अन्नविषबाधा प्रकरण; सहा जणांवर गुन्हा बचत गट अध्यक्ष दोषी: जेऊर येथील जीवनज्योती बचत गट गोत्यात
By admin | Updated: February 8, 2015 00:19 IST
अक्कलकोट :
अन्नविषबाधा प्रकरण; सहा जणांवर गुन्हा बचत गट अध्यक्ष दोषी: जेऊर येथील जीवनज्योती बचत गट गोत्यात
अक्कलकोट : शिळे पोहे खायला देऊन विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणार्या बचत गटाच्या अध्यक्षासह पोटठेकेदार, भोजन तयार करणार्या सहा जणांवर गुन्हा दाखल झाला असून, एकाला अटक झाली आहे. त्यांच्यावर मानवी जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. शिळे पोहे खायला दिल्याने अक्कलकोटच्या सामाजिक न्याय विभागाच्या नवबौद्ध शासकीय निवासी शाळेतील ५१ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. या प्रकरणी जेऊरच्या जीवनज्योती बचत गटाच्या अध्यक्षा व मुख्य ठेकेदार रूपा ईरण्णा कणमुसे, पोटठेकेदार सिद्धाराम जाधव (कोन्हळ्ळी), भोजन तयार करणारे रावसाहेब बलभीम सुरवसे, ज्योती सुरेश कल्याणशेी, शहनाज नुरोद्दीन शेख, शरीफ यासीन मकानदार (सर्व रा. अक्कलकोट) यांना जबाबदार धरून गुन्हा दाखल केला आहे. यातील रावसाहेब सुरवसे याला अटक झाली आहे. याबाबत अंगद चतुर्भुज मुकटे (रा. सात रस्ता, अक्कलकोट) यांनी फिर्याद दिली आहे. तपास सपोनि गणेशप्रसाद भरते करीत आहेत. इन्फो बॉक्स::::::::::अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत!सोलापूरचे अन्न व भेसळ अधिकारी बाळासाहेब शिंदे, सुरेश तोरसे यांनी अन्नाचे नमुने घेऊन पो. नि. चंद्रकांत मिरावडे यांच्या ताब्यात दिले आहेत. ते तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.