शहरं
Join us  
Trending Stories
1
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
2
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
3
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
4
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
5
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
6
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
7
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
8
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
9
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
10
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
11
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
12
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
13
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
14
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
15
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
16
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
17
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
18
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
19
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
20
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले

आधी काळे धन होते पण आता जनधन, डीजीधन आहे - पंतप्रधान मोदी

By admin | Updated: May 26, 2017 20:07 IST

सरकारला तीनवर्ष पूर्ण झाल्याबद्दल आसामच्या गुवहाटीमध्ये आयोजित सभेमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांचे आभार मानले.

 ऑनलाइन लोकमत 

गुवहाटी, दि. 26 - सरकारला तीनवर्ष पूर्ण झाल्याबद्दल आसामच्या गुवहाटीमध्ये आयोजित सभेमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांचे आभार मानले. आम्हाला सरकार बनवण्याची, मला प्रधान सेवक म्हणून काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी देशाच्या जनतेचे आभार मानतो असे मोदी म्हणाले. देशाच्या भल्यासाठी आम्ही जी पावले उचलली त्या प्रत्येक निर्णयात 125 कोटी देशवासियांनी आम्हाला साथ दिली असे मोदी म्हणाले. 
 
आमच्या सरकारने गरीबांच्या विकासासाठी त्यांचे जीवन अधिक सुखकर करण्यासाठी प्रयत्न केले असे मोदींनी सांगितले. यापूर्वी देशात काळे धन होते आता जनधन आणि डीजी धन आहे.  आम्ही 1 हजार गावे ऑप्टीकल फायबरने जोडली. यापुढेही आम्ही आमचे काम चालू ठेवू असे मोदी म्हणाले. 
 
मी माझे मन, शरीर, आत्मा आणि आयुष्य देशाला समर्पित केले आहे असे मोदी म्हणाले. 2022 पर्यंत शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. विरोधकांवर निशाणा साधताना त्यांनी बेनामी संपत्ती कायद्याचे उदहारण दिले. 
1988 साली बेनामी संपत्तीसंबंधी कायदा झाला पण 28 वर्ष त्याची अंमलबजावणी झाली नाही असे त्यांनी सांगितले. लोकांनीच स्वच्छ भारताला मोठी चळवळ बनवली. प्रसारमाध्यमांनी यात महत्वाची भूमिका बजावली. देशाला पुढच्या पाचवर्षात नव्या उंचीवर घेऊन जाण्याचा संकल्प करुया. एक नव भारत उभारुया असे मोदी म्हणाले. 
 
दरम्यान आज सकाळी मोदींनी आसाममध्ये लोहीत नदीवर बांधण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठया पूलाचे लोकार्पण केले. आसाम आणि अरुणाचल या दोन राज्यांना जोडणारा हा पूल आर्थिक क्रांती घडवेल आणि महासत्ता बनण्यामध्ये देशाला उपयोगी ठरेल असे मत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले. आसाम आणि अरुणाचलच्या जनतेला हा पूल एकत्र आणेल असे मोदी म्हणाले. प्रसिद्ध गायक भूपेन हजारीका यांचे नाव पूलाला देण्याची घोषणा मोदींनी केली. 
 
विकास कायमस्वरुपी करायचा असेल तर, पायाभूत सुविधा पहिली गरज आहे. देशाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपल्या सरकारने पायाभूत सोयी-सुविधांवर लक्ष केंद्रीत केल्याचे मोदींनी सांगितले. आसाममधल्या ढोला आणि अरुणाचलमधल्या सदिया यांना जोडणारा हा पूल पूर्वोत्तर राज्यांसाठी दळणवळण क्रांती ठरणार असल्याचं सांगितलं जातं आहे. सध्या या दोन ठिकाणांचं अंतर पार करण्यासाठी तब्बल 6 तासांचा प्रवास करावा लागतो तो आता फक्त 1 तासावर येणार आहे. 
 
शिवाय 165 किमीचं अंतरही वाचणार आहे. ज्यामुळे दिवसाला 10 लाख रुपयांचं इंधन वाचेल असा दावा सरकार करतं आहे. चीन सीमेवर तातडीनं हालचाली करण्यासाठी, अवजड टँक आणि इतर शस्रांची जलदगतीनं वाहतूक करण्यासाठी हा पूल फायद्याचा ठरणार आहे.