शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
3
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
4
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
5
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
6
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
7
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
8
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
10
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
11
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
12
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
13
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
14
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
15
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
16
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
17
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
18
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
19
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
20
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम

देशात प्रथमच सरकारी वकिलाला पद्म पुरस्कार उज्ज्वल निकम यांच्या रुपाने बहुमान : २८ वर्षांत एकाही आरोपीचे वकीलपत्र घेतले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2016 22:19 IST

जळगाव : यंदाच्या पद्म पुरस्कारची घोषणा झाली आणि एक वेगळी नोंद या वेळी झाली, ती म्हणजे सरकारी वकिलाला पद्म पुरस्कार मिळाला. केवळ राज्यातच नव्हे तर देशात प्रथमच डॉ. ॲड. उज्ज्वल निकम यांच्या रुपाने वकिलाला पद्म पुरस्कार मिळाला. त्यात महाराष्ट्रातील वकिलाला हा बहुमान मिळाल्याने महाराष्ट्रासह संपूर्ण खान्देशवासीयांना त्याचा अभिमान वाटत आहे.

जळगाव : यंदाच्या पद्म पुरस्कारची घोषणा झाली आणि एक वेगळी नोंद या वेळी झाली, ती म्हणजे सरकारी वकिलाला पद्म पुरस्कार मिळाला. केवळ राज्यातच नव्हे तर देशात प्रथमच डॉ. ॲड. उज्ज्वल निकम यांच्या रुपाने वकिलाला पद्म पुरस्कार मिळाला. त्यात महाराष्ट्रातील वकिलाला हा बहुमान मिळाल्याने महाराष्ट्रासह संपूर्ण खान्देशवासीयांना त्याचा अभिमान वाटत आहे.
जळगावच्या केळीने देशभरात येथील ओळख तर निर्माण केलीच, त्यानंतर कायद्यावर श्रद्धा ठेऊन दहशतवादी, गुन्हेगार यांना त्यांची जागा दाखवून अल्पावधीत या क्षेत्रात आपली वेगळी छाप पाडणार्‍या डॉ. ॲड. उज्ज्वल देवराम निकम यांनी जळगावला एका उंचीवर नेऊन ठेवले. अशा व्यक्तीला पद्म पुरस्कार मिळाल्याने जळगावकरांचा उर प्रथम भरुन आला. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यापासून ते अगदी आताच्या अमरावती येथील दीपाली कुलकर्णी खून खटल्या सारखे संवेदनशील खटले हाताळून त्यांनी देशात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशा या व्यक्तीमत्वाचा हा अल्प परिचय....

जळगाव शहरातील रामदास कॉलनी भागात राहणारे ॲड. उज्ज्वल निकम हे १९८७ पासून सरकारी वकील म्हणून कार्यरत असून महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा सरकारी वकील होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. गेल्या २८ वर्षांपासून ते सरकरी वकील म्हणून काम पाहत आहे. ॲड. निकम यांनी सरकारतर्फे चालविलेल्या विविध खटल्यांमध्ये एकूण ६३० आरोपींना जन्मठेपेची तर ३८ आरोपींना फाशीची शिक्षा झालेली आहे. १९९५ ते २००० या कालावधीत ते जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये कायदा शाखेचे अधिष्ठाता (डीन) राहिलेले असून याच विद्यापीठात पाच वर्षे सिनेटर (सर्वोच्च नियामक मंडळ), २००१ ते २००४ दरम्यान ते युनियन बँक ऑफ इंडियाचे संचालक राहिले. २००१ ते २००३ दरम्यान आयुर्विमा महामंडळाच्या ॲडव्हायझरी बोर्डचे सदस्य होते.

१६ वर्षे तुरुंगात...
ॲड. उज्ज्वल निकम यांनी आपल्या आयुष्यातील १६ वर्षे तुरुंगात काढली आहे, असे म्हटले तर सर्वांना धक्का बसेल. मात्र हे खरे आहे. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यासाठी ते १४ वर्षे तर मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यातील पाक अतिरेकी अजमल कसाब याच्या खटल्यामध्ये ते दोन वर्षे तुरुंगात होते. कारण हे दोनही खटले तुरुंगात चालले, त्यामुळे त्यांची १६ वर्षे तुरुंगात गेली.