शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

महाराष्ट्र बुद्धिस्ट सभागृहाचे औरंगाबादेत प्रथम अधिवेशन

By admin | Updated: July 25, 2015 01:14 IST

भारतीय बुद्धिस्ट संघाद्वारे स्थापित महाराष्ट्र बुद्धिस्ट सभागृहाचे अधिवेशन नुकतेच औरंगाबाद तालुक्यातील चौका येथील मुख्यालयात

चौका (औरंगाबाद) : भारतीय बुद्धिस्ट संघाद्वारे स्थापित महाराष्ट्र बुद्धिस्ट सभागृहाचे अधिवेशन नुकतेच औरंगाबाद तालुक्यातील चौका येथील मुख्यालयात पार पडले. राज्यस्तरावरील अधिवेशनात विविध ठराव घेण्यासोबतच विविध प्रश्न सोडविण्याबाबत चर्चा झाली. १५ फेब्रुवारी २०१५ रोजी भारतीय बुद्धिस्ट संघाद्वारे महाराष्ट्रातील सर्व बुद्ध धम्मीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र बुद्धिस्ट सभागृहाची स्थापना करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रभर सर्व बुद्ध धम्मीयांची सभासद यादी करून मतदानाद्वारे निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यानुसार राज्यातील प्रत्येक शाखेच्या माध्यमातून उत्सुक असणाऱ्यांनी सभासदत्व घेतले. त्यातून तालुका प्रमुख निवडले गेले. तालुका प्रमुखांमधून जिल्हा प्रमुख आणि त्यानंतर विभागीय प्रमुख निवडले गेले. समाजातील डॉक्टर, इंजिनिअर, वकील, कामगार, शेतकरी, बुद्ध विहाराचे प्रमुख, सरकारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, पत्रकार, भन्ते, महिला पदवीधर, उद्योजक यांचा समावेश करण्यात आला व त्यामधून महाराष्ट्राची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. राज्याचे अध्यक्ष म्हणून राजेश गवई यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणीत सर्जेराव वडनगेकर (शासकीय कर्मचारी), माणिक कुरणे (बुद्धिस्ट पार्टी), संदीप भोसले (इंजिनिअर संघटना), गणेश घोडके (पदवीधर), आत्माराम इंदवे (डॉक्टर), अरविंद साळवे (बीआयएस), राजेश गवई (भारतीय बुद्धिस्ट संघ), माधुरी गायकवाड (बुद्धिस्ट सेक्युरिटी फोर्स), अजित गायकवाड (विहार अध्यक्ष), प्रशांत वासनिक (बुद्ध धम्म प्रचारक), महेश शिवशरण (भारतीय बुद्धिस्ट संघ), दीपाली वाघमारे (उद्योजक), स्नेहलता कुरणे (महिला बुद्धिस्ट संघ), प्रकाश ओहळ (कामगार संघटना), सुभाष सामंत (पत्रकार) यांची सभापती म्हणून निवड झाली. (प्रतिनिधी)चौका (औरंगाबाद) : भारतीय बुद्धिस्ट संघाद्वारे स्थापित महाराष्ट्र बुद्धिस्ट सभागृहाचे अधिवेशन नुकतेच औरंगाबाद तालुक्यातील चौका येथील मुख्यालयात पार पडले. राज्यस्तरावरील अधिवेशनात विविध ठराव घेण्यासोबतच विविध प्रश्न सोडविण्याबाबत चर्चा झाली. १५ फेब्रुवारी २०१५ रोजी भारतीय बुद्धिस्ट संघाद्वारे महाराष्ट्रातील सर्व बुद्ध धम्मीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र बुद्धिस्ट सभागृहाची स्थापना करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रभर सर्व बुद्ध धम्मीयांची सभासद यादी करून मतदानाद्वारे निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यानुसार राज्यातील प्रत्येक शाखेच्या माध्यमातून उत्सुक असणाऱ्यांनी सभासदत्व घेतले. त्यातून तालुका प्रमुख निवडले गेले. तालुका प्रमुखांमधून जिल्हा प्रमुख आणि त्यानंतर विभागीय प्रमुख निवडले गेले. समाजातील डॉक्टर, इंजिनिअर, वकील, कामगार, शेतकरी, बुद्ध विहाराचे प्रमुख, सरकारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, पत्रकार, भन्ते, महिला पदवीधर, उद्योजक यांचा समावेश करण्यात आला व त्यामधून महाराष्ट्राची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. राज्याचे अध्यक्ष म्हणून राजेश गवई यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणीत सर्जेराव वडनगेकर (शासकीय कर्मचारी), माणिक कुरणे (बुद्धिस्ट पार्टी), संदीप भोसले (इंजिनिअर संघटना), गणेश घोडके (पदवीधर), आत्माराम इंदवे (डॉक्टर), अरविंद साळवे (बीआयएस), राजेश गवई (भारतीय बुद्धिस्ट संघ), माधुरी गायकवाड (बुद्धिस्ट सेक्युरिटी फोर्स), अजित गायकवाड (विहार अध्यक्ष), प्रशांत वासनिक (बुद्ध धम्म प्रचारक), महेश शिवशरण (भारतीय बुद्धिस्ट संघ), दीपाली वाघमारे (उद्योजक), स्नेहलता कुरणे (महिला बुद्धिस्ट संघ), प्रकाश ओहळ (कामगार संघटना), सुभाष सामंत (पत्रकार) यांची सभापती म्हणून निवड झाली. (प्रतिनिधी)