शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर पाटील कोण, १०० कोटी कुठून आले?;  चंद्रकांत पाटलांवर शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप
2
“छगन भुजबळ मराठ्यांना शत्रू मानतो, म्हातारा बावचळलाय”; मनोज जरांगे पाटलांची बोचरी टीका
3
अरे हा माणूस आहे का 'क्रेडिट कार्ड'? तब्बल १६३८ कार्ड वापरुन कमावतो पैसे; एक रुपयाही कर्ज नाही
4
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
5
देश सोडा अन् IPL खेळा! पॅट कमिन्स-ट्रॅविस हेडला प्रत्येकी ५८-५८ कोटींची ऑफर; ही काय आहे भानगड?
6
Nashik Crime: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव
7
कंपनीला एक चूक महागात पडली; सॅलरीपेक्षा ३०० पट रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यावर पाठवली, मग जे घडलं...
8
Rajvir Jawanda: लोकप्रिय गायक राजवीर जवंदा यांच्या मृत्युमागचं कारण आलं समोर!
9
पतीवर उकळतं तेल फेकलं; तडफडताना पाहून मिरची पावडर जखमांवर ओतली! पत्नी इतकी क्रूर का झाली?
10
“धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या, अन्यथा गोठवा”; ठाकरे गटाच्या नेत्याची सुप्रीम कोर्टाला विनंती
11
मराठी अभिनेत्री २५ वर्षांनंतर मूळ गावी रमली, कुटुंबासोबतचे व्हिडिओ पोस्ट करत म्हणाली...
12
प्रचंड मानसिक त्रास; पूरन कुमार यांचा सुसाइड नोटमधून 8 IPS आणि 2 IAS अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
13
लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज...
14
बंपर लिस्टिंग...! या शेअरनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी केली; दुप्पट केला पैसा, दिला छप्परफाड परतावा
15
Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा 'या' ५ वस्तू, कुबेर महाराज म्हणतील तथास्तु!
16
टेस्लाचा मोठा निर्णय! भारतात 'स्वस्त' इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी; २ नवीन मॉडेल लाँच, काय आहे किंमत?
17
झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणी त्यांच्याच चुलत भावाला अटक; सिंगापूर यॉट पार्टीशी काय संबंध?
18
सांगली ते दुबई व्हाया सुरत; मुंबईच्या सलीम डोलाचं ड्रग्ज साम्राज्य, महाराष्ट्र पोलिसांनी केला होता पर्दाफाश
19
TATA च्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार उसळी; सोन्यातील तेजीदरम्यानही ब्रोकरेजचा विश्वास कायम, तुमच्याकडे आहे का?
20
सोनम वांगचूक यांना भेटायला तुरुंगात पोहोचल्या पत्नी गीतांजली! पुढे काय करणार? सांगितला प्लॅन

आधी घरचं सांभाळा मग काश्मिर मागा, नरेंद्र मोदींचे पाकिस्तानला खडे बोल

By admin | Updated: September 24, 2016 19:43 IST

उरी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला खडे बोल सुनावत कडाडून टीका केली

ऑनलाइन लोकमत
कोळीकोड, दि. 24 - आशियातील सर्व देश २१ वे शतक आशियाचं व्हावं यासाठी प्रयत्न करत असताना एक देश मात्र २१ वे शतक आशियाचं होऊ नये, संपुर्ण आशियात रक्तपात व्हावा, दहशतवादाचं सावट राहावं, निर्दोष लोकांना मारलं जावं यासाठी षडयंत्र रचण्यात व्यस्त आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोझीकोडे येथील जाहीर सभेत पाकिस्तावर प्रहार केला. उरी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला खडे बोल सुनावत कडाडून टीका केली. केरळमध्ये ही सभा पार पडली.
 
उरी हल्ला विसरणार नाही -
उरी दहशतवादी हल्ल्यात जे १८ जवान शहीद झाले, त्यांच बलिदान भारत विसरणार नाही असं सांगत मोदींनी पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशाराच देऊन टाकला. दहशतवाद माणुसकीचा शत्रू आहे. सर्वांनी एकत्र येऊन दहशतवादाचा पराभव करणं गरजेचं आहे. भारत दहशतवादासमोर कधीच झुकला नाही आणि झुकणारही नाही. उरी हल्ल्यानंतर देशभरात आक्रोश आहे. हा देश उरी हल्ल्याला कधीच विसरणार नाही ही गोष्ट दहशतवाद्यांनी लक्षात ठेवावी असं सागंत नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं.
 
जवानांचा अभिमान - 
गेल्या काही महिन्यात 17 वेळा शेजारी देशाने आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र शूर जवानांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत त्यांचा खात्मा केला. 110 हून अधिक दहशतवाद्यांना जवानांनी ठार केलं आहे. जवानांनी देशाला वाचवण्याचं काम केलं असून आम्हाला आमच्या जवानांचा गर्व आहे.  पण एकदाच शेजारी देश घुसखोरीत यशस्वी झाले आणि 18 जवान शहीद झाले, जर 17 वेळा ते यशस्वी झाले असते तर काय झालं असतं याची कल्पना आपण करु शकत नाही असं बोलताना नरेंद्र मोदींनी जवानांचं कौतुक केलं.
 
जवानांनी फक्त शस्त्र नव्हे तर नैतिक पाठिंब्याचीही गरज असते. देशभरातून त्यांना पाठिंबा मिळत असल्याने त्यांचा विजय होत आहे.  शेजारच्या देशातील नेते एक हजार वर्ष लढण्याची भाषा करायचे पण काळानुसार कुठे गायब झाले कळतच नाही. पाकिस्तानमधील नेते दहशतवाद्यांनी लिहून दिलेलं भाषण वाचून काश्मीरचे गुणगान गात आहेत अशी टीका मोदींनी केली. 
आधी घरचं सांभाळा - 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी बोलताना पाकिस्तानच्या जनतेशी संवाद साधत '1947 च्या आधी तुमचे पुर्वज याच धर्तीच्या पाया पडत होते. पाकिस्तानव्याप्त काश्मीर तुमच्याकडे असूनदेखील तुमचे राज्यकर्ते सांभाळू शकत नाहीत. बलुचिस्तान, पख्तूनीदेखील सांभाळणं जमलं नसताना काश्मीरबद्दल बोलून तुम्हाला भरकटवत आहेत. जे घरात आहे ते तरी आधी सांभाळून दाखवा म्हणावं,' असं बोलले आहेत.  
 
दोन्ही देश एकत्र स्वतंत्र झाले, पण भारत सॉफ्टवेअर आणि पाकिस्तान दहशतवाद्यांना निर्यात करतो असं का ? हे जनतेने विचारावं असं आवाहन नरेंद्र मोदींनी पाकिस्तानी जनतेला केलं. 
 
भारत युद्धासाठी तयार -
आमच्याशी लढण्याची भाषा करत असाल तर आम्ही आव्हान स्विकारायला तयार आहोत. भारत पाकिस्तानसोबत युद्धासाठी तयार आहे. दोन्ही देशांनी गरिबी, शिक्षण, बेरोजगारी यासाठी लढाई सुरु करुया मग पाहू कोणाचा विजय होतो असं मोदी बोलले आहेत. 
 
पाकिस्तानला एकटं पाडणार -
आमच्या 18 जवानांचं बलिदान वाया जाणार नाही. जगात तुम्हाला एकटं पाडण्यासाठी भारत सर्व प्रयत्न करणार असल्याचं मोदींनी सांगितलं आहे. सोबतच  तो दिवस लांब नाही जेव्हा पाकिस्तानमधील जनता दहशतावद आणि हुकूमशहांविरोधात उभे राहिल असंही बोलले आहेत.