शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

‘ते’ करणार स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा मतदान

By admin | Updated: May 4, 2016 02:03 IST

१९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कूचबिहार जिल्ह्यातील ५१ वस्त्यांत (परदेशी मुलखाने वेढलेला प्रदेश) राहणारे ९ हजारांहून अधिक लोक पाच मे रोजी पहिल्यांदा

कूचबिहार (पश्चिम बंगाल) : १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कूचबिहार जिल्ह्यातील ५१ वस्त्यांत (परदेशी मुलखाने वेढलेला प्रदेश) राहणारे ९ हजारांहून अधिक लोक पाच मे रोजी पहिल्यांदा मतदान करणार आहेत. प्रदीर्घ काळानंतर मतदानाचा अधिकार मिळाल्याने या मतदारांत अमाप उत्साह आहे. गेल्या वर्षी बांगलादेशासोबत वस्त्यांची देवाणघेवाण झाल्यानंतर या लोकांच्या वस्त्यांना औपचारिकरीत्या भारतीय क्षेत्र घोषित करण्यात आले. तोपर्यंत या लोकांना मतदानासह नागरिकत्वाचे कोणतेही अधिकार नव्हते. या वस्त्यांतील १५ हजार लोकांना भारताचे नागरिकत्व मिळाले असून यातील ९,७७६ लोक पात्र मतदार असून ते पहिल्यांदा मतदान करणार आहेत. नोकऱ्यांत आरक्षण आणि जमीन कराराची त्वरित अंमलबजावणी ही या मतदारांसमोरील दोन प्रमुख आव्हाने आहेत. या वस्त्यातील लोकांना सरकारी नोकऱ्यांत १० टक्के आरक्षण हवे आहे. याशिवाय वस्त्यांतील सर्व विकासकामे तेथील रहिवाशांच्या भागीदारीतून केली जावीत, अशी त्यांची इच्छा आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)बांगलादेश व भारताने एक आॅगस्टच्या मध्यरात्री १६२ वस्त्यांची देवाण-घेवाण केली होती. त्याद्वारे जगातील सर्वात गुंतागुंतीच्या सीमावादापैकी एका वादाचा अंत झाला होता. या प्रक्रियेत 17,160 एकर परिसरातील भारताच्या एकूण १११ वस्त्या बांगलादेशच्या क्षेत्रात तर ७११० एकरमधील बांगलादेशच्या ५१ वस्त्या भारतात समाविष्ट झाल्या. या वस्त्यांतील एक रहिवासी जैनल आबेदिन म्हणाला की, सरकारी नोकऱ्यांत आरक्षण देण्याची आमची मागणी आहे. आबेदिन म्हणाला की, वस्त्यांतील रस्ते, इमारती, रुग्णालये आणि शाळांच्या बांधकामाचे ठेके स्थानिक नागरिकांना दिले जावेत. पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळाल्याबाबत तुझ्या काय भावना आहेत, असे विचारले असता आबेदिन म्हणाला की, आम्ही निवडणुका पाहिल्या आहेत. परंतु, त्यात कधी भाग घेतला नाही. मजेची गोष्ट म्हणजे आमच्या कुटुंबातील तीन पिढ्या मतदान करणार आहेत.वस्त्यांच्या देवाण-घेवाणीस आठ महिने उलटल्यानंतरही आपण भारताचे नागरिक असल्याबाबतची कागदपत्रे न मिळाल्याचे २० वर्षांच्या अजीबुरला दु:ख आहे. अजीबुरने फोनवर सांगितले की आम्हाला मतदान ओळखपत्र मिळाले आहे, परंतु, जमिनीची कागदपत्रे मिळालेली नाहीत.