शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
3
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
4
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
5
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
6
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
7
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
8
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
9
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
10
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
11
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
12
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
13
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
14
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
15
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
16
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
17
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
18
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
19
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
20
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला

अर्थमंत्रालयाच्या पाच कर्मचाऱ्यांना कारावास

By admin | Updated: June 23, 2014 04:49 IST

सुमारे ४़२० लाख रुपयांच्या रजा व प्रवास सवलत (एलटीसी) घोटाळ्याप्रकरणी येथील स्थानिक न्यायालयाने रविवारी अर्थ मंत्रालयाच्या पाच कर्मचाऱ्यांसह सहा जणांना प्रत्येकी चार वर्षे कारावासाची शिक्षा

नवी दिल्ली : सुमारे ४़२० लाख रुपयांच्या रजा व प्रवास सवलत (एलटीसी) घोटाळ्याप्रकरणी येथील स्थानिक न्यायालयाने रविवारी अर्थ मंत्रालयाच्या पाच कर्मचाऱ्यांसह सहा जणांना प्रत्येकी चार वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली़ फसवणूक करून एलटीसीची अग्रिम रक्कम काढणे आणि ती वितरित करण्याचा आरोप त्यांच्यावर होता़सीबीआयचे विशेष न्यायाधीश संजीव जैन यांनी तीन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसह सहा व्यक्तींना भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंडसंहितेच्या विविध कलमाअंतर्गत फौजदारी कट, फसवणूक आणि कटकारस्थानात दोषी ठरविले आहे़ न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यांमध्ये अर्थमंत्रालयाचे लक्ष्मीचंद (६७), बालेसिंह कसाना (५५), भगवानसिंह (५५) तसेच रघुवेंद्र कुमार (६३) आणि जे एल चोपडा (७०) यांचा समावेश आहे़ यापैकी चंद, कुमार आणि चोपडा निवृत्त झाले आहेत़ न्यायालयाने अर्थ मंत्रालयातील तत्कालीन कर्मचारी एसक़े़डी़ दास नायक यांनाही शिक्षा सुनावली़ ते तूर्तास कृषी भवनस्थित ग्रामविकास मंत्रालयात कार्यरत आहेत़ न्यायालयाने चंद, कसाना, सिंह, कुमार व नायक यांना प्रत्येकी एक लाख तर चोपडांना ५० हजार रुपये दंडही ठोठावला़ अर्थमंत्रालयात शिपाई असलेल्या पुरुषोत्तम लाल याची न्यायालयाने निर्दोष सुटका केली, तर अन्य दोन आरोपी रमेशचंद शुक्ला आणि दिवाकर दीक्षित यांचा खटला सुरू असताना मृत्यू झाला़ कुणीही भ्रष्टाचार दडवू शकत नाही आणि भ्रष्ट व्यक्ती कायद्यापासून वाचू शकत नाही, असा कठोर संदेश समाजात जावा. असे शिक्षा ठोठावताना न्यायालयाने म्हटले़ (लोकमत न्यूज नेटवर्क)