शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

देशात प्रथमच सरकारी वकिलाला पद्म पुरस्कार उज्ज्वल निकम यांच्या रुपाने बहुमान : २८ वर्षांत एकाही आरोपीचे वकीलपत्र घेतले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2016 22:19 IST

जळगाव : यंदाच्या पद्म पुरस्कारची घोषणा झाली आणि एक वेगळी नोंद या वेळी झाली, ती म्हणजे सरकारी वकिलाला पद्म पुरस्कार मिळाला. केवळ राज्यातच नव्हे तर देशात प्रथमच डॉ. ॲड. उज्ज्वल निकम यांच्या रुपाने वकिलाला पद्म पुरस्कार मिळाला. त्यात महाराष्ट्रातील वकिलाला हा बहुमान मिळाल्याने महाराष्ट्रासह संपूर्ण खान्देशवासीयांना त्याचा अभिमान वाटत आहे.

जळगाव : यंदाच्या पद्म पुरस्कारची घोषणा झाली आणि एक वेगळी नोंद या वेळी झाली, ती म्हणजे सरकारी वकिलाला पद्म पुरस्कार मिळाला. केवळ राज्यातच नव्हे तर देशात प्रथमच डॉ. ॲड. उज्ज्वल निकम यांच्या रुपाने वकिलाला पद्म पुरस्कार मिळाला. त्यात महाराष्ट्रातील वकिलाला हा बहुमान मिळाल्याने महाराष्ट्रासह संपूर्ण खान्देशवासीयांना त्याचा अभिमान वाटत आहे.
जळगावच्या केळीने देशभरात येथील ओळख तर निर्माण केलीच, त्यानंतर कायद्यावर श्रद्धा ठेऊन दहशतवादी, गुन्हेगार यांना त्यांची जागा दाखवून अल्पावधीत या क्षेत्रात आपली वेगळी छाप पाडणार्‍या डॉ. ॲड. उज्ज्वल देवराम निकम यांनी जळगावला एका उंचीवर नेऊन ठेवले. अशा व्यक्तीला पद्म पुरस्कार मिळाल्याने जळगावकरांचा उर प्रथम भरुन आला. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यापासून ते अगदी आताच्या अमरावती येथील दीपाली कुलकर्णी खून खटल्या सारखे संवेदनशील खटले हाताळून त्यांनी देशात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशा या व्यक्तीमत्वाचा हा अल्प परिचय....

जळगाव शहरातील रामदास कॉलनी भागात राहणारे ॲड. उज्ज्वल निकम हे १९८७ पासून सरकारी वकील म्हणून कार्यरत असून महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा सरकारी वकील होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. गेल्या २८ वर्षांपासून ते सरकरी वकील म्हणून काम पाहत आहे. ॲड. निकम यांनी सरकारतर्फे चालविलेल्या विविध खटल्यांमध्ये एकूण ६३० आरोपींना जन्मठेपेची तर ३८ आरोपींना फाशीची शिक्षा झालेली आहे. १९९५ ते २००० या कालावधीत ते जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये कायदा शाखेचे अधिष्ठाता (डीन) राहिलेले असून याच विद्यापीठात पाच वर्षे सिनेटर (सर्वोच्च नियामक मंडळ), २००१ ते २००४ दरम्यान ते युनियन बँक ऑफ इंडियाचे संचालक राहिले. २००१ ते २००३ दरम्यान आयुर्विमा महामंडळाच्या ॲडव्हायझरी बोर्डचे सदस्य होते.

१६ वर्षे तुरुंगात...
ॲड. उज्ज्वल निकम यांनी आपल्या आयुष्यातील १६ वर्षे तुरुंगात काढली आहे, असे म्हटले तर सर्वांना धक्का बसेल. मात्र हे खरे आहे. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यासाठी ते १४ वर्षे तर मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यातील पाक अतिरेकी अजमल कसाब याच्या खटल्यामध्ये ते दोन वर्षे तुरुंगात होते. कारण हे दोनही खटले तुरुंगात चालले, त्यामुळे त्यांची १६ वर्षे तुरुंगात गेली.