शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

विकासासाठी मतभेद विसरा

By admin | Updated: February 9, 2015 06:19 IST

विकास, रोजगारनिर्मिती आणि गुंतवणूकचक्र पुनरुज्जीवित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मतभेद विसरत एकजुटीने काम करावे,

नवी दिल्ली : विकास, रोजगारनिर्मिती आणि गुंतवणूकचक्र पुनरुज्जीवित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मतभेद विसरत एकजुटीने काम करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नीति आयोगाच्या संचालन परिषदेच्या पहिल्या बैठकीला संबोधित करताना केले. तसेच राज्यांना अधिक निधी व त्याच्या वापराचे जादा अधिकार दिले जातील, असेही पंतप्रधानांनी सांगितले.प्रकल्पांच्या मंदगतीला कारणीभूत घटकांवर मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिकरीत्या लक्ष घालावे व प्रकल्पांच्या अंमलबजावणीला गती देतानाच त्यासंबंधी प्रलंबित मुद्द्यांचा निपटारा करण्यासाठी प्रत्येक राज्याने खास अधिकाऱ्याकडे जबाबदारी सोपवावी, असेही पंतप्रधानांनी सुचविले. गरिबी हे देशातील सर्वांत मोठे आव्हान असून, नवगठित नीति आयोग सहकार्य आणि स्पर्धात्मक सांघिकतेचे आदर्श घालून देतो, असेही ते म्हणाले. सहा दशकांपूर्वीच्या योजना आयोगाची जागा नव्या भारत परिवर्तन राष्ट्रीय संस्थेने (नीति आयोग) घेतली आहे. केंद्र आणि राज्य सरकारांसाठी बौद्धिक संस्थेच्या रूपात हा आयोग काम करणार असून, धोरणात्मक मार्गदर्शनही करेल. पंतप्रधान हे या आयोगाचे अध्यक्ष आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)> केंद्राच्या काही योजना राज्यांकडे वर्ग करणारकेंद्र सरकारच्या शंभरहून अधिक योजनांसाठी यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात ३.३८ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी काही योजना राज्यांकडे वर्ग करण्याचे सूतोवाच मोदी यांनी केले. यापैकी ६६ योजनांचे सुसूत्रीकरण करून त्यापैकी कोणत्या सुरू ठेवायच्या, कोणत्या राज्यांकडे वर्ग करायच्या आणि कोणत्या योजनांना कात्री लावायची यावर विचार करण्यासाठी नीति आयोगांतर्गत मुख्यमंत्र्यांचा एक उपगट स्थापन केला जाईल, असेही मोदी यांनी सांगितले. सर्वांसाठी एकाच प्रकारची योजना, या मानसिकतेतून बाहेर पडून राज्यांची गरज व योजना यांच्यात समन्वय साधण्यात येईल, यावर त्यांनी भर दिला.