शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

भारतातून गेलेले विमान दुबईत उतरताना आदळले

By admin | Updated: August 4, 2016 04:03 IST

भारतातून थिरुवनंतपूरम येथून आलेले एमिरेटस एअरलाइन्सचे एक प्रवासी विमान बुधवारी दुपारी दुबई विमानतळावर उतरत असताना धावपट्टीवर जोरदार आदळले.

दुबई : भारतातून थिरुवनंतपूरम येथून आलेले एमिरेटस एअरलाइन्सचे एक प्रवासी विमान बुधवारी दुपारी दुबई विमानतळावर उतरत असताना धावपट्टीवर जोरदार आदळले. या अपघातानंतर विमानास आग लागली. त्यातून धुराचे प्रचंड लोट येऊ लागले. मात्र २२६ भारतीयांसह २८२ प्रवाशांना आणि १८ चालक कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्याने संभाव्य मोठी जीवितहानी टळली.या अपघाताने मुख्य धावपट्टी अडून राहिल्याने आणि मदत व बचाव कार्यासाठीही सभोवतालचा परिसर मोकळा करावा लागल्याने दुबई विमानतळावरून होणारी विमानांची सर्व उड्डाणे संध्याकाळपर्यंत स्थगित ठेवण्यात आली. दुबई हा आखतातील सर्वात गर्दीचा विमानतळ असून एमिरेट्स ही तेथे मुख्यालय असलेली सर्वात मोठी विमान कंपनी आहे.एमिरेट््स एअरलाइन्सने त्यांच्या वेबसाइटवर ही माहिती देताना सांगितले की, बोर्इंग ७७७ जातीच्या या विमानाने (फ्लाईट इके५२१) बुधवारी सकाळी १०.१९ वाजता थिरुवनंतपूरम येथून उड्डाण केले व दुपारी १२.५० वाजता ते दुबई विमानतळावर उतरणे अपेक्षित होते.विमान सुखरूपपणे न उतरता ते धावपट्टीवर जोरात का व कसे आदळले, याचा कोणताही खुलासा विमान कंपनीने केला नाही. मात्र काही तासांच्या प्रयत्नांनंतर विमानातून सर्व प्रवाशांना व कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. केरळमधील हजारो लोक आखातात नोकऱ्या करतात व त्यांच्या सोईसाठी अनेक विमान कंपन्यांनी थिरुवनंतपूरहून दुबई व आखातातील अन्य ठिकाणी थेट सेवा सुरु केलेल्या आहेत. ही विमाने जाताना व येताना नेहमीच पूर्ण भरलेली असतात. (वृत्तसंस्था)>अपघात का झाला ? : सविस्तर चौकशी होईपर्यंत या अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार नसले तरी हे विमान जमिनीवर आदळले तेव्हा स्फोट झाल्याचे काहींनी सांगितले. या आदळलेल्या विमानाची म्हणून जी छायाचित्रे व ते आदळत असतानाचा जो व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्यात आला, त्यात कलंडलेल्या विमानातून काळ््या धुराचे लोट आकाशात झेपावत असताना दिस होते.>गुवाहाटी विमानतळावर विमानांची टक्कर टळलीइंडिगो कंपनीच्या दोन विमानांची मंगळवारी संध्याकाळी गुवाहाटी विमानतळावर होऊ शकणारी टक्कर सुदैवाने थोडक्यात टळली. मात्र या घटनेमुळे चार प्रवाशांना भोवळ आली तर दोन विमान कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली.इंडिगो कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, मुंबईहून आलेले विमान गुवाहाटीच्या लोकप्रिय गोपीनाथ बारदोलाई विमानतळावर उतरण्याच्या तारीत असताना पावसाळी हवामानामुळे त्याला हादरे बसू लागले. परिणामी हे विमान ठरलेल्या उंचीपेक्षा अचानक २५० ते ३०० फूट खाली आणावे लागले. नेमके त्याच वेळी चेन्नईला निघालेल्या विमानाने उड्डाण केलेले होते. मुंबईहून आलेले विमान लगेचच झटकन अधिक उंचीवर नेले गेले अन्यथा त्याच मार्गातून उड्डाण करणाऱ्या दुसऱ्या विमानाशी त्याची टक्कर होऊ सकली असती. सुदैवाने कोणतीही दुर्घटना न होता मुंबईहून आलेले विमान सुखरूपपणे उतरले व चेन्नईला निघालेले विमान विनाविघ्न रवाना झाले, असेही प्रवक्त्याने सांगितले.