शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

उपग्रहाद्वारे पीक नासाडीचा अंदाज

By admin | Updated: November 6, 2015 01:30 IST

दुष्काळाचा आढावा घेण्याबरोबर वैज्ञानिक पद्धतीने शेतकऱ्यांचे नुकसान पडताळणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार असून, त्यानुसार कार्यवाही करण्याचे सर्वच राज्यांसमोर आव्हान आहे,

- राजू नायक,  नवी दिल्लीदुष्काळाचा आढावा घेण्याबरोबर वैज्ञानिक पद्धतीने शेतकऱ्यांचे नुकसान पडताळणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार असून, त्यानुसार कार्यवाही करण्याचे सर्वच राज्यांसमोर आव्हान आहे, अशी माहिती विज्ञान आणि पर्यावरण केंद्राने (सीएसई) आयोजित केलेल्या ‘वातावरण बदल’ या विषयावरील पत्रकारांच्या कार्यशाळेत देण्यात आली.‘तीव्र हवामानाच्या घटना व आपत्तींशी मुकाबला’ या विषयावरील चर्चासत्रात सीएसईचे संशोधक अर्जुन श्रीनिधी म्हणाले, ‘महाराष्ट्र आता सतत सहावेळा दुष्काळाचा सामना करीत असून, पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी उपग्रह छायाचित्रांचा वापर महाराष्ट्र सुरू करणार आहे. महाराष्ट्रात प्रायोगिक पद्धतीने उपग्रह कसा काम करतो याची पडताळणी केल्यानंतर, याच कामासाठी निर्धारित काही उपग्रह उपयोगात आणले जाण्याची शक्यता आहे,’ असे श्रीनिधी यांनी सांगितले.दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी उपायउपग्रहांचा वापर करून नुकसानीचा आढावा घ्यावा.पिकांसाठी खास विमा योजना आखून त्याची पारदर्शक व जलद कार्यवाही व्हावी.विम्याचे हप्ते किफायतशीर व सोपे असावेत.विम्याचे हप्ते सवलतीत देण्याची मुभा असावी.शेतकऱ्यांना संस्थात्मक सोपे कर्ज उपलब्ध व्हावे.छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, दुष्काळात सरकारी यंत्रणेने त्यांना तातडीने मदत करावी.पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्युट आॅफ ट्रॉपिकल मेथॉडॉलॉजीचे वैज्ञानिक रॉक्सी मॅथ्यु कॉल यांनी ‘लोकमत’ला सांगितले, की हवामान खात्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुढच्या दहा वर्षांतील हवामानाचा अंदाज शेतकऱ्यांकडे कसा पोहोचवावा, यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे.देशात २०१० पासून अतितीव्र वातावरणामुळे दरवर्षी अंदाजे ३५० दुर्घटना घडतात आणि त्यात हजारो जण मृत्युमुखी पडू लागले आहेत.- चंद्रभूषण,उपसंचालक, सीएसईदेशामध्ये हवामानाचा अंदाज देणाऱ्या खासगी कंपन्या स्थापन होऊ लागल्या असून, विमा कंपन्या पिकांच्या नासाडीचा अंदाज घेण्यासाठी आपल्या फायद्याचा विचार करून खासगी हवामान कंपन्या तैनात करू लागल्या आहेत, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. सरकारने यात हस्तक्षेप करावा, असे आवाहन त्यांनी केले.- सुनीता नारायण, संचालक, सीएसई