शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत बनवलेले जेवण निकृष्ट दर्जाचे, सीएजी रिपोर्टमधून उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 11:34 IST

भारतीय रेल्वे कॅटरिंग सर्व्हिसची सीएजीच्या रिपोर्टमुळे पोलखोल झाली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 21 - भारतीय रेल्वे कॅटरिंग सर्व्हिसची सीएजीच्या रिपोर्टमुळे पोलखोल झाली आहे. सीएजी ऑडिट रिपोर्ट आज संसदेत ठेवण्यात येणार आहे. रिपोर्टनुसार, रेल्वे स्टेशनांवर खाण्या-पिण्याचे जे पदार्थ बनवण्यात येतात, ते खाण्यायोग्य नाहीत. ट्रेन आणि स्टेशनांवर बनवण्यात येणारे खाद्यपदार्थ हे प्रदूषित असतात. पॅकबंद खाद्यपदार्थ आणि बाटलीबंद पाणी नियतकालीन वेळेनंतर विकण्यात येत असल्याचं धक्कादायक वास्तव रिपोर्टमधून समोर आलं आहे. तसेच अनधिकृत कंपन्यांच्या पाण्याच्या बोटलही विकल्या जात आहेत. रेल्वे परिसर आणि ट्रेनमध्ये अजिबात साफसफाई नसते. ट्रेनमध्ये विकण्यात येणा-या अन्न पदार्थांचं बिल दिलं जात नाही. अन्नपदार्थांच्या दर्जाबाबतही प्रवाशांच्या अनेक तक्रारी आहेत. सीएजी आणि रेल्वेच्या संयुक्त टीमनं 74 स्टेशन्स आणि 80 ट्रेनची पाहणी केली आहे. या पाहणीदरम्यान ट्रेन आणि स्टेशनांवर साफसफाईची बोंबाबोंब असल्याचं निदर्शनास आलं आहे.  रिपोर्टनुसार, पाण्याच्या बोटल सरळ सरळ नळातील अशुद्ध पाण्यानं भरण्यात येतात आणि त्यानंतर त्या पॅकिंग केल्या जातात. अनेक स्टेशनांवर कच-याच्या डब्यांवर झाकणंच नसून, त्यांची साफसफाई केली जात नसल्याचं समोर आलं आहे. खाद्यपदार्थांना माश्या, किडे आणि धुळीपासून वाचवण्यासाठी झाकून ठेवलं जात नाही. त्याप्रमाणेच ट्रेनमध्ये झुरळं आणि उंदीरही आढळले आहेत. ट्रेनमध्ये वेटर आणि कॅटरिंग मॅनेजरकडे विकण्यात येणा-या खाद्यपदार्थांचं कोणतंही मेनूकार्ड नसणे. खाण्याचे पदार्थ ठरलेल्या प्रमाणापेक्षा कमी देणे यांसारख्या गोष्टी रिपोर्टमधून समोर आल्या आहेत. ऑडिट रिपोर्टमधून रेल्वेच्या वारंवार बदलणा-या कॅटरिंग पॉलिसीवरही सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

मोदींच्या स्वच्छ भारत मिशनला रेल्वेनं हरताळ फासला आहे. भारतीय रेल्वे जगातील सर्वोत्तम रेल्वे बनविण्यासाठी भरघोस आर्थिक तरतुदीद्वारे पायाभूत सुविधा उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही रेल्वेमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. रेल्वे अर्थसंकल्प येत्या काही वर्षांत 2 लाख 75 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवून त्यानंतर रेल्वे क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक तरतूद 8 लाख 70 हजार कोटी रुपयांपर्यत वाढविण्यात येईल. या सर्वांमुळे येत्या पाच वर्षांत रेल्वेचा पूर्णपणे कायापालट झालेला दिसेल, असे सूतोवाच केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेच्या प्रवाशांनीही चांगली सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. सँडहर्स्ट रोड, भायखळा, चिंचपोकळी या स्थानकाची प्रवासी सुविधा समितीकडून पाहणी करण्यात आली. मध्य रेल्वेवरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत, रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी शौचालय, पंखे अशा अनेक सुविधा देण्याचे काम युद्धपातळीवर करा, असे निर्देश रेल्वे प्रशासनाला प्रवासी सुविधा समितीचे सदस्य नागेश नामजोशी आणि मोहम्मद इरफान अहमद यांनी दिले  होते. 

 
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाने दोन्ही स्थानकांमधील प्रवाशांना पुरविण्यात येत असलेल्या सुविधा तपासल्या. यात भायखळा रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील भागात वाहने उभी करण्यात आल्याचे निदर्शनास आले. या वेळी येथील येथे अनधिकृतरीत्या उभ्या करण्यात आलेल्या वाहनांवर, वाहतूक पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात आली. दरम्यान, रेल्वे स्थानकांबाहेरील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना समितीतर्फे देण्यात आल्या होत्या.