शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

माजी सरन्यायाधीशांचा ‘तो’ वादग्रस्त निकाल मागे

By admin | Updated: April 12, 2016 02:32 IST

देशातील खासगी व अल्पसंख्य संस्थांसह सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमधील पदवी व आणि पदव्युत्तर प्रवेशांसाठी संपूर्ण देशाच्या पातळीवर एकच सामाईक पात्रता व प्रवेश

नवी दिल्ली : देशातील खासगी व अल्पसंख्य संस्थांसह सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमधील पदवी व आणि पदव्युत्तर प्रवेशांसाठी संपूर्ण देशाच्या पातळीवर एकच सामाईक पात्रता व प्रवेश परीक्षा (नॅशनल एलिजिबिलिटी अ‍ॅण्ड एन्ट्रन्स टेस्ट-एनईईटी) घेण्याचा मेडिकल कौन्सिलचा निर्णय घटनाबाह्य ठरवून रद्द करण्याचा तीन वर्षांपूर्वी स्वत:च दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मागे घेतला. परिणामी आगामी शैक्षणिक वर्षांत ही परीक्षा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजसह देशभरातील अनेक खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी केलेल्या याचिका मंजूर करून तत्कालिन सरन्यायाधीश न्या. अल्तमास कबीर यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने २:१ अशा बहुमताने हा निकाल १८ जुलै २०१३ रोजी दिला होता. सरन्यायाधीश न्या. कबीर यांच्या निवृत्तीच्या दिवशीच हा निकाल दिला गेला होता. त्यात स्वत: न्या. कबीर यांनी व न्या. विक्रमजीत सेन यांनी परीक्षेच्या विरोधात तर न्या. अनिल आर. दवे यांनी परीक्षेच्या बाजूने निकाल दिला होता.या निकालाचा फेरविचार करण्यासाठी भारत सरकार व मेडिकल कौन्सिलने लगेचच ‘रिव्ह्यू पिटिशन’ केल्या होत्या. मध्यंतरी या फेरविचार याचिका तीनऐवजी पाच न्यायाधीशांच्या पूर्णपीठाकडे वर्ग केल्या गेल्या होत्या. नियमानुसार मूळ निकाल देणारे सर्व न्यायाधीश उपलब्ध नसतील तर उपलब्ध असलेल्या न्यायाधीशांपुढे किवा त्यापैकी एका तरी न्यायाधीशाने फेरविचार याचिकांवर सुनावणी करावी लागते. मूळ निकाल देणाऱ्यांपैकी आता फक्त न्या. दवे उपलब्ध असल्याने त्यांच्यासह न्या. ए. के. सिक्री, न्या. आर. के. अगरवाल, न्या. आदर्श कुमार गोयल व न्या. आर. भानुमती यांच्या पूर्णपीठाने फेरविचार याचिकांवर सुनावणी करून मूळ निकाल मागे घेतला आणि वेल्लोर कॉलेजसह इतर याचिकांवर पूर्णपणे नव्याने सुनावणी घेण्याचा आदेश दिला. निकाल मागे घेण्यासाठी पूर्णपीठाने जी कारणे दिली ती केवळ महत्वाची नव्हे तर ऐतिहासिकही म्हणावी लागतील. नव्याने होणाऱ्या सुनावणीत कोणत्याही पक्षाची बाजू पूर्वग्रहदूषित होऊ नये म्हणून सविस्तर समीक्षा न करता न्यायालयाने दोन कारण नमूद केली. एक, आधीचे बहुमताचे निकालपत्र संबंधित मुद्द्यांवरील पूर्वीच्या बंधनकार अशा निकालांचा विचार न करता दिले गेले होते. दोन, नेहमीच्या प्रथेला बाजूला ठेवून त्या निकालपत्रावर न्यायाधीशांमध्ये आधी आपसात विचार-विनिमय केला गेला नव्हता व निकालपत्राचा कच्चा मसुदा न्यायाधीशांमध्ये वाचण्यासाठी वितरितही केला गेला नव्हता.विशेष म्हणजे न्या. दवे यांनी आधीच्या निकालपत्राच्या वेळीही अल्पमताचा निकाल लिहिताना न्यायाधीशांमध्ये आपसात चर्चा न झाल्याचे व तरीही सरन्यायाधीशांच्या निवृत्तीमुळे वेळ नसल्याने आपण नाईलाजाने या निकालपत्रात सहभागी होत असल्याचे नमूद केले होते. नियतीचा खेळ असा की, ज्या न्या. दवे यांना आधी अल्पमतात असल्याने गप्प बसावे लागले होते त्यांनीच आता तीन वर्षांनी इतर न्यायाधीशांच्या सहमतीने पूर्वी आपल्याला न पटलेला निकाल मागे घेतला.निकाल आधीच फुटला होताजो निकाल आता मागे घेण्यात आला तो केवळ सरन्यायाधीशांच्या निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी दिला गेला म्हणून नव्हे तर अन्य कारमानेही वादग्रस्त ठरला होता. सर्वोच्च न्यायालयातील एका वकिलाने त्या दिवशी प्रत्यक्ष निकाल ोहण्याच्या आधीच निकाल काय होणार याचे अचूक भाकित करणारी माहिती सोशल मीडियावर टाकली होती.