शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ करणार स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा मतदान

By admin | Updated: May 4, 2016 02:03 IST

१९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कूचबिहार जिल्ह्यातील ५१ वस्त्यांत (परदेशी मुलखाने वेढलेला प्रदेश) राहणारे ९ हजारांहून अधिक लोक पाच मे रोजी पहिल्यांदा

कूचबिहार (पश्चिम बंगाल) : १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कूचबिहार जिल्ह्यातील ५१ वस्त्यांत (परदेशी मुलखाने वेढलेला प्रदेश) राहणारे ९ हजारांहून अधिक लोक पाच मे रोजी पहिल्यांदा मतदान करणार आहेत. प्रदीर्घ काळानंतर मतदानाचा अधिकार मिळाल्याने या मतदारांत अमाप उत्साह आहे. गेल्या वर्षी बांगलादेशासोबत वस्त्यांची देवाणघेवाण झाल्यानंतर या लोकांच्या वस्त्यांना औपचारिकरीत्या भारतीय क्षेत्र घोषित करण्यात आले. तोपर्यंत या लोकांना मतदानासह नागरिकत्वाचे कोणतेही अधिकार नव्हते. या वस्त्यांतील १५ हजार लोकांना भारताचे नागरिकत्व मिळाले असून यातील ९,७७६ लोक पात्र मतदार असून ते पहिल्यांदा मतदान करणार आहेत. नोकऱ्यांत आरक्षण आणि जमीन कराराची त्वरित अंमलबजावणी ही या मतदारांसमोरील दोन प्रमुख आव्हाने आहेत. या वस्त्यातील लोकांना सरकारी नोकऱ्यांत १० टक्के आरक्षण हवे आहे. याशिवाय वस्त्यांतील सर्व विकासकामे तेथील रहिवाशांच्या भागीदारीतून केली जावीत, अशी त्यांची इच्छा आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)बांगलादेश व भारताने एक आॅगस्टच्या मध्यरात्री १६२ वस्त्यांची देवाण-घेवाण केली होती. त्याद्वारे जगातील सर्वात गुंतागुंतीच्या सीमावादापैकी एका वादाचा अंत झाला होता. या प्रक्रियेत 17,160 एकर परिसरातील भारताच्या एकूण १११ वस्त्या बांगलादेशच्या क्षेत्रात तर ७११० एकरमधील बांगलादेशच्या ५१ वस्त्या भारतात समाविष्ट झाल्या. या वस्त्यांतील एक रहिवासी जैनल आबेदिन म्हणाला की, सरकारी नोकऱ्यांत आरक्षण देण्याची आमची मागणी आहे. आबेदिन म्हणाला की, वस्त्यांतील रस्ते, इमारती, रुग्णालये आणि शाळांच्या बांधकामाचे ठेके स्थानिक नागरिकांना दिले जावेत. पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळाल्याबाबत तुझ्या काय भावना आहेत, असे विचारले असता आबेदिन म्हणाला की, आम्ही निवडणुका पाहिल्या आहेत. परंतु, त्यात कधी भाग घेतला नाही. मजेची गोष्ट म्हणजे आमच्या कुटुंबातील तीन पिढ्या मतदान करणार आहेत.वस्त्यांच्या देवाण-घेवाणीस आठ महिने उलटल्यानंतरही आपण भारताचे नागरिक असल्याबाबतची कागदपत्रे न मिळाल्याचे २० वर्षांच्या अजीबुरला दु:ख आहे. अजीबुरने फोनवर सांगितले की आम्हाला मतदान ओळखपत्र मिळाले आहे, परंतु, जमिनीची कागदपत्रे मिळालेली नाहीत.