शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

पहिल्या राऊंडमध्ये शशिकला यांची पनीरसेल्वमवर मात

By admin | Updated: February 9, 2017 10:57 IST

जयललिता यांच्या निधनानंतर मुख्यमंत्रीपद आणि अण्णाद्रमुकवर वर्चस्व मिळवण्यासाठी सुरु झालेल्या लढाईत पहिली फेरी व्ही.के.शशिकला यांनी जिंकली आहे.

 ऑनलाइन लोकमत

चेन्नई, दि. 9 - जयललिता यांच्या निधनानंतर मुख्यमंत्रीपद आणि अण्णाद्रमुकवर वर्चस्व मिळवण्यासाठी सुरु झालेल्या लढाईत पहिली फेरी व्ही.के.शशिकला यांनी जिंकली आहे. बुधवारी अण्णाद्रमुकची विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. या  बैठकीला अण्णाद्रमुकच्या 134 पैकी 120 आमदार उपस्थित होते. शशिकला यांच्या गोटातून त्यांना 129 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करण्यात आला आहे. 
 
शशिकला यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीला उपस्थित असणा-या आमदारांना सध्या चेन्नई येथील हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान राज्यपाल सी.विद्यासागर राव जाणीवपूर्वक आपल्या शपथविधीला विलंब लावत आहेत असा आरोप शशिकला यांनी केला आहे. राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे महाराष्ट्र आणि तामिळनाडू या दोन राज्यांच्या राज्यपालपदाची जबाबदारी असून ते सध्या मुंबईत आहेत. 
 
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी हस्तक्षेप करावा यासाठी शशिकला समर्थक मंत्री, आमदार, खासदार आज राष्ट्रपतींची भेट घेऊ शकतात. शशिकला यांनी पक्षावर वर्चस्व मिळवले असले तरी, त्यांना जनतेची मने जिंकता आलेली नाहीत. तामिऴी जनतेमध्ये पनीरसेल्वम स्वत:साठी सहानुभूती निर्माण करण्यात यशस्वी ठरले असून, त्यांनीच मुख्यमंत्रीपदी कायम राहावे अशी तामिळी जनतेची भावना आहे.