवशी प्रत्यक्ष निकाल ोहण्याच्या आधीच निकाल काय होणार याचे अचूक भाकित करणारी माहिती सोशल मीडियावर टाकली होती.