शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
3
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
4
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
5
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
7
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
8
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
9
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
10
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
11
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
12
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
13
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
14
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
15
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
16
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
17
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
18
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
19
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

राजीनामा देण्यास भाग पाडले!

By admin | Updated: February 8, 2017 01:36 IST

तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांनी पक्ष प्रमुख व्ही. के. शशिकला यांच्याविरुद्ध मंगळवारी रात्री बंडाचे निशाण फडकाविले

चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांनी पक्ष प्रमुख व्ही. के. शशिकला यांच्याविरुद्ध मंगळवारी रात्री बंडाचे निशाण फडकाविले. मला पदाचा राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले आहे. तामिळनाडूची जनता, अद्रमुक कार्यकर्ते आणि आमदारांची इच्छा असेल तर मी राजीनामा मागे घेईन, असे सांगून पनीरसेल्वम यांनी बॉम्बगोळा टाकला. त्यांच्या या पवित्र्याने तामिळनाडूतील राजकीय घटनाक्रमाला वेगळे वळण मिळाले आहे.

दिवंगत जयललिता यांच्या मरिना येथील समाधीस्थळी रात्री ४० मिनिटे ध्यानमुद्रेत बसून पन्नीरसेल्वम यांनी राज्यासह देशाचे लक्ष्य वेधून घेतले. पक्षाच्या सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग प्रशस्त व्हावा यासाठी पनीरसेल्वम यांनी पदाचा राजीनामा दिला होता. राज्यपालांनी पनीरसेल्वम यांचा राजीनामा स्वीकारला. तथापि, नवे सरकार स्थापन होईपर्यंत मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहण्यास सांगितले आहे.

पन्नीरसेल्वम म्हणाले वरदा येथील परिस्थिती मी यशस्वीरित्या हाताळल्यामुळे शशीकला यांना राग आला होता. जलिकट्टू माझ्यासाठी मोठा विजय होता केंद्र सरकारशी सतत चर्चा करून मी तो खेळ मिळवण्यात यशस्वी ठरलो,असे ते म्हणाले.केवळ लोकप्रिय नेताच मुख्यमंत्री बनू शकतो, असे म्हणून पन्नीरसेल्वम यांनी शशीकला यांचे आव्हान स्वीकारले आहे. जयललिता यांचा आत्मा माझ्याशी बोलला, असे सांगून पनीरसेल्वम म्हणाले की, ‘‘जयललितांचा आत्मा म्हणाला की काही सत्य तमिळनाडुच्या लोकांना सांग.’’ ते म्हणाले की जयललिता मला म्हणाल्या होत्या की लोकांना जो स्वीकारार्ह आहे अशा कोणा एकाची निवड करा.पनीरसेल्वम रात्री नऊ वाजता जयललितांच्या समाधीस्थळी पोहोचले.

पक्ष कार्यकर्ते किंवा सुरक्षा यंत्रणांना याचा थांगपत्ताही नव्हता. समाधीजवळ ते ४० मिनिटे ध्यानमुद्रेत होते. ९ वाजून ४० मिनिटांनी ध्यानमुद्रेतून बाहेर येऊन त्यांनी समाधीस्थळाला प्रदक्षिणा घातली आणि त्यानंतर ते पत्रकारांना सामोरे गेले. अद्रमुकसाठी मंगळवार हा प्रचंड राजकीय उलथापालथीचा दिवस ठरला. पन्नीरसेल्वम यांच्या बंडाच्या पवित्र्यापूर्वी पक्षाचे संस्थापक सदस्य पी. एच. पांडियन यांनी जयललितांचा मृत्यू आणि शशिकला यांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून बॉम्ब टाकला होता. त्यानंतर दुपारी जयललिता यांची भाची दीपा जयकुमार यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती.

तमिळनाडूतील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव हे चेन्नईला मंगळवारी किंवा बुधवारी रवाना होतील, असे राजभवनच्या सूत्रांनी सांगितले. राव यांच्याकडे तमिळनाडुच्या राज्यपालपदाचीही जबाबदारी आहे. अ. भा. राज्यपाल विद्यासागर राव सोमवारी रात्री दिल्लीहून चेन्नईला जाण्याऐवजी मुंबईला आल्यामुळे शशिकला यांचा ताबडतोब शपथविधी होईल ही शक्यताही विरळ झाली. बेहिशेबी मालमत्येच्या खटल्यात शशीकला यांच्याबाबतचा निवाडा लवकरच दिला जाईल, असे संकेत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिले होते.