शहरं
Join us  
Trending Stories
1
'तिला न्याय देण्याऐवजी भाजपच्या व्यवस्थेने आरोपींना वाचवले'; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
2
दोन महिलांपुढे पायलटनेही हात टेकले; विमानात जोरजोरात भांडत बसल्या अन् पुढे असे घडले...
3
टेस्लाची पहिली कार मॉडल Y लाँच, किंमत २३ लाख नाही, तुमचा आमचा श्वास रोखणारी... EMI किती?
4
'श्रीमंत' बनेल तुमचं मूल, या ६ मार्गांनी 'सुरक्षा कवच' तयार करा; महागाई देखील मार्ग अडवू शकणार नाही
5
सोने सांभाळण्याची भीती वाटते? ऑनलाईन पर्यायातून मिळेल जास्त नफा, कशी करायची गुंतवणूक?
6
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
7
वाहन उद्योग क्षेत्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा; एकाचवेळी दोन दिग्गज कंपन्या भारतात एन्ट्री करणार
8
निमिषा प्रियाचा जीव वाचवण्यासाठी आणखी एक आशेचा किरण! येमेनच्या बंद खोलीत चर्चा सुरू
9
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
10
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
11
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
12
Stock Market Today: २० अंकांनी घसरुन उघडला सेन्सेक्स; फार्मा आणि मेटल क्षेत्रात खरेदी, थोड्याच वेळात का आली तेजी?
13
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
14
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
15
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
16
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
17
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
18
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
19
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
20
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद

नेरळमधील पाच दुकानांना आग

By admin | Updated: January 18, 2015 23:03 IST

नेरळ येथील बाजारपेठेत शनिवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत पाच दुकाने जळून खाक झाली असून लाखो रु पयांचे नुकसान झाले आहे.

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महागाई कमी करण्याचे आश्वासन दिल्यामुळे सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारने प्रत्यक्षात गोरगरिबांना आणखीनच महागाईच्या खाईत लोटले असून, अन्न सुरक्षा कायद्या बाहेर राहिलेल्या शहरी भागातील मध्यमवर्गीयांसाठी गेल्या पाच महिन्यात रेशनवर स्वस्त दरातील धान्यच उपलब्ध न करून दिल्याने, परिणामी केशरी शिधापत्रिकाधारकांना खुल्या बाजारातून चढ्या भावाने धान्य खरेदी करून गुजराण करावी लागत आहे. केंद्रात सत्तेवर असलेल्या तत्कालीन संपुआ सरकारने देशभरात अन्नसुरक्षा कायदा लागू करून त्याची काही राज्यांमध्ये टप्पाटप्प्याने अंमलबजावणी सुरू केली. शहरी भागात ४९ टक्के, तर ग्रामीण भागातील ७३ टक्क जनतेला दोन रुपये किलो दराने गहू व तीन रुपये दराने तांदूळ देणाऱ्या या योजनेत नागरिकांच्या वार्षिक उत्पन्नाचीही अट टाकण्यात आली होती. महाराष्ट्रात ही योजना गेल्या वर्षी एप्रिल महिन्यापासून सुरू करण्यात आली, त्याच बरोबर या कायद्यात न बसणाऱ्या परंतु वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत असलेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना (एपीएल) साडेसात रुपये किलोने गहू व साडेनऊ रुपये किलो दराने तांदूळ देण्याची योजना सुरू ठेवली होती. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आटोपल्यानंतर तोंडावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत नाराजीचा फटका नको म्हणून केंद्रातील मोदी सरकारने केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी एपीएलचे धान्य उपलब्ध करून दिले, तर राज्यात सत्तेवर असलेल्या कॉँग्रेस सरकारनेही सार्वजनिक वितरण व्यवस्था विस्कळीत न होऊ देण्याची काळजी घेत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी धान्याची उचल करून सप्टेंबरमध्येच ते रेशनपर्यंत पोहोचविले. मात्र आॅक्टोंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका आटोपल्या व भाजपा सत्तेवर येण्याची चिन्हे दिसू लागताच, केंद्र सरकारने महाराष्ट्राला देण्यात येणारे एपीएल धान्य देणे बंद केले.अगोदरच महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना गेल्या पाच महिन्यांपासून रेशन दुकानांमधून स्वस्त दरात धान्य देणे बंद करण्यात आल्याने त्याच्या ‘बुरे दिन’ला सुरुवात झाली आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना खुल्या बाजारातून वीस ते पंचवीस रुपये दराने गहू व तीस ते पस्तीस रुपये दराने तांदूळ खरेदी करावे लागत असून, हे कमी की काय, सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत देण्यात येणाऱ्या घासलेटच्या कोट्यातही केंद्र सरकारने अलीकडेच कपात करून अन्न शिजविण्यावरही एकप्रकारे निर्बंध लादले आहेत. रेशन दुकानांमधून काहीच मिळत नसल्याने ते ओस पडू लागले आहेत. (प्रतिनिधी)