शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

‘फिटनेस’ची नुसती फॅशन नको नियमित व्यायाम करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 06:28 IST

मोदींच्या हस्ते ‘फिट इंडिया’ चळवळीचा शुभारंभ

नवी दिल्ली : ‘फिटनेस’बद्दल गप्पा मारणे ही हल्ली फॅशन झाली आहे. पण त्याने काहीही लाभ होणार नाही. तंत्रज्ञानाने बदलत असलेल्या जीवनशैलीमुळे नानाविध दुर्धर व्याधी अकाली जडू लागल्या आहेत. त्यावर मात करण्यासाठी शरीराला रोज नियमित व्यायाम देऊन तंदुरुस्त राहणे हाच रामबाण उपाय असल्याने प्रत्येक नागरिकाने शारीरिक तंदुरुस्ती हा आपल्या जीवनशैलीचा भाग बनवावा, असे आवाहन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ‘फिट इंडिया’ चळवळीचा शुभारंभ केला.

मोदी यांनी गेल्या आठवड्यातील ‘मन की बात’मध्ये याचे सूतोवाच केलेच होते. राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून येथील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधनांनी ‘तंदुरुस्त भारता’चा संकल्प सोडला आणि ही चळवळ लोकचळवळ म्हणून यशस्वी होऊन नागरिक स्वत:सोबतच देशाचेही आरोग्यसंपन्न भवितव्य घडवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.केंद्रीय क्रीडा व युवक कल्याणमंत्री किरण रिजिजू यांच्यासोबतच यंदाच्या विविध क्रीडा पुरस्काराने सन्मानित खेळाडूही या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी औपचारिक भाषणंखेरीज भारताच्या पारंपरिक व्यायाम प्रकारांची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली. गेल्याच आठवड्यात बॅडमिंटनची जगज्जेती ठरलेल्या पी.व्ही. सिधूने यावेळी देशवासियांना ‘तंदुरुस्त भारता’ची शपथ घेण्याचे आवाहन केले.‘फिटनेस’साठी काहीही गुंतवणूक करावी लागत नाही, पण त्याने लाभ मात्र अगणित मिळतात, हे सूत्र अधोरेखित करून मोदी यांनी याकडे लक्ष वेधले की, कोणत्याही क्षेत्रातील यशाचे शारीरिक तंदुरुस्तीशी अतूट नाते असते. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या यशात तंदुरुस्तीचा मोठा भाग असतो. ‘बॉडी फिट है तो, मार्इंड फिट है’ हे त्याचे कारण आहे, असे ते म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, पूर्वीच्या काळी शारीरिक तंदुरुस्तीसाठी वेगळा व्यायाम करावा लागत नसे. तंदुरुस्ती हा आपल्या संस्कृतीचा व जीवनशैलीचा अविभाज्य भाग होता. दैनंदिन व्यवहारांतही थकून जाण्याएवढा व्यायाम होत असे. पण तंत्रज्ञानाने जीवनशैली पार बदलून गेली आहे. लोक व्यायानसाठी जॉगिंक करतात किंवा चालतात. पण किती पावले चाललो हे पाहण्यासाठी मोबाईल अ‍ॅपचा उपयोग करतात! एवढे तंत्रज्ञान आपल्या अंगवळणी पडले आहे. दिनचर्येत शरिराला कष्ट कमी व बसेपणा जास्त असे दैनंदिन आयुष्य होत चालले आहे. यामुळे शरीर व मन निरामय व सुदृढ ठेवण्यासाठी रोजच्या व्यवहारांखेरीज वेगळा व्यायाम करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. ठराविक व्यायामाखेरीज दमछाक करणारे खेळ खेळूनही तंदुर्स्त राहता येऊ शकेल.आजारांनी ग्रासलेली तरुण पिढी हा मोठा चिंतेचा विषय आहे, असे सांगून मोदी म्हणाले की, उच्च रक्तदाब व मधूमेहाचे प्रमाण वाढत चालले आहे. १२ किंवा १५ वर्षाचे मूल मधुमेही असल्याचे किंवा ३० व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आल्याचेही हल्ली ऐकू येते. हे नक्कीच चिंताजनक आहे. पण मी दुर्दम्य आशावादी असल्याने मला यातूनही बाहेर पडता येईल, असा आशेचा किरण दिसतो.

पंतप्रधानांच्या हस्ते सुरु झालेली ही चळवळ पुढे नेण्यासाठी क्रीडामंत्री रिजिजू यांच्या अध्यक्षतेखाली एक २८ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. यात संबंधित सरकारी खात्यांच्या अधिकाऱ्यांसह विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधीही असतील. देशवासियांच्या सक्रिय सहकार्याने ही चळवळ नवी उंची गाठेल, असा विश्वास रिजिजू यांनी व्यक्त केला. 

बॅडमिंटन, टेनिस अथवा अथवा अन्य कोणताही खेळ असो आपल्या खेळाडूंच्या कामगिरीने देशाच्या आकांक्षांना नवी भरारी मिळत आहे. त्यांनी मिळविलेली पदके हे केवळ त्यांच्या अपार कष्टाचे फलित नाही तर, ते नवभारताच्या निर्धाराचे ते प्रतिबिंब आहे.-नरेंद्र मोदी, पंतप्रधान

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी