शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

देशात प्रथमच सरकारी वकिलाला पद्म पुरस्कार उज्ज्वल निकम यांच्या रुपाने बहुमान : २८ वर्षांत एकाही आरोपीचे वकीलपत्र घेतले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2016 22:19 IST

जळगाव : यंदाच्या पद्म पुरस्कारची घोषणा झाली आणि एक वेगळी नोंद या वेळी झाली, ती म्हणजे सरकारी वकिलाला पद्म पुरस्कार मिळाला. केवळ राज्यातच नव्हे तर देशात प्रथमच डॉ. ॲड. उज्ज्वल निकम यांच्या रुपाने वकिलाला पद्म पुरस्कार मिळाला. त्यात महाराष्ट्रातील वकिलाला हा बहुमान मिळाल्याने महाराष्ट्रासह संपूर्ण खान्देशवासीयांना त्याचा अभिमान वाटत आहे.

जळगाव : यंदाच्या पद्म पुरस्कारची घोषणा झाली आणि एक वेगळी नोंद या वेळी झाली, ती म्हणजे सरकारी वकिलाला पद्म पुरस्कार मिळाला. केवळ राज्यातच नव्हे तर देशात प्रथमच डॉ. ॲड. उज्ज्वल निकम यांच्या रुपाने वकिलाला पद्म पुरस्कार मिळाला. त्यात महाराष्ट्रातील वकिलाला हा बहुमान मिळाल्याने महाराष्ट्रासह संपूर्ण खान्देशवासीयांना त्याचा अभिमान वाटत आहे.
जळगावच्या केळीने देशभरात येथील ओळख तर निर्माण केलीच, त्यानंतर कायद्यावर श्रद्धा ठेऊन दहशतवादी, गुन्हेगार यांना त्यांची जागा दाखवून अल्पावधीत या क्षेत्रात आपली वेगळी छाप पाडणार्‍या डॉ. ॲड. उज्ज्वल देवराम निकम यांनी जळगावला एका उंचीवर नेऊन ठेवले. अशा व्यक्तीला पद्म पुरस्कार मिळाल्याने जळगावकरांचा उर प्रथम भरुन आला. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यापासून ते अगदी आताच्या अमरावती येथील दीपाली कुलकर्णी खून खटल्या सारखे संवेदनशील खटले हाताळून त्यांनी देशात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशा या व्यक्तीमत्वाचा हा अल्प परिचय....

जळगाव शहरातील रामदास कॉलनी भागात राहणारे ॲड. उज्ज्वल निकम हे १९८७ पासून सरकारी वकील म्हणून कार्यरत असून महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा सरकारी वकील होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. गेल्या २८ वर्षांपासून ते सरकरी वकील म्हणून काम पाहत आहे. ॲड. निकम यांनी सरकारतर्फे चालविलेल्या विविध खटल्यांमध्ये एकूण ६३० आरोपींना जन्मठेपेची तर ३८ आरोपींना फाशीची शिक्षा झालेली आहे. १९९५ ते २००० या कालावधीत ते जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये कायदा शाखेचे अधिष्ठाता (डीन) राहिलेले असून याच विद्यापीठात पाच वर्षे सिनेटर (सर्वोच्च नियामक मंडळ), २००१ ते २००४ दरम्यान ते युनियन बँक ऑफ इंडियाचे संचालक राहिले. २००१ ते २००३ दरम्यान आयुर्विमा महामंडळाच्या ॲडव्हायझरी बोर्डचे सदस्य होते.

१६ वर्षे तुरुंगात...
ॲड. उज्ज्वल निकम यांनी आपल्या आयुष्यातील १६ वर्षे तुरुंगात काढली आहे, असे म्हटले तर सर्वांना धक्का बसेल. मात्र हे खरे आहे. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यासाठी ते १४ वर्षे तर मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यातील पाक अतिरेकी अजमल कसाब याच्या खटल्यामध्ये ते दोन वर्षे तुरुंगात होते. कारण हे दोनही खटले तुरुंगात चालले, त्यामुळे त्यांची १६ वर्षे तुरुंगात गेली.